Monday, May 11, 2015

“पत” हरविलेली आंबेडकरी राजकीय चळवळ

लोकसभा, विधानसभा व नुकत्याच झालेल्या औरंगाबाद, नवी मुंबई महानगरपालिका तसेच काही नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल बघा. रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज पक्ष या पक्षांच्या राजकीय ताकदीचा अंदाज झालेल्या या निवडणूक निकालावरून दिसतो. रिपब्लिकन नेत्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिलेली आहे. बहूजन समाजाचे मताचे राजकारण करून आपली स्वत:ची झोळी भरणारे आठवले, गवई, कवाडे, मायावती व आंबेडकर या सर्वांना बहुजन जनतेने चांगलाच धडा शिकविलेला दिसतो. त्यामुळे एकूणच आंबेडकरवादी राजकीय पक्षाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. आंबेडकरी जनतेने  वर्षानुवर्षे जे स्वप्न बघितले होते ते एम.आय.एम सारख्या नवीन पक्षाने मुस्लीम समाजामध्ये स्वाभिमान व आत्मभान जागृत करून पहिल्या निवडणुकामध्येच विधानसभा व महानगरपालीकामध्ये प्रवेश करून दाखवून दिले.