Wednesday, December 31, 2014

विवेक जागृत करू पाहणारा “ पिके ”

अध्यात्म हा मानवाला गुढतेकडे नेणारा मार्ग आहे. तो माणसातील स्वत्व हिरावून घेतो. माणसाला वाटत असत अध्यात्मवाद हा माझ्या सर्व समस्याच उत्तर आहे. म्हणून तो पुंजापाठ, मंत्रपठण, चालीसा, देवाला नैवद्य दाखविणे असे प्रकार करीत असतो. या सर्व गोष्टी केल्याने व त्यात तथ्य असेल चुटकीसरशी जीवनामरनाचे प्रश्न का सुटत नाहीत? माणसाला कष्ट का करावी लागतात?. कार, संगणक, ध्वनीयंत्रना, दूरदर्शन, मोबाईल्स यांची निर्मिती अध्यात्माने केली आहे का?. याचा विचारही माणूस करताना दिसत नाही. आपण ज्या सुख व समृद्धीसाठी तळमळतो,  नित्यनेमाने पूजापाठ करतो,

Friday, December 26, 2014

घरवापसी कोणाची: मूळनिवासींची कि विदेशींयांची?

भारतामध्ये जेव्हापासून राजकीय सत्ताबदल झाला तेव्हापासून उघडपणे धर्मांतर करण्याचे धाडसत्र सुरु झाले. संघ व त्यांच्या विविध शाखा यांच्यात नवीन उर्जा निर्माण झालेली दिसते. संघ आजपर्यंत दबा धरून गुप्तपणे बजरंग दल, विहिप व दुर्गावाहिनी यांच्यासारख्या अनेक संघटनामार्फत आक्रमकपणे हिंदुत्वाच्या पडद्यामागून सनातन धर्माच्या पुनरुथ्थानाचे काम करायचा. चुलीवर झाकण ठेवलेल्या गरम पातेल्यातील पाण्याची वाफ जशी आतमध्येच खवळत गुदमुरत असते, बाहेर येण्याचा तिचा सतत प्रयत्न असतो. परंतु पातेल्याचे झाकण उघडताच त्याची वाफ भपकन बाहेर येवून भाजून काढते. काहीसे तसेच  संघाच्या

Sunday, December 21, 2014

कोकणातील दलित चळवळ: परिणाम व सद्यस्थिती


महाराष्ट्रातील दलित चळवळीचे विभागवार अध्ययन करायचे झाल्यास तिचे मुख्यत: पाच विभाग करता येतात. विदर्भ, मराठवाडा, कोकण-मुंबई इलाका, प.महाराष्ट्र व खानदेश हे ते विभाग. प्रत्येक विभागाचा स्वतंत्र एक इतिहास आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दलितांचे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक प्रश्न हे एकसारखेच होते. एकीकडे सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक जातीयतेविरुध्द लढतानाच दुसरीकडे आर्थिक विषमतेचे लढेही लढावे लागले. कोकण-मुंबई इलाखा वगळता गायरान जमिनीचा लढा तर कोकणातील प्रचलित खोत पध्दतीच्या विरोधात अनेक परिषदा घेवून आंदोलने करावी लागली.

Tuesday, December 9, 2014

भगवतगीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी हे संघीय षडयंत्र

नरेंद्र मोदीने “गुजरात” माडेलचे गाजर सर्व देशवाशियाना दाखवून संपूर्ण देशाचा विकास हा गुजरात प्रमाणे करु, परदेशातील काळा पैसा देशात आणून भ्रष्टाचाराची पाळेमुळे नष्ट करू, भ्रष्टाचा-यांना तुरुंगात टाकण्यात येईल, देशातील प्रत्येक तरुणाला रोजगाराची हमी देण्यात येईल असे अनेक आश्वासन व आमिषे जनतेला दिले होते. सोबतच त्यांनी आपण मागास जातीचे आहोत, एका मागास समाजाच्या माणसाला प्रधानमंत्री बनविणे हे तुमच्याच हाती आहे असे भावनिक आवाहन त्यांनी ओबीसींना करीत आपण चायवाला असल्याचे सांगत या देशातील गरिबांचेही मनेही जिंकली जिंकली. या आश्वासनाच्या बळावरच लोकांनी मोदीला न भूतो न भविष्यती

Wednesday, December 3, 2014

कर्तुत्वशुन्य नेतृत्व व दिशाहीन आंबेडकरी चळवळ

बहुजन समाज जितका दुभंगुन राहील तितकाच तो अधिकाधीक दुबळा होईल, त्याच्या दुबळेपनामुळे तो आपल्याला हाकवन्याजोगा होत राहील व नंतर त्याला पाहिजे त्या दिशेने वळवता येईल.  सत्ताधा-यांचे असे हे एक सूत्र असते. सत्ता हि शासन, प्रशासन व प्रशासनामार्फत जनतेला कंट्रोल करण्याचे साधन असते. याबरोबरच ती समाजव्यवस्था, धर्म व अर्थव्यवस्थेवरही वर्चस्व गाजवीत असते. त्यामुळेच सत्ता हि सत्ताधा-यासाठी सर्वस्व असते. म्हणून वर्चस्वाच हे गाजर नेहमी आपल्या हातात ठेवण्यासाठी सत्ताधारी लोक वेगवेगळी माध्यम शोधीत असतात. भारतात धर्म, देव व संस्कृती हि त्यांची माध्यमे तर आहेतच परंतु बहुजनात लाचार व स्वार्थी लोकांचा समूह निर्माण करून त्यांचा ते आपल्या सोयीसाठी माध्यम म्हणून वापर करीत असतात.