Friday, October 28, 2022

हिंदुत्व व बहुजनांचे जातीय शोषण

 

जाती हा भारताच्या सामाजिक व्यवस्थेचा मुख्य गाभा आहे. जातीवरून भेदभाव करणे हा भारतीय संस्कृतीचे एक अभिन्न अंग बनले असून  कोणत्याही  निर्णय प्रक्रियेत जातीकडे मुख्य घटक म्हणून बघितल्या जाते. आपल्या देशातील हे  उघड  वास्तव व सत्य वस्तुस्थिती आहे हे मान्य करायला मोठे मन लागते. जगाला हे सत्य सांगण्यात आपण नेहमीच चाचपडत असतो. आंतरराष्ट्रीय पटलावर जेव्हा भारतातील जातीय भेदभाव व अन्यायाचा  प्रश्न येतो तेव्हा  येथे जातीय भेदभावाचा प्रकारच नाही असे केंद्र सरकार कडून धांदात खोटेच सांगितले जाते. ठासून खोटे बोलण्याचा हा प्रघात  भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनला आहे.