Saturday, April 25, 2015

मंडल आयोग व ओबीसी चळवळ

मंडल आयोग म्हणजे काय? याचे सरळ उत्तर द्यायचे झाल्यास, मंडल आयोग हा धर्मामुळे मृतप्राय झालेल्या ओबीसीचा, त्यांची सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षती बघण्याचा आरसा होय. ओबीसीमध्ये  सामाजिक व राजकीय मागासलेपणाचा प्रतिशोध घेण्याची मानसिकता निर्माण करण्याचे कार्य करण्याबरोबरच जातीव्यवस्था व उच्चवर्णीयांचा सांस्कृतिक दहशतवाद हाच आमच्या मागासलेपणाच्या दुरावस्थेला कारणीभूत असल्याची जाणीव प्रथमताच मंडल आयोगामुळे झाली.

Tuesday, March 24, 2015

सम्राट अशोकाचे धम्मविषयक धोरण

जगाच्या इतिहासात ज्या ज्या सम्राटांनी आपल्या कर्तुत्वाची छाप पाडली त्या सम्राटामध्ये मौर्यवंशीय सम्राट अशोकाचे स्थान अविवादीत आहे. प्राचीन वा अर्वाचीन सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा चक्रवर्ती सम्राट होय. सम्राट अशोकाने भारतावर इ.स.पू. २७२ ते इ.स.पू. २३२ च्या दरम्यान राज्य केले. सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्याने पश्चिमेकडे अफगाणिस्तान  इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूर व केरळ पर्यंत आपला राज्य विस्तार केला होता. ५०,००,००० वर्गकिमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक व भारतीय खंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते.

Saturday, March 21, 2015

आम आदमी पक्षातील मनोमिलाप किती दिवस चालणार!

आम आदमी पार्टीचे बिज हे अण्णा आंदोलनातून उगवले. जनलोकपाल सारखे कायदे अमलात आणने, भ्रष्टाचाराचा महारोग व कमीशनबाजी नष्ट करण्याची अपेक्षा प्रस्थापित राजकीय पक्ष व नेते यांच्याकडून  करने हे मुर्खपनाचे आहे. ज्याला आपण चिखल समजतो त्या चिखलात उतरूनच हवे ते जनकायदे बनविता येतील. त्यासाठी नव्या राजकीय पक्षाची अनिवार्यता का व कशी आहे? हे अरविंद केजरीवाल, योगेन्द्र यादव व प्रशांत भूषण यानी अण्णा हजारेना पटवून सांगितले होते. परंतु राजकरणात सहभागी  न होता राजकारण्यांची जातकुळी कशी असते? हे अण्णा हजारेंना

Sunday, March 15, 2015

राजकीय सत्तेशिवाय जातीविहीन समाजरचना अशक्य: मा.कांशीराम

भारतीय राजकारणात बाबासाहेबानंतर जी पोकळी निर्माण झाली होती ति  मान्यवर कांशीरामजींच्या रुपाने काही प्रमाणात भरून निघायला फार मदत झाली. बहुजन समाजाला सत्ताधारी बनवायचे या एकेमेव ध्येयाने पछाडलेल्या कांशीरामजीना अनेक कूटनीतिक योजना आखाव्या लागल्या.  बाबासाहेबांचे मिशन निस्वार्थीपणे चालविण्यासाठी त्यांनी स्वत:वर काही बंधने लादून घेतली होती. त्यापैकी मी आयुष्यभर ब्रम्हचारी राहीन, आपले इप्सित साध्य होईपर्यंत कोणत्याही मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही व मांझी स्वत:ची कोणतीही संपत्ती राहणार नाही.
बाबासाहेबांचा “तुम्ही या देशाची शासनकर्ती जमात बना”, “राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे” हा संदेशच पंजाबमधील कांशीरामजीना मार्गदर्शक ठरला. त्यांनी बाबासाहेबांच्या राजकीय सत्ता हातात घेण्याच्या आदेशाला कार्यान्वित न करणा-या शोषित समाजात शासक बनण्याची महत्वाकांक्षा निर्माण केली. त्यांच्या कार्य व त्यागानेच बहुजन समाजात सत्तेत भागीदारी नव्हे तर सत्ताच हातात घेण्याची महत्वाकांक्षा वाढू लागली. त्यासाठी त्यांनी बाबासाहेबांचा  “जातीविनाश” हा कार्यक्रम काही काळापुरता बाजूला ठेवून जातीचेतना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. यामागे कांशीराजींचा तर्क असा होता की, जशजशा जाती चेतना वाढत जातील तशतशा परंपरागत वर्चस्ववादी जाती ह्या राजकीय दृष्ट्या दुर्बल होत जातील व त्यांची जागा ह्या खालच्या जाती घेतील. या त्यांच्या भूमिकेमुळे स्वकीयांच्या विरोधाला त्यांना समोर जावे लागले परंतु ते आपल्या ध्येयापासून यतकिंचीतही डगमगले नाही.
बाबासाहेबांना संपूर्ण जातीसंस्था नष्ट करून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करावयाची होती. जातीसंस्था कशा नष्ट करावयाच्या? यावर आंबेडकरवाद्यात अनेक मतभेद आहेत. बाबासाहेबांचे जातीनिर्मुलन तत्व कांशीरामजीना पूर्णपणे पटले होते परंतु ह्या जातीसंस्था कशा नष्ट करावयाच्या हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता.? कांशिरामजी म्हणतात, जब मैने जाती, जाती व्यवस्था और जातीय आचरण का गहराई से अध्ययन किया तो मेरी सोच मे ही परिवर्तन आ गया. मैने जाती का अध्ययन किताबोसे नही बल्की असली जिंदगी से किया. देश के कोने कोने से लोग बडे शहरोमे आते है. शहरोमे आते समय वे गावसे सबकुछ छोडकर आते है. लेकिन अपने साथ वे केवल खुदकी जात लेकर आते है. यावर कांशिरामजी म्हणतात, या लोकांना जर स्वत:च्या जाती एवढ्या प्रिय असतील तर अशा प्रिय असणा-या जातीना आम्ही कशा नष्ट करू शकतो? ही तर अशक्य कोटीतील बाब आहे. त्यामुळेच तात्कालिक स्वरुपात मी जाती विनाशाच्या संदर्भात विचार करने बंद केले.

जात ही अशी वस्तू नाही की  ति आमच्या सांगण्यामुळे एकदम नष्ट होईल. जातीव्यवस्था निर्माण करण्यामागे मनुवाद्यांचा मोठा स्वार्थ व गहन नीती दडलेली आहे. जोपर्यंत जातीव्यवस्था निर्माण करना-याचे उद्देश व स्वार्थ जिवंत आहेत तोपर्यंत आम्ही जाती विनाश करू शकत नाही. कारण जाती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी मनुवादी आटोकाट प्रयत्न करतील. मनुवादी लोक जातीचा वापर  स्वार्थासाठी करून घेत असतील तर आम्ही सुध्दा या जातीचा उपयोग आम्ही आमचा विकास व फायद्यासाठी का करू नये? मनुवाद्यापासून  जातीचा फायदा कसा घेतला पाहिजे हे आम्ही शिकून जातीवादाचे डाव मनुवाद्यावरच उलटविले पाहिजे.
कांशीराम म्हणतात, बाबासाहेबांनी जातीच्या आधारावरच अनुसूचित जाती-जनजाती लोकाना  राजनैतिक व सामाजिक अधिकार मिळवून दिले. बाबासाहेबानीच जातीचा वापर करीत १९३१-३२ मध्ये राउंड टेबल कान्फरन्समध्ये बहिष्कृत समाजासाठी वेगळ्या मतदार संघाची मागणी केली होती. त्यांनी अनु.जाती व जनजातीना जाती हत्याराचा वापर करण्याच्या टोकापर्यंत आणून ठेवले होते. एवढेच नव्हे तर शोषित व पिडीत जातीच्या आधारावर अन्य मागासवर्गीयांच्या जातीचा एक प्रवर्ग (ओबीसी) बनवायला सरकारला सांगितले होते. यावर सरकार ऐकत नाही असे दिसताच त्यांनी आपल्या मागणीसाठी मंत्रीपदाचा राजीनामा सुध्दा दिला होता.

कांशीरामजी म्हणतात, भारताची १० करोड लोकसंख्या ही घाणीच्या जागेत झोपडपट्ट्या बांधून राहण्यास मजबूर आहे. एवढेच नव्हे तर रस्ते व रेल्वे स्थानकावर आपापले बि-हाड ठेवून ते जीवन व्यतित करतात. हे १० कोटी लोक आपल्याच देशात शरणार्थी लोकासारखे राहतात. परंतु त्याकडे सरकारचे लक्षच जात नाही कारण हे लोक सरकारच्या जातीचे नाहीत. आज जातीव्यवस्था एवढी मजबूत आहे की हे शासक लोक आपल्या काश्मिरी पंडितासाठी अर्थसंकल्पात पुनर्वसनाची तरतूद करते. पाकिस्तानातून आलेल्या सिंधी लोकांना भारतात त्यांच्या व्यापार व उद्योगासाठी स्वत:हून सवलती देते. आणि हे सगळे जाती मुळेच घडून येते. कांशीराम म्हणतात शासक जातीच्या अशा वागनुकीतूनच मी बरेच काही शिकलो. म्हणूनच ज्या बहुजन समाजाचा जातीच्या आधारावर छळ व अपमान करण्यात आला. त्याच जातीचा आधार घेवून व तिला योग्य प्रकारे वापरून बहुजन समाजाला  अन्याय व शोषणमुक्त करता येईल या माझ्या विचारावर मी ठाम आहे. एक दिवस या देशातील जाती समाप्त होतील. परंतु जोपर्यंत या जाती अस्तित्वात आहेत, तोपर्यंत या जातीचा वापर समाजाच्या हितासाठी करण्यात आला पाहिजे.
जातीच्या वापरासंदर्भात कांशीराम म्हणतात, मैने जाती के शिकार लोगोंको संघटीत करके एक बहुजन समाज बनाया है और मै इस बहुजन समाज के लोगोंको बाबासाहाब आंबेडकर के मिशन को आगे बढाने के लिये प्रेरित किया हू. मेरे मिशन से कांग्रेस, भाजपा और मनुवादी लोग घबराये गये है. इस मिशन को रोकने की कोशिश मनुवादी लोग कर रहे है. ये लोग अपना खेल  खेल  रहे है और मै अपना खेल  खेल रहा हू. मुझे मनुवादियोको उन्हीके जाती हत्यारोसे मारना है. उसमे मैने मास्टरी हासिल कर लि है.

जाती निर्मिती हे मनुवादी व्यवस्थेचे षडयंत्र आहे. जर आम्हाला जातीव्यवस्था नष्ट करावयाची असेल तर अगोदर जातीचा फायदा घेणा-या मनुवाद्यांना रोकने आवश्यक आहे. जोपर्यंत जातीचा फायदा घेणारे अस्तित्वात असतील तोपर्यंत जातीव्यवस्था टिकून राहील व जातीच्या आधारावर बहुजन समाजाचे शोषण होत राहील. म्हणून जातीचा वापर बहुजन समाजाच्या फायद्यासाठी करून घेणे शिकले पाहिजे. जेव्हा बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशात वाढायला लागला तेव्हा बहुजन समाज पक्षाविरोधात कांग्रेसने जातीवादी प्रचार केला. बहुजन समाज पार्टी ही चामारांची पार्टी असा कांग्रेसने प्रचार केला. त्याचा परिणाम (फायदा) असा झाला की बहुजन समाज पार्टी चमारामध्ये अधिक लोकप्रिय झाली. बसपाच्या मतांची टक्केवारी २ टक्क्यावरून  सरळ २९ टक्क्यावर आली व बसपा एका राज्यात सत्ताधारी पक्ष म्हणून अस्तित्वात आला. बसपाला हे यश जातीचा योग्य रीत्या वापर करण्यामुळे झाला.
आरक्षणाच्या संदर्भात कांशीराम म्हणतात, मै अपनी जिम्मेदारी समजता हू. मै अपने लोगोंको आरक्षण लेनेके लिये नही बल्की दुसरोको आरक्षण देणे लायक बनाने मे विश्वास रखता हू. बात कहने और समजने के लिये तो आसान है. आरक्षण देणे लायक कौण होता है? केवळ हुक्मरान ही दुसरोको आरक्षण दे सकते हैइसीलिये हमे शासक बनना है. केवळ याही एक उपाय है. बहुजन समाज को शासक बनणे के पहिले मिशनरी समाज समाज बनणा आवश्यक है. याही मिशनरी लोग बाबासाहाब का सपना साकार कर सकते है. आंबेडकरी चळवळीतून आमदार /खासदार/अधिकारी व न्यायाधीश बनणे आवश्यक आहे.. आंबेडकरी मिशन चालविणारे आमदार वा खासदार कान्ग्र्स वा भाजपा देवू शकणार नाही  अये आमदार वा खासदार केवळ बसपा देवू शकते याच साठी मी मुंबई सोडून लखनऊ मध्ये ठान मांडले आहे. कारण महाराष्ट्राचे आंबेडकरी समाजाचे लोक स्वत:च्या पक्षाच्या माध्यमातून आमदार खासदार बनणे व बनविणे पसंत करीत नाही. ते कांग्रेसच्या पाठीमागे जाणे पसंत करतात. थोड्या स्वार्थासाठी ते आपल्या किमती मताला (वोट) विकून टाकतात. ते म्हणतात, बाबासाहाब का संघर्ष जाती की शिकार हुये सभी जाती के लिये था. जाती की शिकार केवळ महार, चमार, माला या परिहा ही नही थे. ऐसी ६००० जातीया है. यही ६००० जातीया बहुजन समाज को शासक बना सकती है. ये सब जातीया आपस मे झगडती है तब अल्पसंख्यक  बनकर रह जाती है. अगर इनमे भाईचारा बनाने की कोशिश की जाये तो ये जातीया संघटीत होगी. ऐसे लोगो की संख्या भारत मे ८५ परसेंट है. सत्ताधारी समाज बनणे के लिये यह सबसे बडी ताकद बन सकती है. आज मैने बसपा के साथ केवळ ६००० जातीया जोडी है. इसही आधारपर बसपा एक राज्य मे सत्ता पर बैठी है और देश मे तिसरे नंबर की राष्ट्रीय पार्टी बन गयी है. जाती की शिकार हुई सभी जातीयो को एकसाथ जोडकर हम राजनैतिक सत्ता कब्जा कर सकते है और देश के शासक बन सकते है.

उत्तर प्रदेशात सत्तेची चाबी मिळाल्याबरोबर गौतम बुद्ध, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या नावाने विद्यापीठे बनविण्यात आली. या व्यतिरिक्त महापुरुषांच्या नावे १७ जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. महापुरुषांच्या नावे मोठमोठे पार्क बनविण्यात आले. मनुवाद्यांनी आमचा इतिहास पुसून टाकला होता. तो इतिहास पुनर्जिवीत करण्यात आला. समाजाच्या आर्थिक विकासासाठी योजना आखण्यात आल्या. त्यासाठी उत्तर प्रदेशाच्या  आंबेडकरवाद्याना कसल्याही प्रकारचे आंदोलन वा मागणी करावी लागली नाही. यातून हेच सिद्ध होते की जातीचा वापर करून राजकीय सत्ता आपल्या हातात घेवून आपण आपल्या समाजाचा आत्मसन्मान व विकास करू शकतो. महापुरुषांच्या दिशानिर्देशानुसार सांस्कृतीकरनाची प्रक्रिया सहज पार पाडू शकतो. सम्राट अशोकाच्या भारत निर्माणापासून आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही.

भारतातील काही बुद्धिवादी मार्क्सवाद, समाजवाद व साम्यवाद यात त्यांच्या समस्यांचे समाधान शोधताना दिसतात परंतु माझ्या मते मनुवादासमोर सगळे वाद अयशस्वी होतात.  म्हणून जातीचे अस्तित्व लक्षात घेवून आंबेडकरी विचाराला कूटनीतिक वळण देवून नव्या प्रयोगाला सामोरे जाणे ही काळाची गरज आहे.  शेवटी प्रश्न पडतो जातीचा वापर करणारे जाती का नष्ट करतील? परंतु अत्याचाराला बळी पडलेले लोकच जाती व्यवस्था नष्ट करू करतील. परंतु त्यासाठी पिडीत लोकांनी शासक बनणे आवश्यक आहे. प्रस्थापित शासन व्यवस्थेकडून बहुजन समाजाच्या सामाजिक न्याय व आर्थिक उन्नतीच्या मुद्यांना बगल देण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहेत. अशा अवस्थेत आम्ही आंबेडकरवादी कधीपर्यंत विघटीत राहायचे? म्हणून बहुजनांना सत्तास्थानी बघू इच्छिणाऱ्या कांशीरामजींच्या तत्वावर चालनेच इष्ट राहील.

बापू राऊत
९२२४३४३४६४

Monday, March 2, 2015

लालच के चंगुल में फसे है आंबेडकरवादी !


बाबासाहबने साफ़ कहा था की शोषितों तथा उत्पीडितो की राजनैतिक शक्तिको लगातार सामाजिक आंदोलनोका हिस्सा बनना चाहिए. इससे वंचितोंकी सामाजिकी में बदलाव तो आता ही है, उनकी राजनैतिक चेतना का भी विस्तार होता है. लेकिन सामाजिक आंदोलन करना हम आंबेडकरवादी भूल गए और आज राजनितिक गुटो में ऐसे बट गए, जहा हमारा पूरा सम्मान दाव पे लग गया है.
डाक्टर बाबासाहब आंबेडकर के नितियोपर चलनेवाले लोगोंको मुख्यतया आंबेडकरवादी कहा जाता है. आंबेडकरवादी बनने लिए किसी जात विशेष का होना कोई जरुरी नहीं. भारत के अनेक लोग

Monday, February 9, 2015

गांधीजीच्या विचारांची रस्सीखेच

गांधीजीला अनेकांनी वेगवेगळया भिंगाच्या चष्म्यातून  बघितले आहे. महात्मा गांधी यांना कांग्रेस पक्ष, सर्वोदयी व सोईच्या व्यवस्थापुरक मनसबदारानी विश्वपुरुष केले आहे. गांधींच्या महान अशा अहिंसक सत्याग्रहाच्या बळावर देशाला स्वातंत्र्य मिळाले याचा सर्वोदयी, काग्रेस व त्यांच्या विचाराचा ज्या संस्कृतीला फायदा पोहोचत होता अशांनी गांधीजींची अधिकच स्तुती केली. परंतु बदलेली जागतिक परिस्थिती, दुसऱ्या महायुद्धानंतर कमकुवत झालेला ब्रिटन, अॅटली या उदारमतवाद्याचे आलेले सरकार व स्वातंत्र्यविरांमुळे हादरलेले ब्रिटीश या मुद्यांचा देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मोठे योगदान होते याचाही विचार व्हायला हवा. समाजवाद्याबरोबर आता मोदीही गांधींच्या रंगात रंगू लागले आहेत.

Saturday, February 7, 2015

स्वाभिमानी व साहसी जीतनराज मांझी

महाराष्ट्रातील व इतर राज्यातील दलित जनतेने आजपर्यंत मायावती वगळता अनेक स्वार्थी दलित नेत्यांचे पायचाटू, लालची व समाजाची फसवणूक करणारे राजकारण बघितले आहे. जनतेला स्वार्थासाठी आपले इमान विकणारे दलित नेते बघण्याची सवयच झाली होती. परंतु याला आता छेद गेलाय. बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आपण कोणाचाही रबरस्टांप नसल्याचे दाखवून दिले. दलितांचे कान पकडून कोठेही बसवून ठेवण्याची सवय लागलेल्या प्रस्थापित वर्णवादी सवर्ण नेत्यासाठी हा मोठा झटका असून यातून आमचे इतर दलित नेते धडा घेतील की नाही? हा मोठा प्रश्नच आहे. रामदास आठवले, रामविलास पासवान व उदित राज हे या लालची व स्वार्थी नेत्यांना आपले नेते
म्हणून जनतेने कधीच नाकारले. मुख्यमंत्री मांझी प्रशासन व सत्ता राबविण्यात कितपत यशस्वी झाले? हा वादाचा विषय असला तरी आज त्याची चर्चा करण्याची गरज नाही. कारण मुख्यमंत्री मांझीना योग्य प्रकारे प्रशासन करू न देण्याची त्यांच्याच मंत्रिमंडळातील सवर्ण नेत्यांनी पण केला होता.
सामाजिक व राजकीयदृष्ट्या सामान्य दलितांची मान उंच व्हावी याच प्रवर्गातील मांझी यांची कृती आहे. त्यांच्या कृत्याने दलितांना एक बळ प्राप्त झाले असून वेळ आल्यास तो आपला इंगाही दाखवू शकतो हे मांझीने दाखवून दिले आहे. मुख्य प्रवाहातील नेत्यांना दलीत हे केवळ वापरून फेकण्यासाठीच असतात हा आजवरचा भ्रम एकदाचा तुटला हे बरेच झाले. राजकारणातील मग ते नितीशकुमार असो वा लालूप्रसाद वा सोनिया गांधी असो वा मोदी. आम्हाला भीक नको, अधिकार हवेत याचा आजचा आवाज म्हणजे जीतनराम मांझी होत. बिहारमध्ये मांझी एकटे नाहीत सारा दलित समाज त्यांच्यापाठीमागे उभा राहील कारण आज ते सामान्य दलितांचा आवाज बनले आहेत. जीतनराम हे बामसेफी विचारातून बनलेले नेते आहेत. त्यांच्याप्रमाणेच वेस्ट बंगाल मधील एक खासदार संसदेत हिंदू वर्णव्यवस्थेवर तुटून पडत असल्याचे दिसते. यावरून भविष्यात दलित चळवळीला स्वाभिमानी नेते मिळू शकतील असा आशावाद निर्माण झालाय.

बापू राऊत

९२२४३४३४६४

Wednesday, January 28, 2015

राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष व समाजवाद शब्द काढण्याचे षडयंत्र

भारतातील जनता देशाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असतानाच केंद्र सरकारच्या प्रजासत्ताक दिनाविषयीच्या जाहिरातीं विविध वर्तमानपत्रात झळकल्या. त्या जाहिरातीमध्ये संविधानाची उद्देशिका दाखविताना संविधानाच्या सरनाम्यातील मूळ धर्मनिरपेक्षसमाजवादी हे दोन शब्द वगळून त्याची जाहिरात करण्यात आली. संविधानाच्या सरनाम्यातून हे दोन शब्द वगळणे म्हणजेच सध्याचे सरकार हे या देशाला एक धर्मनिरपेक्ष व समाजवादी मानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांना या देशाला एक “धर्मनिरपेक्ष देश” म्हणून मिळालेली जगमान्यता घालवून त्या ऐवजी एक “धार्मिक देश” म्हणून  प्रस्थापना करावयाची आहे. याचाच अर्थ विकासाच्या नावावर

Saturday, January 24, 2015

“चैत्यभूमी” नव्या क्रांतीचे एक विश्वकेंद्र

ज्या भूमीवर मानवाला मानवतेचे चैत्यन्य व स्फुलिंग मिळते, माणूस म्हणून समतेची मानवसेवा करायला प्रवर्ग होतो ती “चैत्यभूमी”. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या दादर भागात विवेकवाद व  विज्ञाननिष्ठा जपण्याचा मंत्र देणारी चैत्यभूमी. एक अशी भूमी जिथे दरवर्षी देश विदेशाच्या काना-कोपर्‍यातून आलेले लाखो लोक एका अनन्यसाधारण व्यक्तीला लहान मुलापासून तर आबालवृध्दा पर्यंत पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून अगदी शिस्तीमध्ये गंभीर व भारदस्त मनाने आदरांजली वाहतात तर दुसरीकडे काही काळ स्तब्ध राहून निळ्याभोर समुद्राच्या लाटा आदरांजली वाहत असतात. त्यातच भारताच्या अफाट प्रगतीची साक्ष देणारा सी-लिंक दुरूनच दर्शन घेत त्यांना सलाम मारीत असतो. 

Wednesday, January 14, 2015

तालिबानी हिंदुओका क्या करे?

भारत के कुछ कट्टर हिंदू देश में तालिबानी भारत का निर्माण कर रहे है. पूर्वकाल में भारत के लोगोने अफगानिस्थान में तालिबानियोका और पाकिस्तान में मुजाहिद्दीयोका विरोध किया था. उनके कट्टरवाद पर हल्ला किया था. विश्व में भारतकी मजबूत लोकशाही का हवाला दिया जाता है. विश्व के दूसरे इलाके में आतंकवाद का घटनाओ पर भारत सरकार तुरंत प्रतिक्रिया देती है. मगर आज भारत में क्या हो रहा है? हिंदू संघटन भारत को सदियों पीछे ढकेलनेकी कोशिश कर रहे है. तामिलनाडू के लेखक पेरूमल मुरुगन ने हिंदू संघटनोके दबाव में  अपने  फेसबुक वॉल पर "लेखक पेरुमल मुरुगन नहीं रहा. वो भगवान नहीं है. इसलिए वो दोबारा लिखना नहीं शुरू करेगा. अब सिर्फ एक शिक्षक पी मुरुगन जिंदा रहेगा." ये लिखनेको मजबूर किया है. मुरुगन ने 2010 में “माथोरुभागन” नामक तामिल भाषा में किताब लिखी थी.
हिंदू संघटन लेखकों के अभिव्यक्ति की आजादी पर अंकुश लगाना चाहते है. लगता है, ये हिंदू संघठनही  देश चला रहे है. क्योकि हमारे बोलबच्चन प्रधानमत्रीजी इनके खिलाफ आवाजतक नहीं निकाल पा रहे है. वे मनमोहनसिंग को गूंगा प्रधानमंत्री कहते थे. अब खुद मोदीजी “गूंगेपन” की भूमिका अदा करते दिखाई दे रहे है. देश के हिंदू लेखकों को अगर अपनी बात कहने का अधिकार नहीं है, तो उन्हें अपना धर्म बदल देना चाहिए. लेकिन ऐसे लेखकोने केवल खुद को नहीं बल्की पूरे अपने समाज को साथ में लेकर धर्मपरिवर्तन कर देना चाहिए. जिन कारणों से इस देश में अभीतक धर्मांतरण हुवे है, वे कारण अभी भी मौजूद है.
लेकिन फिर भी प्रश्न उठता है, ये तालिबानी हिन्दुओका करे क्या? क्योकि ये तालिबानी हिंदू  देश में गृहयुध्द होने जैसी परिस्थितिया पैदा कर रहे है. हर देशवासियो को इस बारे में सोचना होगा. रामासामी पेरियार के तामिलानाडू स्टेट में अगर हिन्दुवादी संघटन अभिव्यक्ती स्वतंत्रता पर हल्ला बोल रहे, तो वे देश के हर क्षेत्र में ये हिंदू तालिबानी अभिव्यक्ती स्वतंत्रतापर हल्ला कर सकते है. 

By Bapu Raut

Friday, January 9, 2015

संघ ही प्रतिगामी विचारांची संघटना : प्रा. सुरेश द्वादशीवार

'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकासाठी साहित्यिक श्री. द्वादशीवार यांची कल्पना जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
कल्पना जोशी: रा. स्व. संघाला चळवळ म्हणावं का इतर उजव्या संघटनांसारखीच ही एक संघटना असं समजावं?
सुरेश द्वादशीवार : चळवळ नाही, संघटनाच. मुळात माणसाच्या जीवनात दोन प्रकारच्या निष्ठा असतात. एक जन्मदत्त निष्ठा. त्याला primordial loyalty म्हणतात. ह्या जन्मत: प्राप्त होतात. त्या मिळवाव्या लागत

Wednesday, December 31, 2014

विवेक जागृत करू पाहणारा “ पिके ”

अध्यात्म हा मानवाला गुढतेकडे नेणारा मार्ग आहे. तो माणसातील स्वत्व हिरावून घेतो. माणसाला वाटत असत अध्यात्मवाद हा माझ्या सर्व समस्याच उत्तर आहे. म्हणून तो पुंजापाठ, मंत्रपठण, चालीसा, देवाला नैवद्य दाखविणे असे प्रकार करीत असतो. या सर्व गोष्टी केल्याने व त्यात तथ्य असेल चुटकीसरशी जीवनामरनाचे प्रश्न का सुटत नाहीत? माणसाला कष्ट का करावी लागतात?. कार, संगणक, ध्वनीयंत्रना, दूरदर्शन, मोबाईल्स यांची निर्मिती अध्यात्माने केली आहे का?. याचा विचारही माणूस करताना दिसत नाही. आपण ज्या सुख व समृद्धीसाठी तळमळतो,  नित्यनेमाने पूजापाठ करतो,

Friday, December 26, 2014

घरवापसी कोणाची: मूळनिवासींची कि विदेशींयांची?

भारतामध्ये जेव्हापासून राजकीय सत्ताबदल झाला तेव्हापासून उघडपणे धर्मांतर करण्याचे धाडसत्र सुरु झाले. संघ व त्यांच्या विविध शाखा यांच्यात नवीन उर्जा निर्माण झालेली दिसते. संघ आजपर्यंत दबा धरून गुप्तपणे बजरंग दल, विहिप व दुर्गावाहिनी यांच्यासारख्या अनेक संघटनामार्फत आक्रमकपणे हिंदुत्वाच्या पडद्यामागून सनातन धर्माच्या पुनरुथ्थानाचे काम करायचा. चुलीवर झाकण ठेवलेल्या गरम पातेल्यातील पाण्याची वाफ जशी आतमध्येच खवळत गुदमुरत असते, बाहेर येण्याचा तिचा सतत प्रयत्न असतो. परंतु पातेल्याचे झाकण उघडताच त्याची वाफ भपकन बाहेर येवून भाजून काढते. काहीसे तसेच  संघाच्या

Sunday, December 21, 2014

कोकणातील दलित चळवळ: परिणाम व सद्यस्थिती


महाराष्ट्रातील दलित चळवळीचे विभागवार अध्ययन करायचे झाल्यास तिचे मुख्यत: पाच विभाग करता येतात. विदर्भ, मराठवाडा, कोकण-मुंबई इलाका, प.महाराष्ट्र व खानदेश हे ते विभाग. प्रत्येक विभागाचा स्वतंत्र एक इतिहास आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दलितांचे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक प्रश्न हे एकसारखेच होते. एकीकडे सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक जातीयतेविरुध्द लढतानाच दुसरीकडे आर्थिक विषमतेचे लढेही लढावे लागले. कोकण-मुंबई इलाखा वगळता गायरान जमिनीचा लढा तर कोकणातील प्रचलित खोत पध्दतीच्या विरोधात अनेक परिषदा घेवून आंदोलने करावी लागली.

Tuesday, December 9, 2014

भगवतगीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी हे संघीय षडयंत्र

नरेंद्र मोदीने “गुजरात” माडेलचे गाजर सर्व देशवाशियाना दाखवून संपूर्ण देशाचा विकास हा गुजरात प्रमाणे करु, परदेशातील काळा पैसा देशात आणून भ्रष्टाचाराची पाळेमुळे नष्ट करू, भ्रष्टाचा-यांना तुरुंगात टाकण्यात येईल, देशातील प्रत्येक तरुणाला रोजगाराची हमी देण्यात येईल असे अनेक आश्वासन व आमिषे जनतेला दिले होते. सोबतच त्यांनी आपण मागास जातीचे आहोत, एका मागास समाजाच्या माणसाला प्रधानमंत्री बनविणे हे तुमच्याच हाती आहे असे भावनिक आवाहन त्यांनी ओबीसींना करीत आपण चायवाला असल्याचे सांगत या देशातील गरिबांचेही मनेही जिंकली जिंकली. या आश्वासनाच्या बळावरच लोकांनी मोदीला न भूतो न भविष्यती

Wednesday, December 3, 2014

कर्तुत्वशुन्य नेतृत्व व दिशाहीन आंबेडकरी चळवळ

बहुजन समाज जितका दुभंगुन राहील तितकाच तो अधिकाधीक दुबळा होईल, त्याच्या दुबळेपनामुळे तो आपल्याला हाकवन्याजोगा होत राहील व नंतर त्याला पाहिजे त्या दिशेने वळवता येईल.  सत्ताधा-यांचे असे हे एक सूत्र असते. सत्ता हि शासन, प्रशासन व प्रशासनामार्फत जनतेला कंट्रोल करण्याचे साधन असते. याबरोबरच ती समाजव्यवस्था, धर्म व अर्थव्यवस्थेवरही वर्चस्व गाजवीत असते. त्यामुळेच सत्ता हि सत्ताधा-यासाठी सर्वस्व असते. म्हणून वर्चस्वाच हे गाजर नेहमी आपल्या हातात ठेवण्यासाठी सत्ताधारी लोक वेगवेगळी माध्यम शोधीत असतात. भारतात धर्म, देव व संस्कृती हि त्यांची माध्यमे तर आहेतच परंतु बहुजनात लाचार व स्वार्थी लोकांचा समूह निर्माण करून त्यांचा ते आपल्या सोयीसाठी माध्यम म्हणून वापर करीत असतात.

Sunday, November 23, 2014

येथे नक्षलवादी सुबक बनवून मिळतील -ले. संजय पवार (लोकसत्ता दीनांक.२३.११.२०१४)

lok11प्रभु भल कीन्ह मोहि सिख दीन्ही। मरजादा पुनि तुम्हरी कीन्ही॥
ढोल गँवार शूद्र पसू नारी। सकल ताडना के अधिकारी॥
(सुंदराखंड। तुलसीदासकृत 'रामचरितमानस'मधील एक चौपाई)
संत तुलसीदासाच्या रामचरितमानसात 'ताडना'चे म्हणजेच बडविण्याचे अधिकारी म्हणजेच अलीकडच्या शासकीय भाषेत 'लाभार्थी' कोण? तर ढोल, गँवार म्हणजे अशिक्षित, शूद्र म्हणजे अस्पृश्य जाती, पशू म्हणजे प्राणी आणि नारी म्हणजे स्त्री! ('उठता लाथ, बसता बुक्की' हा त्याचा पुढचा अवतार असावा!) नेहमीप्रमाणे तुलसीदासाचा 'ताडना' म्हणजे 'तारणे' असा असलेला खरा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावून 'ताडना' म्हणजे 'बडविणे' असं पसरवून तुलसीदास व रामचरितमानस नाहक बदनाम केलंय, असा युक्तिवाद काही लोक करतात. अशिक्षित, शूद्र, पशू, नारी यांना 'ताडना' म्हणजे 'तारणे' समजू शकतो; पण मग 'ढोल' कसा 'तारणार' आणि कशासाठी?

Thursday, November 13, 2014

मोदीच्या बौध्द धर्म प्रेमामागील वास्तव (लोकमत: पुण्याप्रसून वाजपेई)

जपानच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी क्योटो येथील तोजी बौद्ध मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी किंकाकुजी बौद्ध मंदिरालाही भेट दिली. याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात नेपाळ येथे सार्क राष्ट्रांची परिषद होणार आहेस त्याही वेळी ते काठमांडू येथील बौद्धनाथ किंवा स्वयंभूनाथ स्तुपाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. तेथे अमनिभा मोनॅस्टरीला भेट देण्याची इच्छा ते व्यक्त करण्याची शक्यता आहे. हे सर्व उगाचच घडत नाही. त्यामागे निश्चित असा हेतू आहे. मोदी यांनी सर्वप्रथम भूतानला भेट दिली त्यामागेसुद्धा त्यांचा असाच निश्चित हेतूृ होता. ज्या-ज्या राष्ट्रांत बौद्ध धर्माचा प्रसार झाला आहे आणि जेथील सरकारे बौद्ध धर्माने प्रभावित आहेत, त्या-त्या राष्ट्रांना ते जाणीवपूर्वक भेटी देत आहेत. या राष्ट्रांसोबत नवीन नातेसंबंध निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नागपूरच्या आंबेडकरवादी जनतेपासून उत्तर प्रदेशातील मायावतीसारख्या दलित नेत्यांना मोदींना बौद्ध धर्माचे असे अचानक प्रेम का वाटत आहे, हा प्रश्न सतावतो आहे. बौद्ध धर्माने प्रभावित राष्ट्रांशी असलेल्या संबंधांना नवी व्याप्ती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संघ परिवाराचा विस्तार करण्यासाठी गोळवलकर गुरुजींनी जी शिकवण दिली होती, तिचे तर मोदी अनुसरण करीत नसावेत?

Wednesday, November 12, 2014

"उध्दव ठाकरे" तुम्ही चुकलातच !

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकानंतर केवळ महाराष्ट्रातील जनतेचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे होते. महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल हाती येवू लागताच व या निकालात आपल्या हातामध्ये काहीच लागणार नाही याची जाणीव होताच चाणाक्ष शरद पवाराने आपली राजकीय खेळी खेळत भाजपाने पाठिंबा न मागताच व काहीही अटी न लावताच बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. हा शरद पवारांचा धूर्तपणा केवळ आपल्या पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना वाचविण्याचा केविलवाणा केलेला प्रयत्न होता. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या एकूण जागा बघता व
निवडणूकपूर्व परिस्थिती लक्षात घेता निवडणूक निकालानंतरच उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षात बसण्याची घोषणा करायला पाहिजे होती. असे झाले असते तर भाजपाला तुमच्याकडे मदतीची याचना करत यावे लागले असते.
जसजसा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय कुटनितीचा संपूर्ण अभाव दिसू लागला तसतसा भाजपाच्या नेत्यांनी गुगली टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शेवटपर्यंत भाजापा नेत्यांनी झुलत ठेवले. या तू-तू मै-मै च्या खेळात भाजपा यशस्वी झाली परंतु यात उद्धव ठाकरे व शिवसेनेचा पूर्णत: भाजीपाला झाला. बाळ ठाकरेच्या व्यक्तिमत्वाला साजेल असा वारसा मिळाला नाही असे लोकही कुजबुजू लागले. केविलवाण्या परिस्थितीत उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांच्या दिल्लीवारी करीत राहिले. दिल्लीत पोहोचल्यावर शिवसेनेच्या नेत्यांना भाजपाचा कोणताही नेता भेट देत नव्हता. तसे शिवसेनेचे नेते माघारी मुंबईमध्ये परत येत होते. हा सारा तमाशा महाराष्ट्रातील मराठी माणूस पहात होता. हे सारे कशासाठी होत होते?. सत्तेची हाव, सत्तेची मदलालसा व सत्तेतून मिळणारा अतोनात पैसा यासाठी हा सगळा खेळ होता. हे एव्हाना लोकांनाही कळून चुकले होते. म्हणून शिवसेना व त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर विनोद व चुटकुल्यांचा वर्षाव होत होता. सत्तेसाठीच्या या बावळटपणामुळे उद्धव ठाकरे यांचा राजकीय कमकुवतपणा मात्र उघड झाला हे निश्चित.
सामान्य शिवसैनिकांना नेत्यांच्या अशा बावळटपणाची सवय नव्हती. कारण आजपर्यंतचा त्यांचा नेता असलेला बाळासाहेब ठाकरे हा कोणाला शरण जाणारा नेता नव्हता. बाळासाहेब ठाकरे खंबीर नेते होते (बाळासाहेब ठाकरेचे विचार पटत नसले तरी). एकदा त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला कि तो त्यांचा शेवटचा शब्द असायचा व त्यानंतर होणा-या परिणामाची ते पर्वा करीत नसत. हा ठाकरीबाणा उद्धव ठाकरेंना जपता आला नाही. नरेंद्र मोदी, अमित शहा व संघ यांना देशातील प्रादेशिक पक्ष संपवायचे असून देशात द्विदल पध्दती म्हणजे देशात दोनच राष्ट्रीय पक्ष ठेवायचे आहे. त्या दिशेने वाटचाल चालू असून कांग्रेसलाही ते हवेच आहे. असे झाले तर या देशाची सत्ता हि नेहमी आलटून पालटून उच्च वर्णीय ब्राम्हण व भांडवलदार बनियाकडेच राहील. हे दोन्ही पक्ष बहुजन समाजात आपले दलाल व पिट्टू तयार करतील व त्यांच्याद्वारे बहुजन समाजाला काबूत ठेवतील. येणा-या काळात हे अधिक स्पष्ट होईल.
बाळ ठाकरे नंतर शिवसेना संपेल असे म्हणणारे विचारवंत शरद पवार यांच्या नंतर राष्ट्रवादी पक्ष जमीनदोस्त होईल असे भाकीत करणार नाहीत. कारण जातीवादी राजकारणात मराठ्यांचा पक्ष म्हणून पश्चिम महाराष्ट्रात तरी त्याचे अस्तित्व कायम असेल. आता उद्धव ठाकरेंची खरी कसरत आहे ती मुंबईच्या महापालिकेवर शिवसेनाचा झेंडा कायम ठेवण्याची. विधानसभेचा निकाल बघता शिवसेनेला ते शक्य होणार नाही असेच चित्र दिसते. आजपर्यंत शिवसेनेला मिळणारी गुजराती, मारवाडी व उत्तर भारतीय मते हि भाजपकडे वळतील. त्यातच मराठी मते हि मनसे, शिवसेना व राष्ट्रवादी अशा सर्व पक्षात विभाजित होतील. त्यामुळे भाजपाचा भगवा जय श्रीरामाच्या घोषणेत मुंबई महापालिकेवर फडकण्याची अधिक शक्यता आहे. अशा परिस्थिती मध्ये उध्दव ठाकरे यांची परत कसोटी लागणार आहे. कारण भाजप हा पक्ष कोणाशीही युती करणार नाही व स्वतंत्रपणे लढेल व त्यासाठी ते कामालाही लागलेले दिसतात.
आज राजकीय सत्तेशिवाय कोणीही जगू शकू नाही कारण राजकीय सत्ता हि आजची महाशक्ती झाली आहे. राजकीय विचारधारेची सगळ्यांनीच ऐसितैसी केली आहे. कांग्रेसकडे कोणतीच अशी विचारधारा नाही. त्यांच्या राज्यात जशी तालिबानी हिंदू धर्मांधता वाढली व संघाच्या कार्याला  आश्रय मिळतो तसाच ते  मुस्लीम मुलतत्ववादाला अभय देतात. कांग्रेसवाले फुले आंबेडकराचे नाव घेतात परंतु त्यांची कृती हि या महापुरुषांच्या विचाराविरोधीच असते. दलित जनतेच्या अज्ञानाचा व त्यांच्या भावभावनेचा जसा दलित नेते व संघटना गैरफायदा घेतात तसाच फायदा आता इतर सर्व पक्ष घ्यायला लागले आहेत.
ओबीसींची शिवसेनेने आतापर्यंत फसवणूकच केली. मंडल आयोग अंमलबजावणी व जातीगत जनगणना ह्या ओबीसीच्या मुख्य मागण्या होत्या. जनगणनेच्या आधारावरच मंडलची टक्केवारी ठरायची होती. ओबीसीच्या ग्राह्य मागण्यांचा त्यांनी कधी विचारच केला नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेने ओबीसीची पूर्णत: फसवणूक केली. उद्धव ठाकरे हे ओबीसींच्या मागण्याची आतातरी दख्खल घेतील कि नाही? कि नवा मुद्दा शोधून परत ओबीसींची फरफड करतील हे येणारा काळच सांगेल. लेख संपविताना एका मुद्याची दखल घेणे फार गरजेचे आहे, तो म्हणजे या देशात साधू, संत-समागम व सत्संग, मंदिरे यांचा झालेला सुळसुळाट. या साधू संतांनीच भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवून देण्यात सिहाचा वाटा घेतला आहे. रामदेव, आसाराम, श्री श्री रविशंकर, रामपाल, डेरा सच्चा सौदा, नरेंद्र महाराज अशा अनेक साधूंचे करोडो भक्त या देशात विखुरले आहेत. या साधूंच्या आदेशाबाहेर हे भक्त कधीच जात नाहीत. हे साधू ज्याला पाठिंबा देतील ते या देशात सत्ताधारी होतील. संत व सत्संग हि संघाची निर्मिती आहे. त्यामुळे लोकशाहीला नवा धोका निर्माण झाला आहे. दुसरा धोका हा मिडिया ( वर्तमानपत्रे व टीव्ही) कडून आहे. निवडणुका ह्या मीडियासाठी पैसा कमाविण्याचा धंदा झाला आहे. खोटी माहिती सांगण्यात व सत्य लपविण्यात हा मिडिया तरबेज झाला आहे. मीडियाची नैतिकता लयाला गेली असून तो भांडवलवादी व संघवादी झाला आहे. त्यामुळे तो आता लोकशाहीचा चौथा खांब राहिला नाही याची दखल घेणे गरजेचे आहे.
लेख संपविताना ब्रेकिंग न्यूज आली, महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपाने आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले. नाईलाजास्त्व  शिवसेनेला विरोधी पक्ष म्हणून बसावे लागत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत भाजापाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेनी केला. मोडेन पण वाकणार नाही, अफझल खानाला व त्याच्या फौजेला धडा शिकवूच अशा वल्गना करणा-या उद्धव ठाकरेचे आज पूर्णत: हसू झाले. त्यामुळेच म्हणावेसे वाटते उध्दव ठाकरे तुम्ही चुकलातच !

बापू राऊत

९२२४३४३४६४