Wednesday, December 30, 2015

इतिहासाचा काय गर्व? नवा इतिहास तर रचा !

समाजातील प्रत्येक वर्ग वा देश आपापल्या इतिहासाचा गर्व करीत असतो. कोणाचा इतिहास हा कु प्रथानी भरलेला असतो, तरीही तो त्या विक्षिप्त इतिहासाला गौरवान्वित मानीत असतो. कोणाचा इतिहास हा कपट नीतीने भरलेला असतो. अशा इतिहासाला काही लोक आदर्श इतिहासाचे लेबल लावीत असतात. समाजातील एक वर्ग अशा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न बघत असतो. गत इतिहासात काही पुरुष निर्माण झालेत, की ज्यांच्या विचारामुळे सामाजिक व्यवस्था व मानवी जीवन नरकयातनाचे केंद्र बनलेली होते. असे विनाश पुरुष सुध्दा आज त्यांचे आदर्श बनलेले आहेत. आजच्या वर्तमान काळात जे लोक अशा इतिहासाला व विनाश पुरुषांना आपला आदर्श व गर्व मानून

दै.महानायक मधील लेख


Monday, December 28, 2015

शनिशिंगणापूर महिलांच्या अपमानाचे केन्द्र

भारत हा महिला विकासाच्या संदर्भात आघाडीवर दिसत असला तरी महिलांच्या धर्म व पूजा स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये मात्र मागासच दिसतो. वेदकालीन कालखंड ते आजतागायत दिसणारे दृश्य बघितले तर, धार्मिक बाबतीमध्ये तो  महिलांच्या अपमानाचे केंद्र बनलेला आहे. कोणी एकाने म्हटले आहे, भारत हा मुर्ख लोकांचा देश आहे. धर्माच्या आतंकात तो एवढा बुडाला आहे की, त्यात तो स्वत:च्या बुद्धीलाच हरवून बसतोय. धर्म व देव ह्या गोष्टी आल्या की त्यांचे  विज्ञान व तर्क गळून पडत असतात. धर्मव्यवस्थेचा तो पार गुलाम झालाय.

कोणीही, मग ती महिला असो वा एखाद्या खालच्या जातीचा असो, त्यांनी शनी शिंगणापूरचा शनी असो वा तो ब्रम्हचारी हनुमान असो वा दुसरा कोणताही देव असो, यांच्या मुर्त्यांना स्पर्श केल्याने कोणाचेही काही बिघडत नाही हे शनीशिंगणापूरच्या घटनेने पुरते सिद्ध झाले आहे. स्पर्श केल्याने संकटाचे पहाड कोसळते, या ना त्या प्रकारचे प्रसंग ओढवतात हे सारे थोतांड असल्याचे साऱ्यांना कळून चुकले आहे. देवाची भीती हा पोटभरण्याचा धंदा झाला आहे.  

Thursday, December 24, 2015

इतिहास से गर्व क्या? नया इतिहास भी तो निर्माण करो!

समाज का हर वर्ग या देश अपने अपने इतिहास पर गर्व करते है किसी का इतिहास कुप्रथाओसे भरा होता है, फिर भी वे अपने मैले इतिहास को गौरवान्वित मानते है किसीका इतिहास छल कपट से भरा होता है, ऐसे इतिहास को भी कुछ लोक अपना आदर्श घोषित कर वर्तमान मे उसका प्रयोग करना चाहते है गत इतिहास में ऐसे पुरुष पैदा हुवे है, जिनकी विचारधारासे सामाजिक व्यस्वस्था तस की नस हो गयी थी ऐसे विनाशपुरुष भी आज किसीके गौरव है वर्तमान स्थिति में जो लोग तथा समूह ऐसे इतिहास को और कपट नितिकारोको अपना आदर्श घोषित कर उनके विचारों पर अंमल करना चाहते है, वे लोग लोकतंत्र को नकारते है, समानता से उन्हें डर लगता है, की जिससे वे अपना वजूद खो न बैठे अहंकारिता की कायरता उनके दिल दिमाग में बैठी होती है इस विचारधारा के लोग कभी भी बहुसंख्यांक नहीं होते अल्पसंख्यांक होते हुवे भी वे

Sunday, December 13, 2015

...... हा तर मुलभूत हक्क विरोधी निर्णय

हरियाणा सरकारकडून राज्याच्या पंचायत निवडनुकामध्ये उभे राहण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली. या नियमानुसार पंचायती निवडणुकांमध्ये उभे राहण्यासाठी किमान दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असण्याची अनिवार्यता, तसेच वीज बिल व बक हप्ते न भरणारे व थकबाकी असणारे लोक निवडणुकांना उभे राहू शकणार नाहीत. ज्यांच्यावर गंभीर अपराधिक आरोप आहेत असे व ज्यांच्या घरी कार्यान्वित शौचालय नसेल अशा लोकांनाही निवडणूक लढविण्यापासून हरियाणा सरकारने वंचित केले  आहे.
सरकारच्या या निर्णयाविरुध्द दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा सरकारच्या नियमांना वैध ठरविले आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निकाल वरकरणी चांगला वाटत असला तरी तो धक्कादायक आहे. हा निर्णय जनतेच्या निवडणूक लढविण्याच्या मुलभूत हक्कावर गदा

Saturday, December 5, 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीनिर्मुलन व आजची वास्तव स्थिती

भारतात जातीव्यवस्थेची भीषणता मांडणारे व जातीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगणारे बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती होत. जातीची मीमांसा करताना ते कोणासही भीत नसत. म्हणूनच जाती व वर्णव्यवस्थेची जननी असणाऱ्या मनुस्मृतीला जाळून टाकण्याचे धाडस त्यांनी केले. कोणत्याही देशात न आढळणारी जातीसंस्था हा भारतातील एक “महारोग” असे ते म्हणतात. हिंदू लोक बुद्धिहीन व अमानुष आहेत म्हणून जातीभेद पाळतात असे नव्हे, तर ते अधिक धर्मपरायण असल्यामुळे जातीभेद पाळतात. त्यासाठी त्यांच्या मनात जातीय वृत्ती रुजविणारा धर्म हाच जबाबदार आहे. बाबासाहेब म्हणतात, जातीव्यवस्थेचे खरे शत्रू जातीभेद पाळणारे लोक नसून त्यांना जातीभेद पाळावयास शिकविणारी शास्त्रे आहेत. शास्त्रवचने पवित्र व अपरिवर्तनीय असून ती सदैव पाळली पाहिजे. ही मानसिक श्रद्धा लोकांच्या मनात ठासून भरली आहे. म्हणून प्रथम शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा नष्ट करने हाच खरा उपाय आहे असे ते म्हणतात. वेद व शास्त्रे ह्याचे

Tuesday, December 1, 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले जातीमुल्यांकन

बाबासाहेब आंबेडकरांचा “अनिहीलेशन फ कास्ट” हा ग्रंथ असंख्य भारतीयांना अपरीचयाचा आहे. एखाद्या पुस्तकावर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो व नाव दिसले की ते पुस्तकच अस्पृश्य होत असते. त्या पुस्तकांना चाळने तर सोडाच, त्यावर नजर पडली तरी ते न पाहिल्यासारखे केल्या जाते. हा भारतीय जातीयवादाचा अस्सल नमुना आहे. ह्या जातीय मानसिकतेमुळे डाक्टर आंबेडकरांचे अनेक गाजलेली व तर्काने तुडूंब भरलेली पुस्तके सामान्य हिंदुच्याच नव्हे तर उच्चवर्णीय हिंदुच्या ग्रंथालयातील बुकसेल्फ मध्येही मिळणार नाहीत. बाबासाहेबांचे अनिहीलेशन फ कास्ट, कास्ट इन इंडिया व अनटचेबल हे समाजशास्त्रावरील प्रभावी ग्रंथ भारतातील विद्यापीठात अभ्यासक्रमात अजूनही लावले नाही. हे पाहता देशातील विद्यापीठे देखील जातीय मनोवृत्तीपासून अलिप्त नाहीत असे म्हणावे लागते. आंबेडकरांचे विचार न वाचताच त्यांच्याविषयी द्वेषमुलक भावना ठेवणारी पिढीच या देशात निर्माण करण्यात आली आहे. काही संघटना द्वेषाचा हावारसा आजही चालवीत आहेत. तसे नसते तर आंबेडकरांच्या विचारांनी हा देश कधीचाच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या जापान व नेदरलंड या देशाच्या रांगेत जावून बसला असता.