Tuesday, March 24, 2015

सम्राट अशोकाचे धम्मविषयक धोरण

जगाच्या इतिहासात ज्या ज्या सम्राटांनी आपल्या कर्तुत्वाची छाप पाडली त्या सम्राटामध्ये मौर्यवंशीय सम्राट अशोकाचे स्थान अविवादीत आहे. प्राचीन वा अर्वाचीन सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा चक्रवर्ती सम्राट होय. सम्राट अशोकाने भारतावर इ.स.पू. २७२ ते इ.स.पू. २३२ च्या दरम्यान राज्य केले. सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्याने पश्चिमेकडे अफगाणिस्तान  इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूर व केरळ पर्यंत आपला राज्य विस्तार केला होता. ५०,००,००० वर्गकिमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक व भारतीय खंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते.

Saturday, March 21, 2015

आम आदमी पक्षातील मनोमिलाप किती दिवस चालणार!

आम आदमी पार्टीचे बिज हे अण्णा आंदोलनातून उगवले. जनलोकपाल सारखे कायदे अमलात आणने, भ्रष्टाचाराचा महारोग व कमीशनबाजी नष्ट करण्याची अपेक्षा प्रस्थापित राजकीय पक्ष व नेते यांच्याकडून  करने हे मुर्खपनाचे आहे. ज्याला आपण चिखल समजतो त्या चिखलात उतरूनच हवे ते जनकायदे बनविता येतील. त्यासाठी नव्या राजकीय पक्षाची अनिवार्यता का व कशी आहे? हे अरविंद केजरीवाल, योगेन्द्र यादव व प्रशांत भूषण यानी अण्णा हजारेना पटवून सांगितले होते. परंतु राजकरणात सहभागी  न होता राजकारण्यांची जातकुळी कशी असते? हे अण्णा हजारेंना

Sunday, March 15, 2015

राजकीय सत्तेशिवाय जातीविहीन समाजरचना अशक्य: मा.कांशीराम

भारतीय राजकारणात बाबासाहेबानंतर जी पोकळी निर्माण झाली होती ति  मान्यवर कांशीरामजींच्या रुपाने काही प्रमाणात भरून निघायला फार मदत झाली. बहुजन समाजाला सत्ताधारी बनवायचे या एकेमेव ध्येयाने पछाडलेल्या कांशीरामजीना अनेक कूटनीतिक योजना आखाव्या लागल्या.  बाबासाहेबांचे मिशन निस्वार्थीपणे चालविण्यासाठी त्यांनी स्वत:वर काही बंधने लादून घेतली होती. त्यापैकी मी आयुष्यभर ब्रम्हचारी राहीन, आपले इप्सित साध्य होईपर्यंत कोणत्याही मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही व मांझी स्वत:ची कोणतीही संपत्ती राहणार नाही.
बाबासाहेबांचा “तुम्ही या देशाची शासनकर्ती जमात बना”, “राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे” हा संदेशच पंजाबमधील कांशीरामजीना मार्गदर्शक ठरला. त्यांनी बाबासाहेबांच्या राजकीय सत्ता हातात घेण्याच्या आदेशाला कार्यान्वित न करणा-या शोषित समाजात शासक बनण्याची महत्वाकांक्षा निर्माण केली. त्यांच्या कार्य व त्यागानेच बहुजन समाजात सत्तेत भागीदारी नव्हे तर सत्ताच हातात घेण्याची महत्वाकांक्षा वाढू लागली. त्यासाठी त्यांनी बाबासाहेबांचा  “जातीविनाश” हा कार्यक्रम काही काळापुरता बाजूला ठेवून जातीचेतना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. यामागे कांशीराजींचा तर्क असा होता की, जशजशा जाती चेतना वाढत जातील तशतशा परंपरागत वर्चस्ववादी जाती ह्या राजकीय दृष्ट्या दुर्बल होत जातील व त्यांची जागा ह्या खालच्या जाती घेतील. या त्यांच्या भूमिकेमुळे स्वकीयांच्या विरोधाला त्यांना समोर जावे लागले परंतु ते आपल्या ध्येयापासून यतकिंचीतही डगमगले नाही.
बाबासाहेबांना संपूर्ण जातीसंस्था नष्ट करून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करावयाची होती. जातीसंस्था कशा नष्ट करावयाच्या? यावर आंबेडकरवाद्यात अनेक मतभेद आहेत. बाबासाहेबांचे जातीनिर्मुलन तत्व कांशीरामजीना पूर्णपणे पटले होते परंतु ह्या जातीसंस्था कशा नष्ट करावयाच्या हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता.? कांशिरामजी म्हणतात, जब मैने जाती, जाती व्यवस्था और जातीय आचरण का गहराई से अध्ययन किया तो मेरी सोच मे ही परिवर्तन आ गया. मैने जाती का अध्ययन किताबोसे नही बल्की असली जिंदगी से किया. देश के कोने कोने से लोग बडे शहरोमे आते है. शहरोमे आते समय वे गावसे सबकुछ छोडकर आते है. लेकिन अपने साथ वे केवल खुदकी जात लेकर आते है. यावर कांशिरामजी म्हणतात, या लोकांना जर स्वत:च्या जाती एवढ्या प्रिय असतील तर अशा प्रिय असणा-या जातीना आम्ही कशा नष्ट करू शकतो? ही तर अशक्य कोटीतील बाब आहे. त्यामुळेच तात्कालिक स्वरुपात मी जाती विनाशाच्या संदर्भात विचार करने बंद केले.

जात ही अशी वस्तू नाही की  ति आमच्या सांगण्यामुळे एकदम नष्ट होईल. जातीव्यवस्था निर्माण करण्यामागे मनुवाद्यांचा मोठा स्वार्थ व गहन नीती दडलेली आहे. जोपर्यंत जातीव्यवस्था निर्माण करना-याचे उद्देश व स्वार्थ जिवंत आहेत तोपर्यंत आम्ही जाती विनाश करू शकत नाही. कारण जाती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी मनुवादी आटोकाट प्रयत्न करतील. मनुवादी लोक जातीचा वापर  स्वार्थासाठी करून घेत असतील तर आम्ही सुध्दा या जातीचा उपयोग आम्ही आमचा विकास व फायद्यासाठी का करू नये? मनुवाद्यापासून  जातीचा फायदा कसा घेतला पाहिजे हे आम्ही शिकून जातीवादाचे डाव मनुवाद्यावरच उलटविले पाहिजे.
कांशीराम म्हणतात, बाबासाहेबांनी जातीच्या आधारावरच अनुसूचित जाती-जनजाती लोकाना  राजनैतिक व सामाजिक अधिकार मिळवून दिले. बाबासाहेबानीच जातीचा वापर करीत १९३१-३२ मध्ये राउंड टेबल कान्फरन्समध्ये बहिष्कृत समाजासाठी वेगळ्या मतदार संघाची मागणी केली होती. त्यांनी अनु.जाती व जनजातीना जाती हत्याराचा वापर करण्याच्या टोकापर्यंत आणून ठेवले होते. एवढेच नव्हे तर शोषित व पिडीत जातीच्या आधारावर अन्य मागासवर्गीयांच्या जातीचा एक प्रवर्ग (ओबीसी) बनवायला सरकारला सांगितले होते. यावर सरकार ऐकत नाही असे दिसताच त्यांनी आपल्या मागणीसाठी मंत्रीपदाचा राजीनामा सुध्दा दिला होता.

कांशीरामजी म्हणतात, भारताची १० करोड लोकसंख्या ही घाणीच्या जागेत झोपडपट्ट्या बांधून राहण्यास मजबूर आहे. एवढेच नव्हे तर रस्ते व रेल्वे स्थानकावर आपापले बि-हाड ठेवून ते जीवन व्यतित करतात. हे १० कोटी लोक आपल्याच देशात शरणार्थी लोकासारखे राहतात. परंतु त्याकडे सरकारचे लक्षच जात नाही कारण हे लोक सरकारच्या जातीचे नाहीत. आज जातीव्यवस्था एवढी मजबूत आहे की हे शासक लोक आपल्या काश्मिरी पंडितासाठी अर्थसंकल्पात पुनर्वसनाची तरतूद करते. पाकिस्तानातून आलेल्या सिंधी लोकांना भारतात त्यांच्या व्यापार व उद्योगासाठी स्वत:हून सवलती देते. आणि हे सगळे जाती मुळेच घडून येते. कांशीराम म्हणतात शासक जातीच्या अशा वागनुकीतूनच मी बरेच काही शिकलो. म्हणूनच ज्या बहुजन समाजाचा जातीच्या आधारावर छळ व अपमान करण्यात आला. त्याच जातीचा आधार घेवून व तिला योग्य प्रकारे वापरून बहुजन समाजाला  अन्याय व शोषणमुक्त करता येईल या माझ्या विचारावर मी ठाम आहे. एक दिवस या देशातील जाती समाप्त होतील. परंतु जोपर्यंत या जाती अस्तित्वात आहेत, तोपर्यंत या जातीचा वापर समाजाच्या हितासाठी करण्यात आला पाहिजे.
जातीच्या वापरासंदर्भात कांशीराम म्हणतात, मैने जाती के शिकार लोगोंको संघटीत करके एक बहुजन समाज बनाया है और मै इस बहुजन समाज के लोगोंको बाबासाहाब आंबेडकर के मिशन को आगे बढाने के लिये प्रेरित किया हू. मेरे मिशन से कांग्रेस, भाजपा और मनुवादी लोग घबराये गये है. इस मिशन को रोकने की कोशिश मनुवादी लोग कर रहे है. ये लोग अपना खेल  खेल  रहे है और मै अपना खेल  खेल रहा हू. मुझे मनुवादियोको उन्हीके जाती हत्यारोसे मारना है. उसमे मैने मास्टरी हासिल कर लि है.

जाती निर्मिती हे मनुवादी व्यवस्थेचे षडयंत्र आहे. जर आम्हाला जातीव्यवस्था नष्ट करावयाची असेल तर अगोदर जातीचा फायदा घेणा-या मनुवाद्यांना रोकने आवश्यक आहे. जोपर्यंत जातीचा फायदा घेणारे अस्तित्वात असतील तोपर्यंत जातीव्यवस्था टिकून राहील व जातीच्या आधारावर बहुजन समाजाचे शोषण होत राहील. म्हणून जातीचा वापर बहुजन समाजाच्या फायद्यासाठी करून घेणे शिकले पाहिजे. जेव्हा बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशात वाढायला लागला तेव्हा बहुजन समाज पक्षाविरोधात कांग्रेसने जातीवादी प्रचार केला. बहुजन समाज पार्टी ही चामारांची पार्टी असा कांग्रेसने प्रचार केला. त्याचा परिणाम (फायदा) असा झाला की बहुजन समाज पार्टी चमारामध्ये अधिक लोकप्रिय झाली. बसपाच्या मतांची टक्केवारी २ टक्क्यावरून  सरळ २९ टक्क्यावर आली व बसपा एका राज्यात सत्ताधारी पक्ष म्हणून अस्तित्वात आला. बसपाला हे यश जातीचा योग्य रीत्या वापर करण्यामुळे झाला.
आरक्षणाच्या संदर्भात कांशीराम म्हणतात, मै अपनी जिम्मेदारी समजता हू. मै अपने लोगोंको आरक्षण लेनेके लिये नही बल्की दुसरोको आरक्षण देणे लायक बनाने मे विश्वास रखता हू. बात कहने और समजने के लिये तो आसान है. आरक्षण देणे लायक कौण होता है? केवळ हुक्मरान ही दुसरोको आरक्षण दे सकते हैइसीलिये हमे शासक बनना है. केवळ याही एक उपाय है. बहुजन समाज को शासक बनणे के पहिले मिशनरी समाज समाज बनणा आवश्यक है. याही मिशनरी लोग बाबासाहाब का सपना साकार कर सकते है. आंबेडकरी चळवळीतून आमदार /खासदार/अधिकारी व न्यायाधीश बनणे आवश्यक आहे.. आंबेडकरी मिशन चालविणारे आमदार वा खासदार कान्ग्र्स वा भाजपा देवू शकणार नाही  अये आमदार वा खासदार केवळ बसपा देवू शकते याच साठी मी मुंबई सोडून लखनऊ मध्ये ठान मांडले आहे. कारण महाराष्ट्राचे आंबेडकरी समाजाचे लोक स्वत:च्या पक्षाच्या माध्यमातून आमदार खासदार बनणे व बनविणे पसंत करीत नाही. ते कांग्रेसच्या पाठीमागे जाणे पसंत करतात. थोड्या स्वार्थासाठी ते आपल्या किमती मताला (वोट) विकून टाकतात. ते म्हणतात, बाबासाहाब का संघर्ष जाती की शिकार हुये सभी जाती के लिये था. जाती की शिकार केवळ महार, चमार, माला या परिहा ही नही थे. ऐसी ६००० जातीया है. यही ६००० जातीया बहुजन समाज को शासक बना सकती है. ये सब जातीया आपस मे झगडती है तब अल्पसंख्यक  बनकर रह जाती है. अगर इनमे भाईचारा बनाने की कोशिश की जाये तो ये जातीया संघटीत होगी. ऐसे लोगो की संख्या भारत मे ८५ परसेंट है. सत्ताधारी समाज बनणे के लिये यह सबसे बडी ताकद बन सकती है. आज मैने बसपा के साथ केवळ ६००० जातीया जोडी है. इसही आधारपर बसपा एक राज्य मे सत्ता पर बैठी है और देश मे तिसरे नंबर की राष्ट्रीय पार्टी बन गयी है. जाती की शिकार हुई सभी जातीयो को एकसाथ जोडकर हम राजनैतिक सत्ता कब्जा कर सकते है और देश के शासक बन सकते है.

उत्तर प्रदेशात सत्तेची चाबी मिळाल्याबरोबर गौतम बुद्ध, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या नावाने विद्यापीठे बनविण्यात आली. या व्यतिरिक्त महापुरुषांच्या नावे १७ जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. महापुरुषांच्या नावे मोठमोठे पार्क बनविण्यात आले. मनुवाद्यांनी आमचा इतिहास पुसून टाकला होता. तो इतिहास पुनर्जिवीत करण्यात आला. समाजाच्या आर्थिक विकासासाठी योजना आखण्यात आल्या. त्यासाठी उत्तर प्रदेशाच्या  आंबेडकरवाद्याना कसल्याही प्रकारचे आंदोलन वा मागणी करावी लागली नाही. यातून हेच सिद्ध होते की जातीचा वापर करून राजकीय सत्ता आपल्या हातात घेवून आपण आपल्या समाजाचा आत्मसन्मान व विकास करू शकतो. महापुरुषांच्या दिशानिर्देशानुसार सांस्कृतीकरनाची प्रक्रिया सहज पार पाडू शकतो. सम्राट अशोकाच्या भारत निर्माणापासून आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही.

भारतातील काही बुद्धिवादी मार्क्सवाद, समाजवाद व साम्यवाद यात त्यांच्या समस्यांचे समाधान शोधताना दिसतात परंतु माझ्या मते मनुवादासमोर सगळे वाद अयशस्वी होतात.  म्हणून जातीचे अस्तित्व लक्षात घेवून आंबेडकरी विचाराला कूटनीतिक वळण देवून नव्या प्रयोगाला सामोरे जाणे ही काळाची गरज आहे.  शेवटी प्रश्न पडतो जातीचा वापर करणारे जाती का नष्ट करतील? परंतु अत्याचाराला बळी पडलेले लोकच जाती व्यवस्था नष्ट करू करतील. परंतु त्यासाठी पिडीत लोकांनी शासक बनणे आवश्यक आहे. प्रस्थापित शासन व्यवस्थेकडून बहुजन समाजाच्या सामाजिक न्याय व आर्थिक उन्नतीच्या मुद्यांना बगल देण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहेत. अशा अवस्थेत आम्ही आंबेडकरवादी कधीपर्यंत विघटीत राहायचे? म्हणून बहुजनांना सत्तास्थानी बघू इच्छिणाऱ्या कांशीरामजींच्या तत्वावर चालनेच इष्ट राहील.

बापू राऊत
९२२४३४३४६४

Monday, March 2, 2015

लालच के चंगुल में फसे है आंबेडकरवादी !


बाबासाहबने साफ़ कहा था की शोषितों तथा उत्पीडितो की राजनैतिक शक्तिको लगातार सामाजिक आंदोलनोका हिस्सा बनना चाहिए. इससे वंचितोंकी सामाजिकी में बदलाव तो आता ही है, उनकी राजनैतिक चेतना का भी विस्तार होता है. लेकिन सामाजिक आंदोलन करना हम आंबेडकरवादी भूल गए और आज राजनितिक गुटो में ऐसे बट गए, जहा हमारा पूरा सम्मान दाव पे लग गया है.
डाक्टर बाबासाहब आंबेडकर के नितियोपर चलनेवाले लोगोंको मुख्यतया आंबेडकरवादी कहा जाता है. आंबेडकरवादी बनने लिए किसी जात विशेष का होना कोई जरुरी नहीं. भारत के अनेक लोग