Pages

Monday, March 25, 2013

बाबासाहेब आंबेडकर व म.गांधी: वाद प्रतिवाद


डाक्टर बाबासाहेब आंबेडकरानी लिहिलेल्या ऐतिहासिक ग्रंथांपैकी अनिहीलेशन  ऑफ कास्ट(जाती निर्मुलन),  मुक्ति कोन पथे व कास्टस इन इंडिया हे गाजलेले प्रबंध होत. वरील तीनही प्रबंध म्हणजे वादविवादपटूता, तर्कसंगत युक्तिवाद, ज्ञान, पांडित्य व संभाव्य बौद्धिक हल्ल्याची आकलन शक्ती व त्याच ताकदीने दिलेले प्रतिउत्तर यांचा मिलाप असलेले अप्रतिम ग्रंथ होत. जागतिक दर्जाचे हे ग्रंथ बहुजन समाजातील बुद्धिवाद्यांनी अभ्यासले की नाही हे माहीत नाही परंतु जो अभ्यासेल तो पेटून उठल्याशिवाय राहणार हे मात्र निसंदिग्धपणे सांगता येते. हे तीनही प्रबंध क्रांती घडवू शकणा-या ज्वाला ठरू शकतात.

Wednesday, March 13, 2013

जातींनिर्मूलनातील मा. कांशीरामजींचे योगदान



मान्यवर कांशीरामजीचे जीवनकार्याची तटस्थपणे समीक्षा केल्यास मै अकेला ही चला था जानिबे मंजील, मगर लोक जुडते गये और कारवाँ बनता गया” ह्या काव्यपंक्तीच्या लहरी आपोआपच मनाच्या कोप-यातून डोकावून जातात. कर्मचा-यांचे सामाजिक संघठन “बामसेफ” ची निर्मिती, राजकीय संघर्ष करण्यासाठी  डी.एस.फोर ची स्थापना आणि निवडणुकाद्वारे राजकारणाच्या मैदानात उतरन्यासाठी बहुजन समाज पार्टीची निर्मिती व त्यानंतर देशात बहुजन समाजाचा निर्माण झालेला