Tuesday, April 9, 2024

आधुनिक भारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

 


स्वातंत्र्यपूर्व काळात भारत राजकीयदृष्ट्या एकराष्ट्र नव्हते. ते अनेक संस्थानात विभागले होते. प्रत्येक प्रांतात अनेक वंशाचे व धर्माचे  लोक राहत होते. प्रत्येक संस्थाने स्वतंत्र असल्यामुळे त्यांच्यात सांस्कृतिक कलह अधिक होता. काहींचा धर्म एक असला तरी त्यात जातींची शोषणाधीष्ठीत उतरंड होती. आधुनिक विचारधारेचा देश म्हणून मान्यता पावलेल्या ब्रिटीशांनासुध्दा येथील सांस्कृतिक वर्चस्ववादाचे रूपांतरण समानतावादात करता आले नाही.