Wednesday, September 23, 2020

शेतकर्‍यांचे आंदोलन: कालचे व आजचे

 

खरे तर भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकर्‍यांचे शोषण होणे ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. सत्ता कोणाचीही म्हणजे स्वतंत्र भारतातील असो वा पारतंत्र्यातील ब्रिटिशांची, शेतकरी हा कायमचा नागविला गेला आहे. शेतकर्‍यांना स्वत:चा आवाजच नसतो. त्यांना नेता नसतो. त्यांचा वापर करून नेता झालेले लोक सत्तेमध्ये गेल्यानंतर शेतकर्‍यांचे शत्रू व उद्योगपतीचे मित्र बनत असतात. हे तात्कालिक नेते शेतकर्‍यासाठी नीती बनविताना शेतकर्‍यांच्या अधिकच्या फायद्याचा विचार न करता सावकार, कॉर्पोरेट कंपन्या व मोठे उद्योगपती यांचेच अधिक फायदे बघत असतात. त्यांच्या अशा कारनाम्यामुळे हे तथाकथित शेतकरी नेते नंतर मालमाल झालेले बघायला मिळतात.

Saturday, September 19, 2020

हे आमचे गुरु नव्हेत !

 


हे आमचे गुरु नव्हेत ! अशा प्रकारची लेखमाला टिळकांनी केसरीतून लिहली होती. हे लेख केसरीतून १७ ऑक्टोबर १९०५, २४ ऑक्टोबर १९०५ आणि ७ नोव्हेंबर १९०५ रोजी प्रसिध्द झाले होते. हे लेख स्वदेशी चळवळीत पडणारे विद्यार्थी व त्यांच्या गुरूमधील परस्पर सबंध दाखविण्यासाठी लिहले होते.  हे आमचे गुरु नव्हेत, हे वाक्य त्यांनी डेक्कन कॉलेजचे ब्रिटिश प्रिन्सिपाल सेल्बी आणि शिक्षणतज्ञ मेकॅले यांना उद्देशून केले. हे गुरु यासाठी नव्हेत कारण, ते आपल्या विद्यार्थ्यास स्वदेशी व राष्ट्रीय चळवळीत सहभागी न होण्याचे व विद्याभ्यासाकडे लक्ष देण्याचे मार्गदर्शन करीत होते. राष्ट्रवाद हा धर्म व  जातीच्या गर्वाशी सबंधित नसून त्या त्या भूभागात राहत असलेल्या लोकांच्या एकात्मकतेच्या सहजीवनाशी निगडीत असल्याचे प्रतिपादन करीत होते. दुसरीकडे टिळक गुरूंच्या सन्मानाची भाषा करताना, आमच्या धर्मशास्त्रात पित्यापेक्षा गुरुस अधिक मान द्यावा असे म्हटल्याचे  सांगतात. ज्ञानासारखी जगात दुसरी कोणतीही पवित्र, वस्तु नाही; पण स्वार्थासाठी ज्ञानाच्या पुंजीचा विक्रम करण्यास जेव्हा एखादा मनुष्य तयार होतो तेव्हा त्याच्या ज्ञानास शुध्द व पवित्र ज्ञानाची किंमत देणे म्हणजे हिमालयातून गोमुखाच्या द्वारे पडणार्‍या गंगोदकांची  गटारातील पाण्याशी तुलना करणे होय ! असेही म्हणताना दिसतात.

Saturday, September 12, 2020

कर्मयोगी स्वामी अग्निवेश नहीं रहे !

स्वामी अग्निवेश जी 
अब, कभी हजारो की भगवाधारी भिड़ में मुझे कोई स्वामी अग्निवेश जैसा कोई स्वामी दिखाई देगा या नहीं ! पता नहीं ? लेकिन मुझे स्वामी अग्निवेशजी का न रहना हमेशा खलता रहेगा। स्वामी अग्निवेश जी का सामाजिक कार्य और उनके न डरते हुए बेबाक तरीकेसे बोलने के आजादी ने मुझे उनका प्रशंसक बना दिया था।वे एक ऐसे संस्था से आते है, जहा चातुर्वर्ण्य और वेदो के मान्यता पर अधिक ज़ोर दिया गया था। आर्य समाज के संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती द्वारा वेदपरंपरा और वैदिक धर्म को उच्चस्तर में रखनेका प्रयास किया। उन्होने पुराणोका विरोध कर हिंदुस्तान की जगह आर्यावर्त कहनेपर ज़ोर दिया था, इसी कारण पुणा के सनातनी लोगोने उनकी प्रतिकात्म्क तरीकेसे गधे पर बारात निकाली थी। महाराष्ट्र में विष्णुबुवा ब्रम्हचारी और न्या॰ महादेव रानड़े जैसे लोग आर्य समाज के शिष्योमेसे थे।