Thursday, April 2, 2026

सम्राट अशोकाच्या इतिहासाकडे दुर्लक्ष: ऐतिहासिक विस्मरण कि राजकीय-सांस्कृतिक रणनीती?

 


भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली आणि नैतिकतेवर आधारित म्हणून सम्राट अशोकाचे स्थान निर्विवाद आहे. त्यांच्या राज्याच्या सीमा भारतीय उपखंडाच्या जवळजवळ संपूर्ण भागावर पसरल्या होत्या. उपलब्ध शिलालेख, स्तंभलेख आणि पुरातत्त्वीय पुराव्यांवरून त्याचा विस्तार दिसतो. अशोकाच्या शिलालेखांमध्ये व्यक्त झालेली दृष्टी, शासनतत्त्वे आणि ‘धम्म’ ही संकल्पना आजही आधुनिक राज्यकारभारासाठी आदर्श मानली जाते. त्याने अहिंसा आणि समतेला राजकीय तत्त्वज्ञानाचे केंद्र बनवले आणि प्रजेला नैतिक अधिकार दिला. त्याच्या कारकीर्दीमध्ये भारत जगात विश्वगुरु बनला होता. तरीही,  आजची भारतीय राजसत्ता आणि ब्राम्हणी  सांस्कृतिकशाही अशोकाला इतिहासाच्या मुख्य प्रवाहातून सतत बाजूला ठेवीत आहे. अशोकाची जयंती  व त्याच्या कार्यावर शासन व सांस्कृतिक विभागाकडून सतत दुर्लक्ष होत आहे.