Sunday, July 27, 2014

भारतीय इतिहास बदलविण्याचे षडयंत्र

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने मा.नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली. जनतेनी नरेंद्र मोदीच्या अच्छे दिन आनेवाले है, सबका विकास – सबका भला अशा प्रकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांना व त्यांच्या पक्षाला बहुमताने निवडून दिले. मोदीच्या प्रचारात धर्म, मंदिर यासारखे मुद्दे नव्हते तर विकास हा मुख्य मुद्दा होता. मोदी जिथे जात तिथल्या स्थानिक प्रश्नासी  निगडीत होत ते प्रश्न सोडविण्याची हमी देत असत. मोदींच्या याच हमीवर विश्वास ठेवून

Monday, July 21, 2014

दाभोळकरांच्या हत्या चौकसीवर पोलिसांच्या अंधश्रद्धेचा फवारा

इंटरनेट वरील आउटलुक या मासिकाच्या वेबसाईटवर १४ जुलै २०१४ चा अंक बघितला. त्या अंकामध्ये  डाक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीचा लेखाजोगा श्री आशिष खेतान या शोधकरिता पत्रकाराने मांडला. लेखातील मजकूर खेदजनक व धक्कादायक होता. तो लेख वाचताना मन सुन्न होत पोलीस व त्यांच्या मानसिकतेवर अनेक प्रश्न चिन्ह उभे राहत होते. हेच का ते तल्लख व सदसदविवेक बुद्धीचे महाराष्ट्रीयन पोलीस?. कसली यांची तल्लख बुद्धी व सदसदविवेक? हे तर अंधश्रद्धेचे महाबळी आहेत. असे लेख वाचताना राहून राहून वाटत होते. पोलिसांच्या मानसिक कुवतीची कीव येत होती.

Tuesday, July 15, 2014

शेतक-यानो सावधान, सरकार जबरदस्तीने तुमच्या जमिनी हडपणार !

दिनांक १५.०७.२०१४ च्या इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार ग्रामीण विकास मंत्रालयाने प्रधानमंत्र्याकडे देण्यासाठी १९ नवीन प्रस्ताव तयार केले आहेत. या प्रस्तावानुसार सरकार पब्लिक – प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्ट तसेच पूर्णत: प्रायव्हेट (खाजगी) प्रोजेक्ट करिता शेतक-यांच्या जमिनी त्यांची परवानगी न घेता सरकारकडून हस्तगत करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर खाजगी विकासक सुध्दा शेतक-यांच्या जमिनी जबरदस्तीने घेवू