Thursday, April 17, 2025

युगप्रवर्तक: मान्यवर कांशीराम

कांशीरामजी यांच्या राजकीय सत्ता हातात घेण्याच्या संकल्पनेला काही बुद्धिवादी विचारवंताना सोडले तर बहुंतांशी विचारवंतांनी फारसे उचलून धरले नव्हते. याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्ष प्रस्थापित विचारांच्या मिडीयाच्या विरोधात गेलो तर आयुष्यात आपल्याला काहीही (पद प्रतिष्ठा) साध्य करता येणार नाही’ या भीतीने काही तथाकथित आंबेडकरवादी कांशीरामजींच्या संघर्षापासून दूर राहिले. व्यक्तिगत लाभासाठी सत्ताधार्यांना चुचकारणे त्यासाठी समाजाचा बळी देणे हे अशा लोकांचे ध्येय राहिले होते.दलितांच्या सामाजिक न्याय आर्थिक उन्नतीच्या मुद्द्यांना बगल देण्याचे प्रयत्न जाणीव पूर्वक होत आहेत. अशा अवस्थेत बहुजनवादी कधीपर्यंत विघटीत राहणार आहेत? हा आजचा मोठा प्रश्न आहेसंपूर्ण समाजाचा विकास बघायचा कि केवळ एक दोन नेत्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा विकास हे आता लोकांनीच ठरवायला हवे. एक संघटना एक पक्ष या भूमिकेकडे हा बहुजन समाज कधी बघणार आहे? सांस्कृतिक, सामाजिक राजकीय लढे हे एकाच वेळेस एकमेकाच्या साथीने लढल्यास ध्येय लवकर गाठता येईल हे आजच्या तथाकथित नेत्यांना  का कळत नाही? समाजाच्या विकासासाठी नियोजन, साधनसामग्री, दबाव गट, एकीकृत वोट बँक, अवलोकन करण्याची क्षमता सत्ताधार्यांना वाकविण्याची कुवत निर्माण झाली पाहिजे.

Tuesday, April 15, 2025

संभाजी महाराजाचे खरे शत्रू कोण?

 


चित्रपटगृहात संभाजी राजेवर आधारित छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देशात दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली. वास्तविकत: छावा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे. अशा कादंबर्या व नाटकातील बरेच प्रसंग हे काल्पनिक असतात. परंतु साध्या भोळ्या जनतेला असे प्रसंग खरे वाटू लागतात त्यातूनच आपले मत बनवीत असतात. अशावेळेस  स्वार्थी राष्ट्रद्रोही प्रवृत्तीचे नेते त्यात तेल ओतण्याचे काम करतात. यातून आपल्या देशाचे नुकसान होते हे त्यांच्या लक्षातही येत नाही

Wednesday, February 12, 2025

प्यू रिसर्च सर्वे: जगभरात वाढत्या धार्मिक राष्ट्रवादाची दाहकता

 

अलीकडेच प्यू रिसर्च सेंटर्स या संस्थेने जगभरात वाढता धार्मिक राष्ट्रवाद व त्याची देशानुरूप तुलना यावर संशोधनात्मक सर्वे केला. प्यू रिसर्चने हा सर्वे एकूण ३५ देशांमध्ये जानेवारी २०२४  पासून मे २०२४ पर्यंत करण्यात आला. या सर्वेनुसार जगभरात धार्मिक राष्ट्रवादाची होत असलेली वाढ ही एक जागतिक प्रवृत्ती  बनत चालली आहे. हा धार्मिक राष्ट्रवाद त्या त्या देशाची सद्यस्थिती व राजकारणाला प्रभावित करीत असून अशा देशात प्रभावी धर्मवादी नेतृत्वाचा उदय झाला आहे. बहुसंख्यांक धर्मवाद व राजकारण एकमेकाचे सहकारी बनू लागले असून ते धर्मनिरपेक्ष लोकशाहीला मारक ठरत आहे.

Sunday, January 26, 2025

मनुस्मृति का दहन! लेकिन आगे क्या?

 महाराष्ट्र में हर साल नियमित रूप से 25 दिसम्बर को मनुस्मृति नामक किताब को जलाया जाता है. मनुस्मृति का दाह संस्कार अब महाराष्ट्र के बाहर भी किया जा रहा है। डॉ. बाबासाहाब आंबेडकर  ने मनुस्मृति क्यों जलाई गई?. इसे समझने के लिए मनुस्मृति नामक किताब को पढ़ना जरुरी है। पढनेपर किताबमे छिपी हुई बाते पाठक के ध्यान में आ सकती है। उनमें से कुछ पाठक प्रतिक्रियावादी हो सकते हैं। यदी कोई पाठक धार्मिक प्रवृत्ति का हो, तो वह कहेगा की, मनुस्मृति एक धार्मिक ग्रंथ है. तदनुसार कार्य करना चाहिए। तथापि, जाब कोई व्यक्ति इस प्रकार की बात कहेगा, तब उसे सबसे पहले पुस्तक में लिखी सभी बातें अपने परिवार पर  उपकृत करनी चाहिए। तभी ऐसी प्रतिक्रिया को महत्व दिया जा सकता है।  

Sunday, January 12, 2025

मनुस्मृतीचे दहन ! परंतु पुढे काय?


भारतात दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी मनुस्मृती या पुस्तकाचे दहन करण्यात येते. महाराष्ट्रात हे दरवर्षी नित्यनेमाने होत असते. मनुस्मृतीचे दहन आता महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा करण्यात येते. या पुस्तकाचे दहन का केले जाते ? हे समजण्यासाठी मनुस्मृती हे पुस्तक वाचणे फार आवश्यक आहे. मनुस्मृती वाचल्यानंतर त्यात काय दडलेले आहे, हे वाचकाच्या ध्यानी येवू शकेल. त्यापैकी काही वाचक प्रतिक्रियावादी बनू शकतात. परंतु एखादा वाचक जैसे थे वादी प्रवृत्तीचा असेल तर तो म्हणेल कि, मनुस्मृती हे एक धर्मपुस्तक आहे. त्यानुसार वागलेच पाहिजे. मात्र, अशी प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीने पुस्तकात लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीप्रमाणे वर्तन करून प्रथम आपल्या कुटुंबावर ते बंधनकारक केले पाहिजे. तरच अशा प्रतिक्रियेला महत्व प्राप्त होवू शकेल.