Wednesday, July 21, 2021

ओबीसी समाजाच्या वैचारिक मागासलेपणातील घटक

 


मानवाला शिक्षणाची गरज का भासते? याचे उत्तर शोधायचे झाल्यास, निसर्गाने मानवाला दिलेल्या बौध्दिक क्षमतेला अधिक विकसित करण्यासाठी व मानवी मूल्ये जोपासत आधुनिक पध्दतीचे जीवन जगण्यासाठी शिक्षणाची गरज भासते. बौध्दिक क्षमतेच्या आधारेच मानवाने प्रगति केली आहे. मात्र ज्यांना शिक्षणाचे दवबिंदू मिळाले नाहीत, ते समाजघटक अधिकाधिक बौद्धिकदृष्ट्या मागास होत गेले. भारताच्या इतिहासातच ओबीसी समाजाच्या मागासलेपणाची बीजे बघायला मिळतात. वर्णव्यवस्था आणि धर्मशास्त्राच्या आधारावर ओबीसीना शिक्षण व संपत्तीच्या अधिकारापासून वंचित ठेवून आपल्या सोईप्रमाणे राहण्यास भाग पाडण्यात आले. वर्णश्रेष्ठतेच्या पायावर अधिकार वंचित करणे व ८५ टक्के लोकसंख्येने विरोध न करता मूकेपणाने स्वीकारली. म्हणजेच हा निशस्त्र समाज १५ टक्के लोकांच्या किती दहशतीखाली वावरत होता याची कल्पना येते. आजही त्यात फार बदल झाला असे दिसत नाही. “ठेविले अनंत तैसेची राहावे” आणि आलेया भोगासी असावे सादर” याच धर्म शिकवणुकीवर ओबीसी समाज चालताना दिसतो. 

Friday, July 9, 2021

सह जगण्याच्या मतभिन्नतेतूनही भारतीय एकात्मकतेची मजबूत गढी

 


नुकताच प्यु रिसर्च सेंटरचा संशोधकीय अहवाल प्रकाशित झाला. प्यु रिसर्च सेंटरद्वारे जगभरातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय  बदल याचा जनमाणसावर होणार्‍या परिणामाचा अभ्यास व त्याचे विश्लेषण करून निष्कर्ष काढण्यात येतात. भारतात प्यु रिसर्च सेंटर द्वारा १७ नोव्हेंबर २०१९ ते २३ मार्च २०२० च्या काळात राष्ट्रीय स्तरावर १७ भाषामध्ये एकूण ३०,००० हजार भारतीय लोकाकडे जावून, प्रत्यक्ष समोरासमोर बसून प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे अशा नमूना सर्वेक्षणाच्या मर्यादा व कमी अधिक त्रुटी लक्षात घेतल्यातरी असे सर्वे विश्वासार्ह असतात असे मानायला हरकत नाही. तरीही प्यु रिसर्च सेंटर्सने केलेले सर्वेक्षण आणि त्याद्वारे काढलेले निष्कर्ष यांची सावधगिरी बाळगून विश्लेषण व मूल्यमापन केले पाहिजे. प्यूच्या  सर्वेक्षणातून एकप्रकारे भारतीयांच्या मनात असलेल्या  भावना समोर आल्या आहेत. भारतीयात असलेली धार्मिकता, श्रध्दा, एकमेकाबद्दल असलेला भाव व दुसर्‍या धर्माबाबतचे त्याचे मत, भारतीय स्त्रिया व जातीभावना यासोबतच राजकारणातील जटीलता यावर या सर्वेक्षणातून प्रकाश पडतो.