Saturday, March 17, 2012

उत्तर प्रदेशात गुंडागर्दीचे आगमन


उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या दणदणीत विजयानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यानी दलिताचे घरे जालून त्याना मारहाण करण्याचे प्रकार घडले. एवढेच नव्हे तर पत्रकारानाही कोंडण्याचे प्रकार घडले यावरून उत्तर प्रदेशात गुंडागर्दीचे आगमन हॉट असल्याचे स्पष्ट जानवते. अखिलेश सींग यांनी आपल्या मंत्रिमंडळात खुनाचे आणि अन्य गंभीर गुन्हय़ाचे आरोप असलेल्या रज्जुभय्या यांचा समावेश केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचे सर्मथनसुध्दा केले आहे. यावरून त्याच्या मंत्रिमंडलात खूनी व गुंड यांच्या समावेशामुले अखिलेशसिंग यांचा स्वच्छ प्रशासनाचा दावा खोटा ठरतों. विधानसभेत पूर्ण बहुमताने विजय प्राप्त झाल्यानंतरही अखिलेशसींगला  खूनी, दरोड़ेखोर व खूंखार अशा लोकांची गराजच का भासावी?. गुंडाशिवाय आजचे राजकारण चालू शकत नाही काय?. तसे असेल तर लोकशाही चे रूपांतर हे ठोकशाही व गुंड्शाहित झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशातील तरुणाना रोजगार व लापटाप देण्याचे आश्वासन देऊन मत लुबाडना-या अखिलेश सिंग ने आपले आश्वासन पालले नाही तर सत्तेत बसविनारी जनता उद्या परत सिहासनावरून खाली उतरवेल याचे भान असू दिले पाहिजे. 

No comments:

Post a Comment