Saturday, February 27, 2016

बुद्धाच्या मानसशास्त्रीय दृष्टीकोनातील पैलू

तथागत बुद्धाला जगातील पहिला मानस शास्त्रज्ञ म्हटल्या जाते. बुद्धांनी अनेक शास्त्रीय कसोट्या सांगितल्या आहेत. शास्त्रीय मानसिकता निर्माण होण्याची पहिली पायरी म्हणजे आसपासच्या घडणाऱ्या घडामोडीकडे तर्काच्या दृष्टीकोनातून बघणे. बुद्धाने जगातील घडामोडीकडे सूक्ष्म तार्कीकतेने बघितले आहे. भारतात मुख्यत: श्रमण व ब्राम्हण ह्या दोन परंपरा होत्या. ब्राम्हण हे कर्मकांडी संस्कृती, आस्था व अंधश्रध्देचे निर्माते होते. या संस्कृतीचा समाजावर अनिष्ठ परिणाम झाला होता. जनता ही मुख्यत: याज्ञिक, अंधविश्वास आणि कर्मकांडाद्वारे फलश्रुतीच्या जाळ्यात अडकली होती.

Sunday, February 21, 2016

यह कौनसी पत्रकारिता है? कैसा देशप्रेम?

देश में आज हडकंप और अराजकता का माहौल बना हुवा है. देश की जनता कभी भी पार्टी विचारधाराओ में बटी नहीं होती. अगर ऐसा होता तो देश में एक ही पार्टी हमेशा के लिए सत्ता में बनी रहती. कार्यकर्ता, जिसका पेट पार्टी आधारित कार्यक्रमों के अंतर्गत चलता है. ऐसे लोग कार्यकर्ता बनकर पार्टी चलाते है. आर्थिक लाभ इसमे अधिक होता है. कुछ लोग देश में सत्ता में बने रहने के लिए और सत्ता से आर्थिक लाभ पाने के लिए  अशांती फैलाते है. किंतु, इसमे वकील, प्रशासन, पत्रकार, पोलिस और न्यायाधीश शामिल होंगे, वे एक पार्टी और विचारधारा के प्रवक्ता के तौर पर बोलने और चलने लगेंगे, तो सोचो देश का क्या होगा, क्या देश बचेगा? देश का भविष्य क्या होगा? सोचनेवाली बात है.

Friday, February 19, 2016

शिवरायांचा आठवावा प्रताप

आज  देश कधी नव्हे एवढ्या धर्म असहिष्णूतेच्या गर्तेत सापडला आहे. धर्म व परंपरांच्या नावाने मत्सर भावना वाढीस लावल्या जात आहे. राजकीय स्वार्थासाठी धूर्त मंडळी धर्माचा वापर करून देशात दंगली घडवून आणताहेत. हे सारे करताना मात्र शिवाजी महाराज की जय अशा घोषणा करण्यात येत आहेत. हे फारच क्लेशदायक आहे. शिवरायांना कट्टर धर्मश्रध्द ठरवून त्यांच्या विचाराची मोडतोड करून समाजात विष पेरून ही धर्म व धूर्त मंडळी यशस्वी होत आहेत. मात्र त्याउलट शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्षतेचे केवळ नायकच नव्हे तर महानायक होते. हे सनातन्यांना सांगण्याची गरज आहे. आज ब्राम्हण्यवाद्याकडून शिवरायांच्या राजवटीला धार्मिक परिमाण दिले जात आहे. ते हिंदू धर्म रक्षक व मुस्लीम विरोधी होते असा त्यांच्याकडून प्रचार करण्यात येत आहे.

Friday, February 12, 2016

महिला विरुध्द पुरोहित व धर्मशास्त्रे

आपल्या देशात अनेक माणसे स्वत:ला समाजसुधारक म्हणवून घेतात परंतु समाजसुधारणा करने तर दूरच, अनिष्ट नीतीच्या विरोधात साध्या प्रतीक्रीयेलाही ते घाबरत असल्याचे बघायला मिळते. सवर्ण हिंदू सुधारक सनातनी लोकांच्या विरोधात द्रोह करून समानतेच्या सुधारणा आणू इच्छित नाही. भारतात  सुधारणावाद्यापेक्षा विषमतावादी व्यवस्थेला कवटाळनारे व चुप्पी साधनारेच लोक अधिक दिसतात. शनी शिंगणापुर मध्ये भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून हे उघड झाले आहे. बहुसंख्य हिंदु सामाजिक सुधारणा व महिलांच्या समान हक्काच्या संदर्भात उदासीन असलेले दिसतात. किंवा पारंपारिक धर्म व्यवस्थेविरोधात बोलल्यास आपला पानसरे वा दाभोळकर तर होणार नाही ना! एवढी  भीती वाटावी