Monday, November 21, 2016

बेचैन भारत में जनता की आवाज कहा है?

हाल ही में सर्वोच्च न्यायालय ने चलन बंदी के बारेमे कहा की, ....ऐसे ही रहा तो देश में दंगा सादृश्य परिस्थितियाँ निर्माण होगी. वैसेही आज भारत एक अफरातफरी के माहोल में जी रहा है. कही धर्म के नामसे, कही देशी जिहाद, कही धार्मिक आतंक  तथा कही दूसरे धर्म का होने के कारण एक दूसरे को मार रहा है. गाय के नामपर कुछ नकली राष्ट्रवादी गुंडे दलितोंकी बेरहमीसे पिटाई कर रहे है. उनपर कार्यवाही तक नहीं होती. गरीब और अमीर का फासला बढकर गरीब गरीब होते जा रहे है और अमीर दुनिया के अमिरोके लिस्ट में पहुच रहे है. भ्रष्टाचार ने अपनी सीमा पार कर ली है. देश के गद्दारों का स्विस बैंक और पनामा में काला पैसा जमा है. इन देशद्रोही कालाबाजारखोर बदमाषोकी की यहाँ वाही वाही हो रही है. उन्हें सन्मान मिल रहा है. वे मस्तवाल बुल (बैल) बनकर देश का पैसा विदेशोमे भेज रहे है. उनके ऊपर सरकार कोई भी कार्यवाही नहीं कर रही. लेकिन इसमे जनता की आवाज भी कहा दिख रही है? जनता गूंगी और मुकी बनकर बेचैनी से देख रही है. इस बेचैनी को विस्फोट के रूप में व्यक्त करना भूल गई है. 

Tuesday, November 1, 2016

“चार्वाक दर्शन” का वैज्ञानिक रूप

भारत में अनेकानेक दार्शनिक चिंतनोकी परंपरा रही है। उनमे मुख्यत: वैदिक, चार्वाक, जैन और बौद्ध दर्शन मुख्य है। वस्तुत: भारतीय दर्शन वैदिक (ब्राम्हण) और अवैदिक (श्रमण) वर्गों में बटा है। कभी कभी इसका वर्गीकरण आस्तिक और नास्तिक के तौर किया जाता है। ‘नास्तिको वेद निन्दक’ याने वेदो को नकारने वाले को नास्तिक कहा गया है। लेकिन वैदिकों के इस व्याख्या पर आज के विद्वानोमे आक्षेप और रोष है। उनके अनुसार आस्तिक का अर्थ है, अस्तित्व तथा प्रत्यक्ष रूप में  दिखाई देनेवाले प्रारूप को मानना और नास्तिक का अर्थ है, प्रत्यक्ष प्रारूप को नकार देकर अस्तित्वहीन कल्पना में खोजते रहना। इस अर्थ से वेद अर्थहीन कल्पनाओंकी खाण है। चार्वाकोने इन वेदों के अर्थहीन बातो का बहुत विरोध किया है। क्योकि वेदों/स्मुर्ती/पुराणों ने मिलकर भारत के सत्य इतिहास को दफना दिया है।

Wednesday, October 5, 2016

ओणम, महाबली और राष्ट्रीय स्वंयसेवक संघ

पिछले महीने देश का सांस्कृतिक माहोल बिघाडनेवाली दो घटनाए घटी। यह जानबूझकर किया गया प्रयास था। पहली घटनामे, केरल राज्य में प्राचीन काल से बड़ी धूमधाम से ओणम का फेस्टिवल मनाया जाता है। यह सांस्कृतिक उत्सव राजा महाबली के आगमन के तौरपर उनके स्वागत के लिए होता है। इस संदर्भ में राष्ट्रीय स्वंयसेवक संघ कि मल्यालम पत्रिका केसरी ने ओणम पर विशेषांक निकाला। विशेषांक में लिखे लेख में राजा महाबली कि मान्यताओं को तोडमरोडकर पेश किया गया। लेख में महाबली को असुरों (राक्षसों) का राजा और ओणम को महाबली के नाम से नहीं किंतु वामन (विष्णु) के स्वागत के तौर मनाया जाता है। ऐसा कहा गया। दूसरी घटना में, भाजपा के अध्यक्ष अमित शहा कि ओरसे सोशल मिडिया में किया गया ट्विट। ट्विट मे एक बैनर दिखाया गया, जहा वामन नाम का ब्राम्हण राजा महाबली के सर पे पैर रखकर उसे नरक में धकेल रहा है। राष्ट्रीय स्वंयसेवक कि पत्रिका का लेख और अमित शाह का ट्विट एकसाथ प्रगट होना, आदतन संघपरिवार के सोची समझी निती के तौरपर हुवा है।

Saturday, September 10, 2016

“अविवेकी” कोपर्डी आंदोलन

सध्या कोपर्डी गावात घडलेल्या “बलात्कार व खुन” प्रकरणाच्या निषेधाचे पेव जिकडे तिकडे उठू लागलेले दिसतात. असा निषेध होणे ही आवश्यक बाब झाली असून ती स्वागतार्हच आहे. कोपर्डीत जेव्हा बलात्कार व खुनाची घटना घडली त्याच काळात नवी मुंबईतील नेरूळ येथे प्रेमप्रकरणात स्वप्नील शिंदे या दलित तरुणाला जिवंत मारण्यात आले होते. बलात्कारी व्यक्ती वा खुनी हा कोणत्याही समूहाचा असो त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा झालीच पाहिजे. याउलट गुन्हेगाराला शिक्षा करण्यात कायदा कमी पडत असेल तर कायद्यात सुधारना करून अशा व्यक्तीना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. परंतु ज्याप्रकारे कोपर्डीकांडाचे सादरीकरण चालू आहे ते बघितल्यास कोपर्डी आंदोलन म्हणजे अविवेकाच्या नव्या शोधासारखेच वाटायला लागले आहे. कोपर्डीचे प्रकरण काय होते? आणि आता आंदोलन कशासाठी चालू आहेत? हे बघितले की या आंदोलनाचा, आंदोलनकर्त्या नेत्यांचा व आंदोलनात सहभागी झालेल्या समूहाचा अविवेकीपणा स्पष्ट होतो.

Sunday, August 21, 2016

नागरी (सभ्य) समाज की ऐसी की तैसी

किसी देश की सभ्यता और विकास उस देश में बसे हुए नागरी समाज के वर्तन पर निर्भर होता है  समाज में बसी हुयी कुप्रथाए, कु रीतिया, पुरानी परंपराए, अत्याचार और असमानता पर वे हमेशा हमला करते है मानवता और अधिकार के मुद्दे उनके अजेंडेपर होते है  किंतु, अगर यह सत्य है, तब उसका अनुभव भी आना जरुरी होता है अनेक देशो में इसके परिणाम दिखाई देते है  लेकिन जब भारत और दूसरे देशो के नागरी समाज की तुलना की जाती तब एक बड़ा अंतर दिखाई देता है  भारत का नागरी समाज “नपुसक और भयभीत” प्रतीत होता है  नपुसकता होती क्या है? जो समाज अपने आसपास घटित हुई घटनाओ पर कुछ भी प्रतिक्रिया न देकर केवल आखों से देखते रहता है  जो समाज अन्याय और असत्य के खिलाफ बोलने के लिए डरता हो, ऐसे समाज को “नपुसक समाज” कहा जाता है  भारत के नागरी समाज को इसी दृष्टिकोण से देखा जा सकता है  ऐसे लोगोंके चुप्पी के कारण आज देश  धर्मांधता, जातीयवाद, विषमता, कट्टरवाद, आर्थिक व सामाजिक असमानता आणि धर्मवादी गुंडों के चुंगुल में फसते जा रहा है

Saturday, August 20, 2016

नागरी समाजाची ऐसी की तैसी !

एखाद्या देशाची प्रगती ही त्या देशात असलेल्या नागरी समाजाच्या भूमिकेवरुण ठरविता येते असे म्हटले जाते. नागरी समाजाला दुसऱ्या शब्दात सभ्य समाज असेही म्हणतात. समाजातील अनिष्ठ प्रथा, रुढी, परंपरा, अत्याचार व विषमता यावर हल्ला करीत मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना ह्या नेहमी त्यांच्या अजेंड्यावर असतात. त्यासाठीच ते लढत असतात. परंतु हे जर सत्य असेल तर त्याची प्रचीती यायला हवी. इतर देशातील नागरी समाज व भारतातील नागरी समाज यांच्यात मात्र फार मोठी तफावत दिसते. एकंदरीत अभ्यासावरून भारतातील नागरी समाज हा “नपुसकांच्या व भेकड” भूमिकेतच अधिक दिसतो. मला “नपुसकत्व” या शब्दाच्या खोल दरीत जावून त्याचा अर्थ जाणून घ्यायचा नाही. तर या शब्दाचा व्यवहारातील साध्या व सोप्या भाषेतील निर्देशकाकडे बघायचे आहे. या अर्थाने नपुसक समाज म्हणजे काय? तर अवतीभवती ह्रदयाला हेलावून टाकणाऱ्या घटना घडत असताना मुकपणे बघणाऱ्या समाजाला नपुसक समाज म्हणता येईल. जो समाज एखाद्यावर अत्यंत क्रूरपणे अत्याचार होत असताना प्रतिक्रिया द्यायला घाबरतो असा समाजही “नपुसकच असतो. भारतीय नागरी समाजाकडे याच दृष्टीकोनातून बघावे लागते. या समाजाच्या अशा घाबरट गुणधर्मामुळे हा देश दिवसेनदिवस धर्मांध, जातीयवादी, विषमतावादी, कट्टरवादी, आर्थिक व सामाजिक असमानता आणि धर्मवादी गुंडागर्दीच्या विळख्यात सापडलेला आहे.

Wednesday, July 27, 2016

छोड़ दो ऐसे धर्म और काम को !

हाल ही में मा. नरेंद्र मोदीजी के हाय प्रोफाइल वाले गुजरात में दलितोको सरेआम मारनेका व्हीडियो सामने आया है। ग्यारह जुलाई को वेरावल के ऊना गांव में मरे हुए जानवर के चमड़ा उतारने के मामले में दलित युवकों की पिटाई की गयीदलित युवको को मारनेवाले गोरक्षा समितीके सदस्य थे घटना का वीडियो वायरल होने पर भी पुलिस हरकत में नहीं आई दलितोके विरोध करने के बाद गोरक्षा समितिके कुछ लोगोको गिरफ़्तार किया गया लेकिन मामला क़ानून की कड़ी धाराओं के तहत दर्ज नहीं किया गया
गाय है क्या? गाय एक जानवर है। जैसे बाकी जानवर होते है। हर जानवर की एक अपनी उपयुक्तता होती है, जैसी बकरी की होती है। लेकिन धर्म के ठेकेदारोने गाय का इतना महिमामंडन कर दिया की उसके शरीर के अंदर पुरे ३३ करोड देवी देवता को बसा दिया। आजतक लाखो गायों को काटा गया लेकिन किसी भी गाय के पेट से कोई भी देवी देवता बाहर नहीं निकली। गाय के पेट के अंदर से कोई भी देवता ने अपना चमत्कार दिखाकर गाय को मारनेवाले का पेट नहीं फाड़ा। ऐसी स्थिति में कहा रफूचक्कर होते है देवी और देवता? हाल ही में धर्म के ठेकेदारोने अफवाए फैला दी है की गाय के मूत्र में सोने का अंश है। बकवास की बाते करनेमें इन धर्म के ठेकेदारों का कोई हात नहीं पकड़ सकता। सामान्य लोगो को अंधविश्वास में डुबो देते है। वे अंधविश्वास के नाम से पैसा कमाते है। अभी तो गायों के रक्षा के नाम पर सरकार को लुटा जा रहा है।

Monday, July 18, 2016

मा.रत्नाकर गायकवाड यांना खुले पत्र

मा.गायकवाड साहेब, सविनय जयभीम
दै.लोकसत्ता मध्ये दिनांक १०.०७.२०१६ रोजी आपले मनोगत प्रकाशित झाले. काही न्यूज चनेल्स वर सुध्दा आपण आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याकडून आंबेडकर भवन पाडण्यासंदर्भात आंबेडकरी समुहात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्या लेखात ‘दलितांच्या सर्वांगीण विकासाठी एक मध्यवर्ती सामाजिक केंद्र निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी इमारत फंड उभारण्यास सुरुवात केली होती आणि त्या उभारलेल्या पैशातूनच बाबासाहेबांनी १० आक्टोबर १९४४ साली गोकुळदास पास्ता यांच्याकडून २३३२ चौ.यार्डाचा भूखंड घेतला व २९ जुलै १९४४ साली शेड्युल्ड कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची स्थापना केली’ असे आपल्या लेखातून स्पष्ट होते.

Saturday, July 9, 2016

आंबेडकर भवन व इलाईट क्लास

सध्या मुंबई स्थित आंबेडकर भवन  च्या मुद्द्यावरून आंबेडकरी समाजातच दोन गट पडल्याचे जाणवते. एक आंबेडकर भवन पाडल्याचा निषेध करणारा तर दुसरा समर्थन करणारा. भावी काळात आंबेडकरी समाज आपापसातच भिडण्याची ही नांदी आहे. पहिल्यांदाच आंबेडकरी समाजातील व्हाईट कलर वर्गाने आंबेडकरांच्या प्रतीकाच्या विरोधी भूमिका घेतलेली दिसते. एव्हाना एखाद्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडल्यावर जे आक्रंदन राजकीय नेते, टय सुटवाला वर्ग व सामान्य जनता करायची ती तीव्रता कमी झालेली आढळते. म्हणजे एकूणच आंबेडकर या महामानवाप्रतीची आस्था  कमी झाली असेही म्हणता येते. तसे बघितल्यास महाराष्ट्र ही महामानवांची कर्म व जन्मभूमी राहिली असली तरी ती वैचारिक क्रांती करून बदल घडविणारी भूमी असा तिचा मुळीच लौकिक नाही. स्वार्थी व दलाल (चमचेगिरी) प्रवृत्तीचा एक खास वर्ग येथे तयार झाला आहे.

Tuesday, July 5, 2016

निवडणुकीच्या आखाड्यात उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य. दिल्लीच्या केंद्रीय सत्तेची चाबी मिळवायची असेल तर ती याच राज्यातून मिळते. हा एक अलिखित समज आहे. आणि तो खराही आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये  भाजपाला याच उत्तर प्रदेशने दिल्लीची सत्ता मिळवून दिली. ज्यांच्या हातून उत्तर प्रदेश निसटतो तो देशाच्या मध्यवर्ती सत्तेच्या बाहेर फेकल्या जातो. कांग्रेसला आजची अवकळा जी प्राप्त झाली ती याच उत्तर प्रदेशामुळे. बाबरी मस्जिद पाडली गेल्यामुळे मुस्लीम समाजाने तर कांशीराम यांनी बहुजन जनतेमध्ये स्वाभिमान जागविल्यामुळे बहुजन समाजाने कांग्रेस पासून फारकत घेतली. त्यामुळे अपरिहार्यपणे कांग्रेसला गठबंधनाच्या (युपीए) माध्यमातून सत्ता उपभोगावी लागली हा अलीकडचाच इतिहास आहे.
उत्तर प्रदेशातील वर्ष २०१७ च्या विधानसभा निवडणुका म्हणजे काहींचा नव्याने राजकीय उदय, काहीचे पुनरागमन तर काही जे सत्तेमध्ये बसले आहेत त्यांना अधिक बळ प्राप्त करून देण्याचे साधन झाले आहे. मोदीच्या लोकप्रियतेचा कस लावणारी ही विधानसभा निवडणूक असेल. त्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व त्यांच्या अनेक संघटना कामी लागल्या आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शाह हे उत्तर प्रदेशात तळ ठोकून बसलेले आहेत. कोणत्या पक्षाला कशा प्रकारे खीळखिळे करायचे याची ते रणनीती आखीत आहेत.

Tuesday, June 21, 2016

सत्तापर्वात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ

२०१४ च्या निवडणुका झाल्या. नरेंद्र मोदी यांनी रंगविलेल्या गुजरात मडेलची भूरळ जनतेवर घालून भाजपाने केंद्रात सत्ता हस्तगत केली. राजकीय सत्तेची चव मोदीजी चाखत तर आहेतच परंतु त्याहीपेक्षा संघ हा सत्ताकारणाच्या शिर्षस्थानावर विराजमान होवून आपल्या योजना राबवीत आहे. अटलबिहारी यांच्या कार्यकाळात संघ दबूनच वावरत होता. संघावर वाजपेई यांचा वचक होता. परंतु नरेंद्र मोदीच्या कार्यकाळात तसे नाही. संघावर मोदीचा नव्हे तर मोदीवर संघाचे पूर्ण वर्चस्व आहे. मोदी हे संघाने त्यांच्यावर केलेल्या उपकाराच्या परतफेडीच्या भूमिकेमध्ये वावरत आहेत. संघ व त्यांच्या विविध शाखा आपापले ठरविलेले एजंडे पुढे रेटीत असताना दिसतात. त्यावर अंमलही होत आहे. मोदीच्या जाहीरनाम्यात नसलेले व संघाच्या पहिल्या पानावर असलेल्या मुद्यावरच देशात रोज घमासान होत आहे. यावर मोदीजी कसलीही प्रतिक्रिया न देता मौन राहणेच पसंत करतात. कदाचित त्यांच्या डावपेचाचा तो भाग असावा. मोदीजी परदेशात गेल्यावर खूप बढाया मारताना दिसतात मात्र देशात आल्यावर मौन राहतात. दोन वर्षानंतरही मोदी हे देशाचे नव्हे तर संघाचे, भाजपाचे व एका विशेष धर्माचे प्रधानमंत्री असल्यासारखे  वाटतात.

Friday, May 13, 2016

तृप्ती देसाई यांचे आंदोलन व काही अनुत्तरीत प्रश्न

भारतात हिंदू धर्मातील स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाला होणारा विरोध हि काही नवीन बाब नाही. वेद काळापासून सुरु झालेले मानवी अवमूल्यन व्हाया पुराणे ते मनुस्मृतीच्या काळापर्यंत अधिक वेगाने झाले. मनुने आपले स्वत:चे कडक कायदे बनवून समाजव्यवस्थेवर बळजबरीने लादले. वेद, पुराणे व स्मुर्त्याचा धर्मशास्त्रे म्हणून गौरव करण्यात आला. या वैदिक धर्मशास्त्रानुसार (आता हिंदू धर्म व त्याची धर्मशास्त्रे असे नामकरण) स्त्रियाना अस्पृश्य, विटाळलेल्या व खालच्या दर्जाच्या मानल्या गेल्या. त्यांच्या स्पर्शाने देव व मंदिरांचे भंजन होते. देव बाटतात म्हणून स्त्रियांना हजारो वर्षापासून मंदिर प्रवेश व शिक्षण घेण्यापासून रोखण्यात आले होते. काळ बदलला, मनुस्मृती बाद होवून भारतीय राज्यघटनेचे कायदे लागू झाले तरीही धर्माचा धंदा करणाऱ्यांनी स्वत:ला त्या कुजक्या  धर्मशास्त्राच्या पानातच बंदिस्त करून ठेवल्याचे दिसते.

Thursday, May 5, 2016

"सैराट" च्या निमित्ताने

वेगवेगळ्या माध्यमात “सैराट” बद्दलच्या प्रतिक्रिया वाचल्या. त्यात सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या. त्यामुळे नागराज मंजुळेकृत “सैराट” लवकरात लवकर बघितलाच पाहिजे असे झाले होते. खरे तर नागराज मंजुळेने “सैराट”च्या माध्यमातून समाजातील ‘वास्तव चित्र’ रेखाटले आहे. देशाच्या ग्रामीण भागात जातीय मानसिकता कशी कार्यरत आहे हे वास्तव समोर तर येतेच पण त्याही पेक्षा ग्रामीण भागातील ‘आर्थिक विषमतेचे’ भयानक चित्र उभे राहते. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडलेल्या जातीय घटनांचा अनुबंध असल्याची अनुभूती सैराटचे कथानक बघितल्यानंतर येते.

Saturday, April 30, 2016

शक्ती, प्रतिष्ठा व लालसा: एक अन्योन्य सबंध

प्रतिष्ठा कुणाला हवी नसते. प्रतिष्ठेसाठी मानवी मन तर हपापलेलेच असते. व्यक्तीगत पातळीवर  प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून भौतिक जीवनात अनेक तडजोडी केल्या जातात. अशा तडजोडी बहुतेकदा स्वत:च्या तत्वाच्या विरोधात असतात. तरीही प्रतिष्ठे साठी अशा तडजोडी केल्या जातात. म्हणून प्रतिष्ठेचा पहिला बळी म्हणून “तत्वाकडे” बघितल्या जाते. जो तत्वाला बाजूला सारून प्रतिष्ठेसाठी तडजोडी करतो त्याला अनेकांच्या रोषाला बळी पडावे लागते. लाचार होवून मिळविलेली प्रतिष्ठा हि पदाचे वलय असेपर्यंत चमकत असते. परंतु जी व्यक्ती ‘तत्वाला’ आपला अलंकार समझते व तत्वाप्रमाणे कार्यप्रवण करीत असते अशा व्यक्तीला प्रतिष्ठा मिळत नाही काय? एकार्थाने अशा व्यक्तींना भौतिक प्रतिष्ठेची गरजच नसते. पदांची लालसा हि त्यांच्यासाठी गौण असते. कारण अशा व्यक्तीकडे समाजातील प्रत्येक वर्ग व व्यक्ती आदरानेच बघत असतो. ते त्यांना ठायी ठायी सन्मान व प्रतिष्ठा देत असतात.

Tuesday, April 19, 2016

त्रीरूपी रामदेव: बाबा, व्यापारी आणि कसाई

आजकाल “रामदेव” नाव धारण केलेले रामकृष्ण यादव हे खूप फार्मात असल्या सारखे दिसतात. हे रामदेव सध्या अनेक अवतारात दिसू लागले आहेत. टीव्हीचे कोणतेही चेनेल चालू केले की ‘रामदेव’ या ब्रान्ड वल्लीची जाहिरात झळकताना दिसते. या रामकृष्ण यादवाचे अनेक रूप बघायला मिळतात. त्यापैकी एक ‘योगा’ च्या मल्लखांबातून निर्माण झालेले “बाबा रामदेव”, दुसरे पतंजली पिठाच्या माध्यमातून औषध विकणारा एक उद्योगपती (व्यापारी) म्हणून तर तिसरे मनात आणले तर भारत माता की जय न म्हणाऱ्या लाखो टोपीधारक लोकांचे शीर धडावेगळे करण्याची दर्पोक्ती करणाऱ्या कसायाच्या अवतारात.
या रामदेव उर्फ रामकृष यादव याना अनेकजन ‘संत व बाबा’  अशी बिरुदावली लावतांना दिसतात. अशांनी संताची लक्षणे कशी असतात? हे डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे. “संत” कसा असावा? या संदर्भात तुकाराम महाराज, चोखोबा, नामदेव आणि ज्ञानेश्वर या संतांचा नीट अभ्यास केला पाहिजे. अभ्यासांती रामदेव यांना संत किंवा बाबा म्हणण्याची कोणाचीही हिंमत झाली नसती.

Friday, April 8, 2016

आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ

आंबेडकरोत्तर काळात मुख्यत: पाच चळवळीचा उदय झाला. त्यापैकी १९५७ मध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना,   १९७२ ला दलित पथरचा उदय, तिसरा अन्याय व शोषणाविरुध्द लेखणीच्या माध्यमातून रोष प्रगट करीत जगाला आपली कैफियत सांगणारे दलित साहित्य तर चौथे बहुजनवादी भूमिका घेत निर्माण झालेली बामसेफ व बहुजन समाज पक्ष आणि पाचवे धम्मपरिवर्तन चक्राला गतिमान करण्याच्या ध्येयवेडाने पछाडलेल्या खंडीत धार्मिक संघटना. रिपब्लिकन पक्षाचे रचनाकार स्वत: बाबासाहेब आंबेडकर होते. परंतु १९५६ ला अचानक झालेल्या महापरीनिर्वानामुळे रिपब्लिकन पक्षाची घोषणा त्यांना करता आली नाही. १९६२ च्या मध्यात झालेल्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाने आपल्या भविष्याची दमदार सुरुवात केली होती. पक्षाने उत्तर प्रदेश मध्ये अनुक्रमे ३ खासदार व ८ आमदार तर महाराष्ट्रात ३ आमदार, १९६७ च्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश मध्ये १ खासदार व १० आमदार तर महाराष्ट्रात ५ आमदार निवडून आले होते. मात्र हे यश पक्षाला पचविता आले नाही. रिपब्लिकन पक्षावरील वर्चस्ववादाच्या भांडणात पक्षाचा राजकीय ग्राफ तेजीने घसरू लागला. कांग्रेस पक्षाने याचा नेमका फायदा घेत रिपब्लिकन पक्षाची गटातटात विभागनी करून भविष्यात हे गटतट कधीच एकत्र येणार नाही याचीही तजवीज करण्यात आली.