Saturday, April 8, 2017

बहुआयामी “बाबासाहेब”

बाबासाहेब आंबेडकर हे एक केवळ वादळ होते असे नव्हे तर ते एक उष्माघात होते. या “आंबेडकर” नावाच्या उष्माघाताने अनेकांना आपल्या ज्वालामध्ये गुरफुटले. आजही काहीना या ज्वाला फार दाहक वाटतात तर काहीना अंगात सामावून घ्यावा एवढा थंडावा. बाबासाहेबावर जेवढे प्रेम करणारे आहेत तेवढेच त्यांचे कट्टर विरोधकही आहेत. त्यांच्या कट्टर विरोधकांमध्ये संघ परिवाराचा मोठा गोतावळा आहे. परंतु हा संघीय गोतावळा “आंबेडकर की जय” म्हणू लागला आहे. हेगडेवार व गोळवळकर यांना कधी वाटले नसेल की, मनुस्मृतीला जाळणाऱ्या आंबेडकरांना संघ कधी आपला महानायक म्हणून कवटाळेल?. कारण ज्या व्यवस्थेच्या समर्थनार्थ व प्रसारार्थ हेगडेवार व गोळवलकर जंग जंग पछाडत होते, त्याच काळात बाबासाहेब वर्णव्यवस्था उध्वस्थ करण्यास निघाले होते. भारतीय संविधान हाच लोकाधीकाराचा ‘आत्मा’ आहे असे सांगत सुटले होते. भाई म्हणत लाल सलाम ठोकणारे मार्क्सवादी, ज्यांनी कधीकाळी बाबासाहेबांना राजकीय जीवनातून बहिष्कृत करण्यासाठी जंग जंग पछाडले ते कम्युनिस्ट आता प्रथम जयभीम व नंतर लाल सलाम ठोकू लागले. बाबासाहेब आंबेडकरामध्ये ते आपल्या अस्तित्वाचा मार्ग शोधू लागले आहे. कम्युनिस्टांच्या मरणासन्न चळवळीचा आधार