Friday, November 21, 2025

डॉ. आंबेडकरांचा भारतीयांना इशारा..“ संविधानाला दुर्लक्षित केल्यास, लोकशाही धोक्यात”

 


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेतील आपल्या अंतिम भाषणात एक गंभीर इशारा दिला होता. ते म्हणालेसंविधान कितीही उत्तम असले तरी, जर ते चालवणारे लोक चुकीचे असतील तर ते संविधान काही कामाचे नाही. त्यांनी पुढे ठामपणे सांगितले की जर आपण संविधानाच्या मर्यादा आणि मूल्यांकडे दुर्लक्ष केले, तर लोकशाही निश्चितच धोक्यात येईल. आज जेव्हा आपण लोकशाही मूल्यांना आणि संविधानिक  संस्थांना एका वेगळ्याच आव्हानांना सामोरे जाताना पाहतो, तेव्हा आंबेडकरांचा हा इशारा आजच्या स्थितीस फारच प्रासंगिक वाटतो.