Tuesday, April 9, 2024

आधुनिक भारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

 


स्वातंत्र्यपूर्व काळात भारत राजकीयदृष्ट्या एकराष्ट्र नव्हते. ते अनेक संस्थानात विभागले होते. प्रत्येक प्रांतात अनेक वंशाचे व धर्माचे  लोक राहत होते. प्रत्येक संस्थाने स्वतंत्र असल्यामुळे त्यांच्यात सांस्कृतिक कलह अधिक होता. काहींचा धर्म एक असला तरी त्यात जातींची शोषणाधीष्ठीत उतरंड होती. आधुनिक विचारधारेचा देश म्हणून मान्यता पावलेल्या ब्रिटीशांनासुध्दा येथील सांस्कृतिक वर्चस्ववादाचे रूपांतरण समानतावादात करता आले नाही. 

Monday, March 25, 2024

महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकांची आकडेवारी काय निर्देश देते ?

देशात निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यानुसार महाराष्ट्रातील निवडणुक हि एकूण पाच टप्प्यात होणार आहे. निवडणुकांच्या घोषणाबरोबरच विविध पक्ष व गठबंधन यांच्यात मतदार संघासाठी रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसते. महाराष्ट्रात मुख्यत: दोन निवडणूक आघाड्या दिसतात. त्यापैकी एक शरद पवार -उद्धव ठाकरे प्रणीत महाविकास आघाडी असून दुसरी भाजपाप्रणीत महायुती..यात एक तिसरा  महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे सध्यातरी स्वत: निवडून न येता एकाला जिंकवून देणारा तर दुसऱ्याला हरविणारा. बहुजन वंचित आघाडी (बविआ) हा तो घटक होय. मागच्या निवडणुकाप्रमाणेच यावर्षीच्या  निवडणुकामध्ये बविआ हाच महत्वाचा घटक ठरू शकतो. बहुजन वंचित आघाडीची  ठाकरे -पवार आघाडी सोबत युती होवू नये. यासाठी अदृश्य खेळ व वाटाघाटी चालू असणे हे राजकारणात नवे असे काही नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा वंचितला किती जागा द्यायच्या हा घोळ असून त्यांना स्वत:चेच मतदारसंघ वाटप करण्यात अडचणी येत असून महायुतीला सुध्दा त्याच प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.   

Monday, February 26, 2024

ओबीसी आरक्षणात मराठा भागीदारीची मागणी कितपत योग्य ?


गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यासाठी त्यांनीएक मराठा लाख मराठाया नावाने आंदोलने करणे सुरु केले. मराठा आरक्षणाची मागणी केंद्र शासनाने आर्थिक मागास घटकासाठी (EWS) लागू केलेल्या १० टक्के आरक्षणाने पूर्ण झाली असून महाराष्ट्रातील गरीब मराठा या आरक्षणाचा लाभ घेवू शकतो. परंतु मनोज जरांगे या मराठा समाजातील नेत्याने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी मागणी पुढे केली. ओबीसीमध्ये समाविष्ठ असलेले कुणबी या घटकाचे मराठ्या सोबत सगेसोयरे असे नाते जोडत सर्व मराठे हे कुणबीच आहेत अशी भूमिका घेत मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याचा मुद्दा समोर केलाय. त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. सपूर्ण महाराष्ट्रात लाखोंचे मोर्चे काढले. या दबावतंत्राचा महाराष्ट्र सरकावर इष्ट परिणाम होत सरकारने विशेष अधिवेशन घेवून मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पास केलाय. तरीही मनोज जरांगे हे ओबिसी आरक्षणातच  मराठ्यांची भागीदारी व सगेसोयरेसंबंधावर अडून आहेत.

Saturday, January 27, 2024

शिवधर्माच्या यशस्वीतेचे काय झाले ?

 


१२ जानेवारी २००५ रोजी, सिंदखेडराजा येथे असंख्य लोकांच्या उपस्थितीमध्ये शिवधर्म या नव्या धर्माची स्थापना करण्यात आली होती. शिवाजी महाराज व त्यांच्या मातोश्री जीजाबाईना प्रेरणास्त्रोत मानून मानवतेची मुल्ये व व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि महिलांचा आदर करणार्या या शिवधर्माचे प्रकटन प्रातिनिधिक स्वरूपात होत असल्याचे सांगून या धर्माची संहिता सुध्दा असेल असे डॉ. आ.ह.साळुंखे व मा.पुरुषोत्तम खेडेकर यांनी जाहीर केले होते. शिवधर्माच्या स्थापनेत श्री पुरुषोत्तम खेडेकर यांचा मोठा पुढाकार होता. तर डॉ. आ.ह.साळुंखे यांचे या शिवधर्मास अध्ययनशील अधिष्ठान लाभले होते. या धर्माची भूमिका सार्वजनिक हिताची व विधायक राहण्याची ग्वाही साळुंखे उपस्थित जमावास दिली होती. शिवाय “हजारो वर्षापासून आमच्या पूर्वजांच्या काळजावर विखारी घाव घातले गेले. त्यांना ते समजले नाही. तरीही तोच आमचा धर्म असे ते समजत राहिले. आता धर्माचा अर्थ कळू लागला आहे. म्हणून संताप वाढतो आहे. परंतु या संतापाच्या उर्जेचा वापर नवनिर्मितीसाठी झाला पाहिजे असे ते म्हणाले. शिवधर्म स्थापनेच्या कार्यक्रमाचे प्रस्तुत लेखक साक्षीदार आहेत. शिवधर्मास आता १९ वर्ष पूर्ण होत आहेत. या १९ वर्षात शिवधर्म किती वाढला व त्यास धर्माचे स्वरूप प्राप्त होवून विधिवत कार्य होत आहेत का, लोक अधिकाधिक स्वरूपात धर्म बदल करून शिवधर्म स्वीकारताहेत का? या धर्माच्या   निर्मितीचे फलित काय?  या दृष्टीकोनातून धर्म स्थापनेच्या घटनेचे विवेचन व्हावयास हवे.

Monday, January 15, 2024

श्रीलंकेतील प्रसिध्द पर्यटन स्थान सिगिरिया व कल्पित पुर्वाग्रह


काही प्रसारमाध्यमे व युट्युबर श्रीलंकेच्या जगप्रसिध्द सिगिरिया या ऐतिहासिक पुरातत्व स्थानाचे विविध व्हिडिओच्या माध्यमातुन रावणाची राजधानी म्हणून प्रचार करीत असल्याचे दिसते. काही प्रसारमाध्यमे आवेशपूर्ण विधाने करून सत्य वस्तुस्थिती पासून दूर नेत आहेत. काही गोष्टी आपल्या खास हातोटीने सांगण्याची कला काही लोकांना लाभलेली आहे. परंतु चांगले करण्याऐवजी ते या कलेचा काल्पनिक व खोट्या  गोष्टी सांगण्यात वापर करतात. त्यातूनच मग भारतीयांच्या मनात अधिक गूढता निर्माण करण्यात होते. याच प्रवृत्तींनी भारतीयांना वास्तव स्थिती व स्वतंत्र विचार करण्याच्या क्रियेपासून हजारो वर्षे दूर ठेवले. आजही भारतीयांना भ्रामक अशा काल्पनिक इतिहासात रममाण होण्यास मजबूर करण्यात येत आहे. त्यासाठी खास यंत्रणा व त्यांचे प्रवक्ते  हे काम हिरहिरीने करीत आहेत. 

सिगीरीयातील अदभूत स्मारक व तेथे असणारी उद्याने, जल तलाव, बगीचे यास ते रावणाची खास स्थाने असल्याचे दाखवितात. वास्तविकता श्रीलंका व  तेथील जनतेचा रावणाशी काहीच सबंध प्रस्थापित नाही. श्रीलंकेतील जनतेला रावणाविषयी माहिती विचारल्यास त्याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगतात. श्रीलंकेतील कोणत्याही पौराणिक वा पुरातात्विक साहित्यात रावणाविषयी काहीही लिहिले गेले नाही. त्यामुळे रावण व त्यासबंधित पात्राचे ऐतिहासिक पुरावे व कालावधीची साक्ष कोठेही मिळत नाहीत.यावरून रामायणातील रावणकथा ह्या भारताच्या काही लोकांच्या सुपीक डोक्याची  उत्पत्ती आहे हे दृष्टीस पडते.