Friday, May 22, 2026

जनगणना, जात आणि बौद्ध समाजातील दोन प्रवाह


 भारतामध्ये जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून, सामाजिक‑आर्थिक विषमता, ऐतिहासिक अन्यायाची मोजणी आणि त्याच्या परीमार्जीनासाठी नव्या धोरणनिर्मितीचे प्रतिबिंब दाखवणारी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. विशेषतः अनुसूचित जाती (SC) व अनु.जमाती (ST) प्रवर्गातील समाजासाठी जनगणनेतील जातहा रकाना ऐतिहासिकदृष्ट्या संवेदनशील आहे. आज अनुसूचित जाती प्रवर्गातील बौद्ध समाजासाठी जातहा रकाना हाराकिरीचा बनला आहे. बौद्ध समाजात या रकान्याबाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत. त्यापैकी एक प्रवाह धर्मांतरापूर्वीची जात लिहिण्याचा आग्रह करतो तर दुसरा जात रकाना रिकामा ठेवण्याचा आग्रह करतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी जातविरहित समाजाची निर्मिती हे अंतिम ध्येय मानले होते. त्यांनी जातीव्यवस्थेला भारतीय समाजातील सर्वात मोठा सामाजिक रोग म्हटले होते. परंतु त्याच वेळी त्यांनी दलितांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी आरक्षणाची गरज स्पष्टपणे मांडली. यामुळे लवकरच सुरु होणाऱ्या जनगणनेत जात लिहावी कि नाही लिहावी ?” हा प्रश्न तत्त्वज्ञान आणि वास्तव यांच्या संघर्षातून उभा राहिला आहे.