Monday, February 26, 2024

ओबीसी आरक्षणात मराठा भागीदारीची मागणी कितपत योग्य ?


गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यासाठी त्यांनीएक मराठा लाख मराठाया नावाने आंदोलने करणे सुरु केले. मराठा आरक्षणाची मागणी केंद्र शासनाने आर्थिक मागास घटकासाठी (EWS) लागू केलेल्या १० टक्के आरक्षणाने पूर्ण झाली असून महाराष्ट्रातील गरीब मराठा या आरक्षणाचा लाभ घेवू शकतो. परंतु मनोज जरांगे या मराठा समाजातील नेत्याने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी मागणी पुढे केली. ओबीसीमध्ये समाविष्ठ असलेले कुणबी या घटकाचे मराठ्या सोबत सगेसोयरे असे नाते जोडत सर्व मराठे हे कुणबीच आहेत अशी भूमिका घेत मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याचा मुद्दा समोर केलाय. त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. सपूर्ण महाराष्ट्रात लाखोंचे मोर्चे काढले. या दबावतंत्राचा महाराष्ट्र सरकावर इष्ट परिणाम होत सरकारने विशेष अधिवेशन घेवून मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पास केलाय. तरीही मनोज जरांगे हे ओबिसी आरक्षणातच  मराठ्यांची भागीदारी व सगेसोयरेसंबंधावर अडून आहेत.

Saturday, January 27, 2024

शिवधर्माच्या यशस्वीतेचे काय झाले ?

 


१२ जानेवारी २००५ रोजी, सिंदखेडराजा येथे असंख्य लोकांच्या उपस्थितीमध्ये शिवधर्म या नव्या धर्माची स्थापना करण्यात आली होती. शिवाजी महाराज व त्यांच्या मातोश्री जीजाबाईना प्रेरणास्त्रोत मानून मानवतेची मुल्ये व व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि महिलांचा आदर करणार्या या शिवधर्माचे प्रकटन प्रातिनिधिक स्वरूपात होत असल्याचे सांगून या धर्माची संहिता सुध्दा असेल असे डॉ. आ.ह.साळुंखे व मा.पुरुषोत्तम खेडेकर यांनी जाहीर केले होते. शिवधर्माच्या स्थापनेत श्री पुरुषोत्तम खेडेकर यांचा मोठा पुढाकार होता. तर डॉ. आ.ह.साळुंखे यांचे या शिवधर्मास अध्ययनशील अधिष्ठान लाभले होते. या धर्माची भूमिका सार्वजनिक हिताची व विधायक राहण्याची ग्वाही साळुंखे उपस्थित जमावास दिली होती. शिवाय “हजारो वर्षापासून आमच्या पूर्वजांच्या काळजावर विखारी घाव घातले गेले. त्यांना ते समजले नाही. तरीही तोच आमचा धर्म असे ते समजत राहिले. आता धर्माचा अर्थ कळू लागला आहे. म्हणून संताप वाढतो आहे. परंतु या संतापाच्या उर्जेचा वापर नवनिर्मितीसाठी झाला पाहिजे असे ते म्हणाले. शिवधर्म स्थापनेच्या कार्यक्रमाचे प्रस्तुत लेखक साक्षीदार आहेत. शिवधर्मास आता १९ वर्ष पूर्ण होत आहेत. या १९ वर्षात शिवधर्म किती वाढला व त्यास धर्माचे स्वरूप प्राप्त होवून विधिवत कार्य होत आहेत का, लोक अधिकाधिक स्वरूपात धर्म बदल करून शिवधर्म स्वीकारताहेत का? या धर्माच्या   निर्मितीचे फलित काय?  या दृष्टीकोनातून धर्म स्थापनेच्या घटनेचे विवेचन व्हावयास हवे.

Monday, January 15, 2024

श्रीलंकेतील प्रसिध्द पर्यटन स्थान सिगिरिया व कल्पित पुर्वाग्रह


काही प्रसारमाध्यमे व युट्युबर श्रीलंकेच्या जगप्रसिध्द सिगिरिया या ऐतिहासिक पुरातत्व स्थानाचे विविध व्हिडिओच्या माध्यमातुन रावणाची राजधानी म्हणून प्रचार करीत असल्याचे दिसते. काही प्रसारमाध्यमे आवेशपूर्ण विधाने करून सत्य वस्तुस्थिती पासून दूर नेत आहेत. काही गोष्टी आपल्या खास हातोटीने सांगण्याची कला काही लोकांना लाभलेली आहे. परंतु चांगले करण्याऐवजी ते या कलेचा काल्पनिक व खोट्या  गोष्टी सांगण्यात वापर करतात. त्यातूनच मग भारतीयांच्या मनात अधिक गूढता निर्माण करण्यात होते. याच प्रवृत्तींनी भारतीयांना वास्तव स्थिती व स्वतंत्र विचार करण्याच्या क्रियेपासून हजारो वर्षे दूर ठेवले. आजही भारतीयांना भ्रामक अशा काल्पनिक इतिहासात रममाण होण्यास मजबूर करण्यात येत आहे. त्यासाठी खास यंत्रणा व त्यांचे प्रवक्ते  हे काम हिरहिरीने करीत आहेत. 

सिगीरीयातील अदभूत स्मारक व तेथे असणारी उद्याने, जल तलाव, बगीचे यास ते रावणाची खास स्थाने असल्याचे दाखवितात. वास्तविकता श्रीलंका व  तेथील जनतेचा रावणाशी काहीच सबंध प्रस्थापित नाही. श्रीलंकेतील जनतेला रावणाविषयी माहिती विचारल्यास त्याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगतात. श्रीलंकेतील कोणत्याही पौराणिक वा पुरातात्विक साहित्यात रावणाविषयी काहीही लिहिले गेले नाही. त्यामुळे रावण व त्यासबंधित पात्राचे ऐतिहासिक पुरावे व कालावधीची साक्ष कोठेही मिळत नाहीत.यावरून रामायणातील रावणकथा ह्या भारताच्या काही लोकांच्या सुपीक डोक्याची  उत्पत्ती आहे हे दृष्टीस पडते.

Tuesday, November 14, 2023

संस्कृत भाषा भारताच्या पाली प्राकृत पेक्षा जुनी कशी ठरेल?


भारताची मूळ भाषा कोणती? यावर बरेच वादविवाद झडत असतात. भारतात प्राकृत, द्रविड, मुंडा, संस्कृत आणि अशा अनेक बोलीभाषा अस्तित्वात आहेत. यापैकी मूळ भाषा कोणती? या वादामध्ये काही तथाकथित धर्मवादी व संघीय विचारधारेचे लोक संस्कृत हीच या देशाची मूळ भाषा असून इतर भाषांची निर्मिती संस्कृत पासून झाली असा सूर लावीत असतात. यामध्ये तथ्यात्मक पुराव्यावर लक्ष न देता भावनात्मक पुळका आणून आपल्या “इतिहासकार” या पेशासी इमान न राखणाऱ्या काही तथाकथित इतिहासकारांचा समावेश आहे. “आम्हाला पुराव्यांचे व तथ्यात्मक वस्तुस्थितीसी काही देणेघेणे नाही. आम्ही सांगतो तोच इतिहास, आम्ही जे म्हणतो तेच खरे” असे सांगणारा एक समूह भारतात आहे. वास्तविकता असे लोक ठग, भांड, षडयंत्रकारी, विभाजनकारी व  वर्चस्ववादी मनोवृत्तीचे असतात. त्यांच्यावर अनेक लोक विश्वास टाकून तेच सत्य आहे असे मानायला लागतात परंतु तो एक “असत्य व कुटनीतीचा”  मोठा ढिगारा असतो. यातून देशाचे समाजस्वास्थ्य बिघडण्याचे मोठे धोके असतात

Monday, October 23, 2023

बिहारची जातीय जनगणना राजकीय बदल घडवू शकेल काय?

भारतात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. सर्वसाधारणपणे जनगणना सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक आधारावर घेतली जाते. जनगणना ही एक सामान्य आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. बिहार सरकारने जात जनगणना करण्याची घोषणा केल्यानंतर आलेल्या अनेक अडथळ्यानंतर प्रत्यक्ष जनगणना केली. त्यानंतर सरकारने 2 ऑक्टोबर 2023 रोजी जात-आधारित जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध करून जाती-आधारित आकडे जारी केले. बिहार सरकारच्या या कृत्यामुळे आता केंद्रावरही जातीय जनगणना करण्याचा दबाव वाढू लागला आहे, मात्र केंद्र सरकार त्यास कोणत्याही प्रकारे अनुकूल दिसत नाही. म्हणजेच 1931 च्या जनगणनेच्या आधारेच  देशातील जातीआधारित लोकसंख्येचे प्रमाण पकडून जनतेच्या विकासाच्या योजनांचे नियोजन करावे लागणार आहे.       

Saturday, September 23, 2023

सनातन (वैदिक) विरोधी हिंदू धर्म हा महायान बुद्धिज़्मचे परिवर्तित रूप आहे का?

 


तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेली टिप्पणी प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. एवढेच नव्हे तर या टिप्पणीवर सनातन धर्मातील काही बिघडलेल्या साधुनी उदयनिधी स्टॅलिनला मारण्यासाठी मोठे बक्षीस जाहीर केले. सामान्य हिंदू मात्र सनातन धर्मावरील या चर्चेने फार गोंधळलेला दिसतोय, कारण त्याला वाटते की, मी तर हिंदू आहे, मग हा सनातन व वैदिक धर्म आहे तरी काय?.  किंबहुना त्याला वाटायला लागल कि, मी नेमका कोणत्या धर्माचा? सनातन कि हिंदू. म्हणूनच सनातन आणि हिंदू धर्म यांच्यातील खरा संबंध तपासणे आणि तो समजून घेणे महत्त्वाचे ठरते. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला सामाजिक विषमता, भेदभाव, उचनीच, जातिवाद आणि स्त्रियांचे अवमूल्यन यांच्याशी जोडून डेंग्यू आणि मलेरियासारखे रोग जसे दूर करतोय, त्याच प्रमाणे सनातन धर्मातील असमानतावादी तत्त्वे नष्ट करण्याचे त्यांनी आवाहन केले होते. पण आरएसएस आणि त्यांच्याशी संलग्न संघटनांनी उदयनिधी यांच्या वक्तव्याला नरसंहाराची सुपारी म्हणून प्रसारित केलंय.

Friday, September 22, 2023

क्या सनातन (वैदिक) विरोधी हिंदू धर्म महायान का संस्करित रूप है?

 

तामिलनाडू के मंत्री एंव मुख्यमंत्री के बेटे उदयानिधि स्टॅलिन की सनातन धर्म पर की गई  टिपण्णी मीडिया में सुर्खिया का विषय बन गई है। इतनाही नहीं, उनकी टिपण्णीपर सनातन धर्म के कुछ बिगड़े साधुओने बड़े हंगामे के साथ उन्हें मारनेपर बक्षिस देने की घोषणा कर दी। सनातन धर्म की चर्चाओंसे सामान्य हिंदू अधिक संभ्रात में है, क्योकि उसे लगता है की, मै तो हिंदू हु, फिर ये सनातन धर्म क्या है?  उनके लिए यह एक भ्रामकता विषय बना है. वास्तव में उसे लगता है, मेरा असली रिश्ता किस धर्म से है? सनातन से या हिंदू से। इसीलिए सनातन और हिंदू धर्म के वास्तविक रिश्ते को परखना और समजना जरुरी है। उदयानिधि स्टॅलिनने, "सनातन धर्म को सामाजिक असमानता, भेदभाव, उच्च नीचता, जातियावाद और महिलाओं के अवमूल्यन से जोड़ा था। उन्होंने, जैसे डेंगू और मलेरिया जैसी बीमारियों को ख़त्म किया जाता है वैसेही सनातन धर्म के असमानतावादी सिद्धांतोंको ख़त्म करने की बात कही थी। ". लेकिन आरएसएस और उनसे जुड़े संगठनो ने उदयानिधि के इस टिप्पणी को नरसंहार के रूप में प्रक्षेपित किया। 

महायानी बुद्धिस्ट कैसे बने हिंदू


भारत में बहुजन समाज की संख्या अधिक थी. जहा ओबीसी, अनुसूचित जाती, जनजाति एंव  धर्मपरिवर्तित लोगोंका समावेश होता है. इस बहुजन समाज पर बौध्द धर्म का अधिक प्रभाव था. कालांतरण में बौध्द धर्म का विभाजन हीनयान और महायान के तौरपर अधिक तेजीसे चल रहा था. महायान पंथ एक नया स्वरूप ले रहा था. जहा मूर्तिपूजा, तंत्रविद्या और चमत्कार का अधिक विस्तार हो रहा था. साथ ही खेती और सामाजिक चेतना के साथ मनोरंजन (फेस्टिवल) के नए प्रयोग भी विकसित हो रहे थे. इस विकास के साथ बहुजन समाज के सामाजिक, आर्थिक और सांस्कृतिक तानेबाने बढ़े और उनमे स्थिरता आई. महायानो द्वारा भारत के अनेक जगहों पर मंदिरों एंव स्तुपोंका का निर्माण किया गया और उसमे बुध्द की मूर्तिया स्थापित की गई. लेकिन आदि शंकराचार्य के समय से महायानी बौध्दो के मंदिरोपर कब्ज़ा करना शुरू हुवा. मंदिरोंमें बुध्द की मूर्ति में बदलाव किया गया तथा मंदिरोका संचालन ब्राम्हण वर्ग करणे लगा. तत्कालीन राजा ब्राम्हणों के सलाह से राज्य चलाने लगे. महायांनी बहुजन समाज जो तंत्र,मंत्र, मूर्तीपूजा को मानता था वो समाज ब्राम्हण संचालित मंदिरोमे जाकर ब्राम्हण पंडो के बातोपर विश्वास करने लगे. सातवी शताब्धी से चौदाह शताब्धी तक पुराणों, महाकाव्ये और स्मुर्तियो का निर्माण किया गया. आज भी अनेक प्रसिध्द मंदिरोमे बुध्दा की प्रतिकृतिया दिखाई देती है. जमीन के निचे जहा खुदाई होती है, वहा बौध्द संस्कृति के अवशेष मिलते है.  गौतम बुध्द की मूर्तियों पर गेरवा रंग चढ़ाकर उसे देवी और देवता रूप में पूजा की जा रही है और हर मंदिरोंकी काल्पनिक कहानिया बनाकर लोगो को बताया जाता है. इस तरह  की विकृत मानसिकता एक ख़ास वर्ग का प्रतिक बन गई है. 

सुधारवादी हिंदूओंको धर्मविरोधी क्यों कहा जा रहा है?

एक अजब की स्थिति है. कुछ बाहरी लोगोद्वारा हिंदू धर्म के भीतर अपनी कुरीतिया, वर्णव्यवस्था, जातिप्रथा, आस्था और असमानता का बीजारोपण किया गया. जिससे हिंदू धर्म के मूल लोगोको अन्याय एंव अपमान जैसे परिस्थितियों का सामना करना पड़ता है. इन कुरीतिया एंव विषमता जैसे व्यव्हारोंको ख़त्म करना जरुरी है. सुधारोंका यह काम हिंदू धर्म के मूलनिवासी लोग करना चाहते है. जैसे ही मूल हिंदू अपने हिंदू धर्म के अंदर सुधारवादी बाते करने लगते, वैसेही बाहरी वैदिक उन्हें हिंदू विरोधी कहने लगते है. इतनाही नहीं, यह बाहरी हिंदू ८० प्रतिशत हिंदूओंका अपमान होने का दावा भी थोक देते है, जब की वे खुद हिंदू धर्म का हिस्सा नहीं है. फिर भी ये वैदिक ऐसा बर्ताव क्यों रहे है? इसके पीछे का राज क्या है?  इस सवाल के जवाब में कहा जा सकता है की, भारत में सनातनी वैदिक अल्पसंख्यंक है, लेकिन वे भारत की राजसत्तापर अपना अधिकार एंव वर्चस्व बरकरार रखकर उसे और बढ़ाना चाहते है, उन्हें पता है की, वे अपना वर्चस्व तबतक ही कायम रख सकते है, जबतक वे खुद को हिंदू कहना चालु रखे, मंदिरों एंव सांस्कृतिक रीतीरिवाज, वास्तुशास्त्रोंपर अपना वर्चस्व बरकरार रखे. उनके खुद के शास्त्र जैसे वेद, पुरानो और धार्मिक ग्रंथो को मूलनिवासी हिंदूओपर थोपे और सुधारवादी हिंदूओंके सुधारवादी प्रयासोंको हिंदू विरोधी कहकर हिंदुओ में अपनी पैठ ज़माकर अपने अस्तित्व और उनमे अपने विश्वास को अधिक मजबूत करना पड़े. इसी कारण से सामान्य हिंदू अपने दुसरे सुधारवादी हिंदू भाई के बातोपर विश्वास न करते हुए वे बाहरी वैदिक हिंदूओपर अधिक विश्वास करने लगते हुए मानसिक गुलाम, अंधविश्वासी  और अंधभक्त बन रहे है. इन्ही अंधभक्तो एंव मानसीक गुलामोंके बलबूते वे सत्तापर अपना कब्ज़ा बनाए रखे हुए है. और आगे भी शेकडो साल अपना वर्चस्व बनाए रखेंगे.  

 


Monday, September 11, 2023

विरोधी पार्टीयोंके लिये उपचुनाव के मायने क्या है?



यह नहीं कहा जा सकता कि देश में हो रहे उपचुनावों के नतीजे आगामी विधानसभा और लोकसभा चुनावों के लिए संभावित निर्णायक बिंदु हैं। क्योंकि यह कई बार साबित हो चुका है कि पिछले उपचुनावों और उसके बाद हुए विधानसभा और लोकसभा चुनावों के नतीजे उलटे हुए थे. हालाँकि, जनता की राय अलग होती है। कब किसको सत्ता से हटा दें पता नहीं! अब तो मतदाता अपने दैनिक जीवन से जुड़े मुद्दों के साथ-साथ धार्मिक और सामाजिक मुद्दों के बारे में भी सोचने लगा है। लेकिन जो विपक्षी दल सत्ता में नहीं हैं उनके लिए उपचुनाव में मिली जीत से गुदगुदी और खुशी होना स्वाभाविक प्रक्रिया है. इससे विपक्षी दल अगला चुनाव और अधिक मजबूती से लड़ेंगे.

Saturday, September 9, 2023

विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल: एक अन्वयार्थ


देशात होत असलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल हे आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांची संभाव्य झुळूक असते असे म्हणता येत नाही. कारण या अगोदर झालेल्या पोटनिवडणुका व त्या नंतरच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांचे निकाल उलट आले हे अनेकदा सिद्ध झाले आहे. असे असले तरी जनमताचा कौल हा वेगळाच असतो. तो कोणाला कधी सत्तेतून घालवेल याचा नेम नसतो. कारण मतदार त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या मुद्द्याबरोबरच तो धार्मिक व सामाजिक मुद्द्याचाही विचार करू लागला आहे. परंतु पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयातून सत्तेमध्ये नसलेल्या विरोधी पक्षाना गुदगुली व हर्ष वाटणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. यातून विरोधी पक्षांमध्ये अधिक जोर लावून पुढील निवडणुका लढण्याचा हुरूप  येत असतो.

Thursday, August 10, 2023

ओबीसी चळवळीचा बौद्धिक आवाज हरपला

काल हरी नरकेंच्या निधनाची बातमी समजली आणि मन हादरून गेले. त्यांच्या धक्कादायक निधनाने एक प्रश्न पडला होता, हरी नरके तर गेले, मग आता प्रतिगाम्यांच्या एखाद्या प्रश्नावर, फुले शाहू आंबेडकर यांच्याविषयी गरळ ओकणाऱ्या लेखावर ताबडतोब लेखाच्याच माध्यमातून प्रती उत्तर कोण देईल?. तेवढ्याच त्यांच्यासारखा अभ्यास करणारा, इतिहासात जाऊन शोधणारा, तेवढ्या तोलामोलाचा व ताकतीने समोरच्याला निरुत्तर करणाऱ्या हरीची जागा कोण घेईल?. चेहरे शोधू लागलो, परंतु तसा चेहरा मिळेना! परत मन विषण्ण झाले, वाटायला लागले कि, ते पुरोगामी, सत्यशोधक व फुले आंबेडकरी विचारांचे शिलेदार होते, बौद्धिक ताकतीचा एखादा जुनियर शिलेदार बनून पुढील काळात समोर येईलच.

Wednesday, August 9, 2023

गोंजारलेला नागरी ‘अति’रेकी

 एखाद्या व्यक्तीला अधिक लाडावून ठेवले कि, ती व्यक्ती अगदी बिनधास्तपणे चौखूर उधळायला लागत असते. अशा लोकांना माहित असते कि, मी काहीही बडबडले तरी माझे कोणी वाकडे करू शकत नाही. असे निर्ढावलेपण येण्यासाठी डोक्यावर कोणाचा तरी मोठा वरदहस्त असावा लागतो. पाठीवर सत्तेचा हात व भक्तांचा मोठा जमावडा सोबत असला कि फार मोठी हिंमत निर्माण होते. त्यातूनच मग बेतालपणा व अतिरेकी वृत्तीचा जन्म होतो. अशा वृत्ती मग समाजस्वास्थ्य बिघडविणे, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून लोकांमध्ये वैमनस्य निर्माण करीत फिरत असतात. यातूनच मग धार्मिक व जातीय दंगलींची पार्श्वभूमी बनत जाते. हातात बंदूक घेत रस्त्यावर निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यापेक्षा पांढरे कपडे घातलेलेनागरी अतिरेकीहे त्यांचेही  बाप असतात. कारण नागरी व कल्चर्ड अतिरेक्यांकडून घडवून आणलेल्या दंगलीत घरेदारे व वाहने जाळून खाक तर होतातच परंतु माणसेही हकनाक मारली जातात. 

Sunday, July 23, 2023

चलो तुलसीदासजी को जान लेते है, क्या वे किसीके पोषणहारी बने है !

“रामचरित मानस” यह नाम सुनतेही तूलसीदास की याद आती है. क्योकि “रामचरित मानस” इस किताब के वे लेखक है। ऐसे तुलसिदासजी का जन्म उत्तर प्रदेश के बांदा जिले के राजापुर गाव में हुवा था। इतिहासकारों में इनके जन्मदिन के बारे मतभेद है. लेकिन इनका जन्म वर्ष 1532 के आसपास था. उनकी मृत्यु इस्वी 1623 में वाराणसी में हुवा था।

तुलसीदास मुग़ल शासक बाबर (1483-1530), अकबर (1542-1605) और जहाँगीर (1569-1627) के समय में थे। उन्होंने बाबर के  उत्तरकाल से लेकर अकबर,जहाँगीर का पूरा कालखंड देखा और परखा है। मुग़ल शासक बाबर का सेनापती मिरबाकी  के कारनामे और उसकी करतुतियों पर उनकी बारीक नजर होगी। ऐसा मान लेना चाहिए। वे अकबर के पुत्र जहाँगीर के समय 1623 में मृत्युवासी हो गए। अकबर के दरबार में नवरत्न रहे टोडरमल  तुलसीदास के अच्छे मित्र थे। इसकी चर्चा “तुलसी जयंती” नमक किताब में मिलती है।

Sunday, July 2, 2023

वॅगनर गटाचे बंड व त्याचा रशिया -युक्रेन युद्धावरील परिणाम


अलीकडेच रशिया व युक्रेन यांच्यात होत असलेल्या युध्द प्रसंगात जगासमोर एक नवे दृश्य समोर आले. ते म्हणजे, वॅगनरच्या सैनिकांची युक्रेन युध्द सोडून मास्को कडे होणारी कूच. युक्रेन व रशिया यांचे युध्द चालू असताना अचानकपणे असे  होणे आश्चर्यकारक होते. याद्वारे वॅगनर रशियाचा सर्वेसर्वा असलेल्या पुतीनला सत्तेतून घालविण्याचे प्रयत्न करतोय. पुतीन यांनी वेळीच सावध होत वॅगनरच्या हालचालींवर नियंत्रण करीत त्याचे बंड थंड करण्यात यश मिळविले. परंतु यातून पुतीन यांची रशिया व प्रशासनावर असलेली पकड ढिली झाल्याचे जगाला जाणवले. 

Friday, June 9, 2023

बहुजनवादी राजनीती कि विफलता और आज कि अनिवार्यता

 


बहुजनवाद सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक असमानता और भारत के हाशिए पर रहनेवाले समुदायों, विशेष रूप से दलितों, आदिवासियों और अन्य पिछड़े वर्गों (ओबीसी) के खिलाफ सामूहिक संघर्ष की एक प्रणाली है। बहुजनवाद का लक्ष्य उच्च जातियों के प्रभुत्व को चुनौती देते हुए राजनीतिक प्रतिनिधित्व, आर्थिक अवसर और सामाजिक न्याय के माध्यम से इन समुदायों को सशक्त बनाना है। हालाँकि, अपने ऊँचे लक्ष्यों के बावजूद इसे कई चुनौतियों और सीमाओं का सामना करना पड़ता है। बहुजन समुदाय जनसंख्या में बड़ा होने के बावजूद सांस्कृतिक, आर्थिक और राजनीतिक रूप से वंचित है। इसका कारण वे धर्मशास्त्रीय और पुरोहिती ढाँचा है जिसे वे स्वीकार करते हैं। इससे पैदा हुई रुकावटों के कारण ही बहुजनवाद की राजनीति हमेशा हार की राह पर चल रही है।

Wednesday, June 7, 2023

बहुजनवादी राजकारणाचे अपयश व आजची अपरिहार्यता

बहुजनवाद हा भारतातील उपेक्षित समुदाय, विशेषत: दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय (OBC) घटकांना सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रणालीगत होत असलेला अन्याय, असमानता आणि दडपशाही विरोधात संयुक्तपणे लढा देण्याची प्रणाली होय. बहुजनवादाची उद्दिष्टे या समुदायांना राजकीय प्रतिनिधित्व, आर्थिक संधी आणि सामाजिक न्यायाद्वारे सशक्त करणारी असून उच्चवर्णीयांच्या वर्चस्वाला आव्हान देणारी आहेत. तथापि, याची उदात्त ध्येये असूनही त्याला अनेक आव्हाने आणि मर्यादांचा सामना करावा लागत आहे. बहुजन समाज लोकसंख्येने मोठा असला तरी सांस्कृतिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या तो वंचित आहे. याचे कारण त्यांनी मान्य केलेली  धर्मशास्त्रीय व पुरोहितशाहीची चौकट होय. यातून निर्माण झालेल्या अडथळ्यामुळेच बहुजनवादाचे राजकारण नेहमीच पराभवाच्या वाटेवर उभे असते.