Wednesday, January 28, 2015

राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष व समाजवाद शब्द काढण्याचे षडयंत्र

भारतातील जनता देशाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असतानाच केंद्र सरकारच्या प्रजासत्ताक दिनाविषयीच्या जाहिरातीं विविध वर्तमानपत्रात झळकल्या. त्या जाहिरातीमध्ये संविधानाची उद्देशिका दाखविताना संविधानाच्या सरनाम्यातील मूळ धर्मनिरपेक्षसमाजवादी हे दोन शब्द वगळून त्याची जाहिरात करण्यात आली. संविधानाच्या सरनाम्यातून हे दोन शब्द वगळणे म्हणजेच सध्याचे सरकार हे या देशाला एक धर्मनिरपेक्ष व समाजवादी मानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांना या देशाला एक “धर्मनिरपेक्ष देश” म्हणून मिळालेली जगमान्यता घालवून त्या ऐवजी एक “धार्मिक देश” म्हणून  प्रस्थापना करावयाची आहे. याचाच अर्थ विकासाच्या नावावर

Saturday, January 24, 2015

“चैत्यभूमी” नव्या क्रांतीचे एक विश्वकेंद्र

ज्या भूमीवर मानवाला मानवतेचे चैत्यन्य व स्फुलिंग मिळते, माणूस म्हणून समतेची मानवसेवा करायला प्रवर्ग होतो ती “चैत्यभूमी”. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या दादर भागात विवेकवाद व  विज्ञाननिष्ठा जपण्याचा मंत्र देणारी चैत्यभूमी. एक अशी भूमी जिथे दरवर्षी देश विदेशाच्या काना-कोपर्‍यातून आलेले लाखो लोक एका अनन्यसाधारण व्यक्तीला लहान मुलापासून तर आबालवृध्दा पर्यंत पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून अगदी शिस्तीमध्ये गंभीर व भारदस्त मनाने आदरांजली वाहतात तर दुसरीकडे काही काळ स्तब्ध राहून निळ्याभोर समुद्राच्या लाटा आदरांजली वाहत असतात. त्यातच भारताच्या अफाट प्रगतीची साक्ष देणारा सी-लिंक दुरूनच दर्शन घेत त्यांना सलाम मारीत असतो. 

Wednesday, January 14, 2015

तालिबानी हिंदुओका क्या करे?

भारत के कुछ कट्टर हिंदू देश में तालिबानी भारत का निर्माण कर रहे है. पूर्वकाल में भारत के लोगोने अफगानिस्थान में तालिबानियोका और पाकिस्तान में मुजाहिद्दीयोका विरोध किया था. उनके कट्टरवाद पर हल्ला किया था. विश्व में भारतकी मजबूत लोकशाही का हवाला दिया जाता है. विश्व के दूसरे इलाके में आतंकवाद का घटनाओ पर भारत सरकार तुरंत प्रतिक्रिया देती है. मगर आज भारत में क्या हो रहा है? हिंदू संघटन भारत को सदियों पीछे ढकेलनेकी कोशिश कर रहे है. तामिलनाडू के लेखक पेरूमल मुरुगन ने हिंदू संघटनोके दबाव में  अपने  फेसबुक वॉल पर "लेखक पेरुमल मुरुगन नहीं रहा. वो भगवान नहीं है. इसलिए वो दोबारा लिखना नहीं शुरू करेगा. अब सिर्फ एक शिक्षक पी मुरुगन जिंदा रहेगा." ये लिखनेको मजबूर किया है. मुरुगन ने 2010 में “माथोरुभागन” नामक तामिल भाषा में किताब लिखी थी.
हिंदू संघटन लेखकों के अभिव्यक्ति की आजादी पर अंकुश लगाना चाहते है. लगता है, ये हिंदू संघठनही  देश चला रहे है. क्योकि हमारे बोलबच्चन प्रधानमत्रीजी इनके खिलाफ आवाजतक नहीं निकाल पा रहे है. वे मनमोहनसिंग को गूंगा प्रधानमंत्री कहते थे. अब खुद मोदीजी “गूंगेपन” की भूमिका अदा करते दिखाई दे रहे है. देश के हिंदू लेखकों को अगर अपनी बात कहने का अधिकार नहीं है, तो उन्हें अपना धर्म बदल देना चाहिए. लेकिन ऐसे लेखकोने केवल खुद को नहीं बल्की पूरे अपने समाज को साथ में लेकर धर्मपरिवर्तन कर देना चाहिए. जिन कारणों से इस देश में अभीतक धर्मांतरण हुवे है, वे कारण अभी भी मौजूद है.
लेकिन फिर भी प्रश्न उठता है, ये तालिबानी हिन्दुओका करे क्या? क्योकि ये तालिबानी हिंदू  देश में गृहयुध्द होने जैसी परिस्थितिया पैदा कर रहे है. हर देशवासियो को इस बारे में सोचना होगा. रामासामी पेरियार के तामिलानाडू स्टेट में अगर हिन्दुवादी संघटन अभिव्यक्ती स्वतंत्रता पर हल्ला बोल रहे, तो वे देश के हर क्षेत्र में ये हिंदू तालिबानी अभिव्यक्ती स्वतंत्रतापर हल्ला कर सकते है. 

By Bapu Raut

Friday, January 9, 2015

संघ ही प्रतिगामी विचारांची संघटना : प्रा. सुरेश द्वादशीवार

'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकासाठी साहित्यिक श्री. द्वादशीवार यांची कल्पना जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
कल्पना जोशी: रा. स्व. संघाला चळवळ म्हणावं का इतर उजव्या संघटनांसारखीच ही एक संघटना असं समजावं?
सुरेश द्वादशीवार : चळवळ नाही, संघटनाच. मुळात माणसाच्या जीवनात दोन प्रकारच्या निष्ठा असतात. एक जन्मदत्त निष्ठा. त्याला primordial loyalty म्हणतात. ह्या जन्मत: प्राप्त होतात. त्या मिळवाव्या लागत