यांनी चक्रधराला मारले, तुकारामाला मारले, ज्ञानेश्वरला कोवळया वयात
जबरदस्तीने समाधी घ्यावयास भाग पाडले. त्यात नव्याने दाभोळकर, पानसरे, कुलबर्गी व
गौरी लंकेश यांची भर पडली. पोलीस प्रशासन, सीबीआय, न्यायालये सुध्दा हतबल
झाल्यासारखी दिसताहेत. मारेकरी संस्थांची सर्व माहिती असून सुध्दा चौकशी वा अटक नाही.
सगळे कसे स्तब्ध व शांत. किती जरब भीती? कोणती आहे ती राक्षसी संस्था? बहुजन जनतेला
कळू तरी द्या तिचा अस्सल व नक्कल चेहरा.
ज्या बीजातून या नरसंहारकांचा उदय होत आहे त्या
बीजांची नांगी ठेचायला एखादा क्रांतिकारक कधी जन्म घेईल?. समोर फार कठीण काळ येवू घातलेला
आहे. हतबलता, भीती, मरणाची सांशकता क्षणोक्षणी स्पष्ट जाणवू लागली आहे. यापुढे कसे
व्यक्त व्हावे? हा गहन प्रश्न असला तरीही आम्ही बुद्ध, चक्रधर, बसवेश्वर, तुकाराम
व ज्योतिबाच्या विचाराचा वारसा चालविनारच.............
No comments:
Post a Comment