Thursday, June 20, 2019

महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाची दिशा


देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांचे आलेले परिणाम अनेकाना अचंभित करणारे होते. महाराष्ट्र ही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रातील लोकसभा निवडनुकामध्ये एकूण 48 जागापैकी भाजपा-शिवसेना युतीला 41 जागावर विजय मिळाला. राज्यात कांग्रेस पक्षाची पुर्णपणे धूळधाण उडत काँग्रेसला केवळ चंद्रपुर लोकसभा क्षेत्रात विजय मिळविता आला. तर राष्ट्रवादी पक्षाला आपल्या परंपरागत बालेकिल्ल्यात कसाबसा निसटता विजय मिळवीत 4 जागेचा जोगवा त्यांच्या पदरी पडलाय. निवडणुकांचे हे निकाल अनेकांना चिंता लावणारे व चिंतन करवणारे ठरले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाचा मागोवा घेणे अगत्याचे ठरते.

Sunday, June 9, 2019

केमेस्ट्री सोबतच जातीय मानसीकतेने केलाय माया-अखिलेशचा पराभव


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका (2019) मध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल व बहुजन समाज पक्षाचे गठबंधन होते. हे गठबंधन केवळ तीन पक्षांचे नव्हते तर ते जाट-दलित-ओबीसी आणि मुस्लिम समाजाचे होते. कारण एकत्र आलेले हे पक्ष त्या त्या जातीसमूहाचे प्रतिनिधित्व करणारे होते. यांची कागदी लोकसंख्या अंदाजे 78 टक्के आहे. या एकगठ्ठा मतामुळे भाजप युपी मध्ये पराभूत होईलच हे स्पष्ट होते. यामागील कारणही तसेच होते. या पक्षाच्या संयुक्त गणितीय आकडेवारीमुळेच गोरखपूर, फुलपूर आणि कैराना मध्ये झालेल्या पोटनीवडणुकामध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला. गोरखपूर फुलपूर हे मतदारसंघ मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य याचे मजबूत गढ होते. त्यामुळे 2019 ची लोकसभा निवडणुक सपा-बसपा गठबंधन मोठ्या अंतराने सहज जिंकेल असे निवडणूक पंडित व विश्लेषकांनी मांडलेले गृहीतक मात्र  सपशेल पराभूत झालेय.