Saturday, May 29, 2021

मराठा आरक्षणाचा न्यायालयीन निर्णय व महाराष्ट्राची सद्यस्थिती


“एक मराठा लाख मराठा” या बॅनर खाली महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मराठा जातीना आरक्षण मिळावे या हेतूनी धडाकेबाज आंदोलने झाली. ही आंदोलने मनात धडकी भरविणारी होती. आंदोलन विरोधी प्रतिक्रिया देणे म्हणजे मराठा विरोधी असे शिक्कामोर्तब होवू लागले होते. नेते, पक्ष यांचे सोबत या क्षेत्रातील तज्ञांनाही घाम फुटत होता. अशा परिस्थितीमध्ये गायकवाड आयोगाच्या निष्कर्षाच्या आधारे सरकारने केलेला मराठा आरक्षण कायदा २०१८ व त्यास आक्षेप घेत काही संस्था आणि वकीलानी प्रथम हायकोर्ट आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निकाल दिला असून मराठा आरक्षणासाठी केलेला कायदा निरस्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परत एकदा तेही कोरोंना काळात एक मराठा लाख मराठा सारख्या आंदोलनाचे नगारे वाजतायत की काय असे वाटू लागले आहे

Wednesday, May 26, 2021

मराठा आंदोलन आणि आरक्षणास किलर ठरणारा सायलेंट झोन

 

“एक मराठा लाख मराठा” या बॅनर खाली महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून मराठा जातीना आरक्षण मिळावे या हेतूनी धडाकेबाज आंदोलने झाली. ही आंदोलने मनात धडकी भरविणारी होती. या आंदोलनाच्या विरोधी प्रतिक्रिया देण्यासाठी नेते, पक्ष यांचे सोबत या क्षेत्रातील तज्ञानाही घाम फुटत होता. अलीकडेच सर्वोच्च नायायालयाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निकाल दिला असून महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेला कायदा निरस्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परत एकदा एक मराठा लाख मराठा सारख्या आंदोलनाचे नगारे वाजतायत की काय असे वाटू लागले आहे.  मराठा जातींना आरक्षण मिळू नये असे

Friday, May 14, 2021

प.बंगाल विधानसभा २०२१ निवडणुक निकालाचा अन्वयार्थ

 

कोविद-१९ च्या दुसर्‍या लहरीच्या काळात भारतात पाच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. परंतु याच निवडणुका ह्या भारताला अद्दल घडविणार्‍या ठरल्या आहेत. निवडनुकातील बेजबाबदार पणामुळे लक्षावधि भारतीय आज कोरोंनाचे बळी ठरतं आहेत. भारताच्या आजवरच्या इतिहासातील हे एक काळे पान होय. २०२१ च्या विधानसभा निवडणुका ह्या अनेक अंगाने देशाच्या राजकारणाच्या दिशा बदलविणार्‍या ठरल्या आहेत. विशेषत: प.बंगाल मधील निवडणूका. प.बंगालमधील निवडणुकीच्या काळातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बघितल्या तर, प.बंगालातील निवडणुका  भारतीय जनता पक्षासाठी फार महत्वपूर्ण होत्या. कोणत्याही परिस्थितिमध्ये प. बंगालच्या विधानसभेचा किल्ला सर करायचाच याच हिरहिरीने प्रधानमंत्र्यापासून ते मुख्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट पासून भाजप शासित राज्यातील पदाधिकारीही निवणुकांच्या रणधूमाळीत उतरले होते. तर ममता बॅनर्जीसाठी, आपल्या किल्ल्याची तटबंदी कायम व भक्कमपणे ठेवायची होती. यात डावे व कॉंग्रेसची आघाडी ही केवळ नावापुरतीच अस्तीत्वात होती. निवडणूक आयोगाच्या पक्षपाती भूमिकेवर सुध्दा बरेच आक्षेप घेण्यात येवून आयोगाला भाजपाची वाढीव शाखा संबोधल्या गेले. निवडणूक आयोगावरचा हा आरोप त्यांच्यासाठी एक कलंकच असून भारतीय लोकशाहीवरचा तो आघात होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कोरोंना काळातील या वादळी निवडणुकानंतर आलेले निवडणूक निकाल हे आश्चर्यजनकच होते. भाजपाच्या हातात प.बंगालची सत्ता न आल्यामुळे भाजपा व संघाने जे भविष्यकालीन डावपेच रचले होते  त्याला तूर्तास निवडणूक निकालाने एक मोठा ब्रेक लागला आहे. निवडणूक व्यवस्थापन गुरु प्रशांत किशोर यांच्या कथनानुसार भाजपा-संघाच्या “एक देश एक पार्टी” ह्या अजेंड्याला पराभवामुळे धक्का बसलेला आहे. किशोर यांनी निवडणूक आयोगावर “भाजपाची वाढीव शाखा” अशी केलेली टीका ही भारतीयांना चिंतेमध्ये टाकणारी आहे. दुसरीकडे निवडणूक निकालामुळे ममता बॅनर्जीला राष्ट्रीय महत्व प्राप्त झाले असून २०२४ च्या निवडणुकामध्ये त्या महत्वाची भूमिका बजावू शकतील. भारतातील मजबूत व पाताळयंत्री असलेले राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व बोलका प्रधानमंत्री मोदी यांचा कसा मुकाबला करायचा यावर विरोधी पक्षांना बरेच मंथन करावे लागेल.

Tuesday, May 4, 2021

बामसेफ: कांशीरामजी का एक अधूरा सपना

 

मा. कांशीराम और बामसेफ का एक अन्योन्य सबंध है। बामसेफ के निर्माण का मूलस्थान था महाराष्ट्र का पुणे शहर। बाद में इसे नई दिल्ली के करोलबाग में स्थानांतरित किया गया। बामसेफ का निर्माण पिछड़े वर्ग एंव वंचित समुदायोंके पढेलिखे शिक्षित कर्मचारियो द्वारा किया गया। उसका निर्माण पिछड़े शोषित समाज को जिसमे वे पैदा हुए, उनके गुलामी की दासता को खत्म करने के लिए किया गया था। इसी उद्देश को ध्यान में रखते हुए संगठन की संरचना को विकसित किया गया। बामसेफ वह संगठन है, जो तीव्र अभिलाषा, शोषण की आत्मपरीक्षा, श्रमसाध्य विवेचन, परखे हुए प्रयोग एंव उत्सर्जित धारणा से निकला था । समता आधारित शासन व्यवस्था और आर्थिक गैरबराबरी मिटाने के लिए की व्यवस्थापरिवर्तन उसका मकसद था।