Friday, June 26, 2015

शाहू महाराज व बहुजनवादी चळवळ

आज देशात बहुजनवादी राजकारण व समाजकारणाची धार अधिक तीव्र झालेली दिसते. आपल्या हक्कासाठी बहुसंख्य असलेल्या मध्यम व मागास जातींनी एकत्र येवून अल्पसंख्य परंतु पुढारलेल्या व शोषक धर्मसत्ताक जातीविरुध्द केलेली चळवळ म्हणजे “बहुजनवादी चळवळ” असी प्रचलित व्याख्या आहे. या बहुजनवादी चळवळीची नाळ ही २५०० वर्षापूर्वीच्या तथागत गौतम बुद्धाच्या काळापर्यंत जाते. गौतम बुद्धांच्या “बहुजन हिताय बहुजन सुखाय” या शब्द रचनेची फोड केल्यास पुढारलेल्या व धर्मसत्ता हाती असणाऱ्या अल्पसंख्यांक जाती  ह्या अशिक्षित शेतकरी, अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी ह्या बहुसंख्यांक जातीचे आर्थिक, सामाजिक व धार्मिक शोषण करून स्वत: मजेत जीवन जगत असत. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तथागत बुद्धाने  “बहुजन हिताय बहुजन सुखाय” ची हाक बहुजनांना दिली होती.

Sunday, June 14, 2015

उजवीकडे झुकलेल्या नेते व विचारवंताचा चळवळीवरील प्रादुर्भाव

पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील श्री रावसाहेब कसबे यांनी पुरोगामी चळवळीच्या ऱ्हासाचे कारण दलितांचा ब्राम्हणद्वेष असल्याचे सांगितले. रावसाहेब कसबे यांच्या या वाक्याला प्रसिध्दी माध्यमांनी लागोलाग प्रसिध्दी दिली. झी टीव्ही वर रावसाहेब कसबे, शेषराव मोरे व हरी नरके या तथाकथित विचारवंतांना चर्चा करण्यासाठी बोलाविन्यात आले. टीव्ही स्वर उद्घोषक जसे नेहमी नेहमी हिंदुस्थान हिंदुस्थान म्हणून बळरत असतात. तसेच काहीसे उदय निरगुडकर नावाचे झी चे उद्घोषक समरसता समरसता नावाचा सतत होषा करीत होते. समता या शब्दावर समरसतेचे आक्रमण होते असे निरगुडकराना ठणकावून सांगण्याची हिंमत रावसाहेब कसबे, शेषराव मोरे व हरी नरके यांना झाली नाही. हे दुर्दैवच आहे. चर्चेमध्ये या तिघाही तथाकथित