Wednesday, July 17, 2013

रामासामी पेरियार:दक्षिणेतील महात्मा फुले

 देशाच्या स्वातंत्र्य पूर्व राजकारणावर उत्तर भारतीय ब्राम्हण समाज, हिंदू महासभा, रा.स्व.संघ या गटाचे  अधिपत्य होते. ब्राम्हीण व जमीनदारांच्या दाता पक्षाचे नाव होते भारतीय राष्ट्रीय कांग्रेस हे. एकूणच ब्राम्हणी व भांडवलवादी मानसिकतेच्या वृत्तीचा वावर या कांग्रेसी संघटनेत होता. अशा वातावरणात दक्षिण भारतात ( विशेषता: तामिळनाडू व केरळ) रामासामी पेरियार यांनी ब्राम्हणी मनोवृत्तीला आवाहन देण्याचे कार्य केले. आर्यप्रणित ब्राम्हणी वर्चस्व व ते टिकवून ठेवण्यासाठी धडपडणारे कांग्रेसमधील कट्टर हिंदुवादी यांना उत्क्रांत  होवू न देण्याचे सारे श्रेय रामासामी पेरियार यांना जाते. द्रविडी समाज हा गणप्रधान समाज होता परंतु आर्याच्या वर्णाश्रम संस्कृतीने गणसंस्कृतीवर मात केली होती. परंतु खोलवर रुजलेल्या द्रविडीयन संस्कृतीला ब्राम्हणी वर्चस्व कधीही मान्य झाले नव्हते. त्यामुळे उत्तरेकडून आलेल्या आर्य संस्कृती विरुध्द द्रविडांनी दंड थोपटले.

Monday, July 15, 2013

कट्टर धर्मवाद्यापुढे सरकारने टेकले घुटने

अंधश्रध्दा निर्मूलनाचा कायदा या महाराष्ट्रात आता होणे नाही हे एकंदरीत परिस्थितीवरून दिसते आहे. कांग्रेस – राष्ट्रवादी सरकार व त्यांची विचारधारा ही भाजपा –शिवसेना या पक्षापेक्षा वेगळी नाही हे यातून सिध्द होते. या सरकारने कट्टर धर्मवाद्यापुढे सपशेल लोटांगण घातले आहे. कांग्रेस व राष्ट्रवादीने केवळ पुरोगामीपणाचा बुरखा घातला आहे परंतु अंतस्थ तेही पक्के धार्मिक कट्टरवादी आहेत हे आता धर्मनिरपेक्ष जनतेने ओळखले पाहिजे. कांग्रेस व राष्ट्रवादी सहीत भाजप-शिवसेना व राष्ट्रीय स्वंसेवक संघ यांना या देशातील गरीबांना अंधश्रद्धेच्या गर्तेत वर्षानुवर्षे गाडून ठेवायचे आहे. सामान्य जनतेला अंधश्रद्धेच्या गर्तेत ठेवल्याशिवाय यांचे वर्चस्व या देशावर व जनतेवर ठेवता येणार नाही हे ते जाणून आहेत म्हणून अंधश्रद्धा विरोधी बिलाला त्यांचे हुलकावण्या देणे चालू आहे.

Sunday, July 7, 2013

विश्व शांतीदूतावर भ्याड हल्ला



जगाला शांती, प्रेम व अहिंसा या त्रयत्रीचा संदेश देना-या तथागत बुद्धाच्या मर्मस्थळावर हल्ला करना-या दूषित वृत्तीचा निषेध शांतीदूताच्या चाहत्यांनी शांतपणे केला पाहिजे. हा हल्ला मुस्लिम आतंकवादी वा भारतातील जातीयवावाद्यांनी केला हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरी यातून दोन बाबी सूचक वाटतात. म्यानमार मध्ये बुध्दिस्ट व रोहिंग्या मुस्लिम यांच्यात झालेला तनाव व दंगल. अजूनपर्यंत कोणत्याही मुस्लिम संघटनेने या बाम्बस्फोटाची जबाबदारी घेतली नसल्याचे दिसते. म्यानमार मधील घटनेचा भारतातिल बौध्द व विहारांशी सबंध जोडणे हे सुध्दा अनाकलणीय आहे.  तर दुसरी बाब म्हणजे भारतातील भगव्या दहशहतवाद्यांनी घडवून आणलेले स्फोट. संघाने नरेंद्र मोदीना बीजेपीचा निवडणूक प्रमुख व संभाव्य पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निश्चित केल्यानंतर देशात जातीयवादी वातावरण निर्माण करण्याचे मनसुबे जातीयवाद्यांनी आखले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार भाजपापासून दूर झालेल्या नितीश कुमारांना अद्दल घडविण्यासाठी बोधगये मध्ये स्फोट घडविण्याचे षडयंत्र आखले असावेत ही शक्यता नाकारता येत नाही. विनोद मिस्त्री या हिंदू संदिग्ध व्यक्तीस एन. आय. ए ने अटक केल्यामुळे भगव्या आंतकवादाची पुष्टी होत असून देशातील दलित मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचे कुटिल कारस्थान रचण्यात आल्याचे निष्पन्न होते. देशात 2014 साली होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत देशाची सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी आर. एस. एस. चातकासारखी वाट पाहत आहे. आर. एस. एस. च्या पिलावळीने आखलेल्या योजनेचा हा एक भाग असू शकतो. एन. आय. ए. च्या चौकशीअंती सत्य बाहेर येईल. मात्र आंबेडकरवादी तसेच तथागताना मानणा-यांनी बुध्दाचा संदेश समोर ठेऊनच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. हिंसेचा त्याग करीत सर्व बौध्दानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येणे फार गरजेचे आहे. एकतेमध्येच शक्ती असते (Unity is the strength) हे तत्व समजने गरजेचे असून गटातटात विखुरलेल्या आंबेडकरवाद्यांनी व बौध्द संघटनांनी यातून बोध घ्यावा.
 

Friday, June 28, 2013

देव: काल्पनिक मिथ्यांचा बाजार


भारत हा मंदिराचा देश. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देवांची मंदिरेच मंदिरे उभारलेली आहेत. यातील काही मंदिरे अति गर्भश्रीमंत आहेत. त्यांचे रोजचे उत्पन्न हे कोटीच्या घरात असते. देवांना कोटीचे दान देना-याचे हात कधीच तपासून बघितले जात नाही. भ्रष्टाचार, लुटून व फसवणूक करून आणलेली ही कोटीची माया ह्या देवांना खूपच आवडलेली दिसते.  मंदिराच्या उत्पन्नाचा कोणताही हिस्सा हा गरीब व आर्थिक दुर्बलांच्या
सामाजिक व आर्थिक उथ्थांनासाठी नसतो तरीही एवढा अमाप पैसा कुठे जातो?. हे एक आठवे आश्चर्यच आहे. बहुजन समाज आपल्या आयुष्याचा अमुल्यं वेळ मंदिर भेटीसाठी खर्च करीत असतो. प्रत्येक हिंदूने आपल्या आयुष्यात चारधामाच्या यात्रा केल्याच पाहिजे असा

Monday, June 17, 2013

नक्षलवाद विरोधातील सलवा जुडूम व महेंद्र कर्मा यांचा सत्यापलाप


छत्तीसगढ मधील कनवलनार येथे नक्षलवाद्यांनी कांग्रेसच्या परिवर्तनयात्रेवर २५ मे २०१३ रोजी केलेल्या अंधाधुंद हल्ल्यात २७ कांग्रेस कार्यकर्त्यासोबत  सलवा जुडूमच्या महेंद्र कर्मा व राज्यकांग्रेस अध्यक्ष नंदकुमार पटेल याची हत्या करण्यात आली. त्यानंतर अचानक   महेंद्र कर्मा व सलवा जुडूम ही संघटना प्रकाशझोतात आली. तोपर्यंत त्यांची प्रसिध्दी केवळ छत्तीसगढ व तेथील आदिवासीपर्यंतच मर्यादित होती. महेंद्र कर्माच्या

Sunday, June 16, 2013

Two Reigns of Political Violence in Bastar

By Bernard D'Mello and Gautam Navlakha
The ambush on May 25 by Maoist guerrillas in the Darba Ghati valley (in the Sukma area of the Bastar region in southern Chhattisgarh), 345 kms south of the state capital of Raipur, of a convoy of provincial Congress Party leaders has shocked the Indian state apparatus.  The Z-plus and other categories of armed security personnel -- entitlements of the 'lords' of India's political establishment -- were no match for the guerrillas.  The main targets of the attack were Mahendra Karma, founder of the state-promoted, financed and armed private vigilante force, Salwa Judum (SJ), and Nand Kumar Patel, the chief of the Congress Party in the province and a former home minister of the state.

Tuesday, June 11, 2013

भगवतगीतेवर बौध्द धर्माचा प्रभाव


हिंदू धर्मीय भगवतगीता या ग्रंथास पवित्र ग्रंथ मानतात. सामान्य जनासोबतच भारतीय संतावरसुध्दा  गीतेचा प्रभाव आढळतो. परंतु भारतातील अनेक विद्वान भगवतगीतेचा कार्यकाळ ठरविण्यासाठी टाळाटाळ करीत असतात. भगवतगीतेवर बौध्द धर्माचा प्रभाव असण्याला काही भारतीय विद्वान नकार देतात किंवा चर्चा करण्यास टाळतात. याचा अर्थ गीता ही बुध्दोत्तर काळाच्याही खूप नंतरची आहे हे सत्य बहुजन समाजाला कळू नये यासाठी गीतेच्या

Friday, May 31, 2013

तथागत गौतम बुध्दाचा स्त्रीविषयक दृष्टीकोन

सोलापूर येथे सप्टेंबर २०१२ मध्ये दुसरे राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात “हिंदू महिलांचे कर्मकांड की प्रगतीतील अडसर” या विषयावर झालेला परिसंवाद हा तात्विक वादविवादाने बराच रंगला होता. सदर परिसंवादात महिलांच्या अधिकार व हक्क या संदर्भात बोलताना सुनिता रेणके यांनी तथागत गौतम बुद्धाने सुध्दा महिलांना भिक्षु संघात घेण्यास विरोध करीत स्त्री-पुरुष समानता नाकारली असे म्हटले. जगातील एकमेव प्रथम पुरुष की ज्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा उदघोष केला ते पुरुष म्हणजे तथागत गौतम बुध्द हे होते.

Thursday, May 16, 2013

‘A dangerous strategy’ By Dr S. Ramadoss


PATTALI Makkal Katchi (PMK) founder Dr S. Ramadoss is trying to shore up the party’s sliding fortunes by forming a caste-based federation against Dalits, said Thol. Thirumavalavan, Lok Sabha member and leader of the Viduthalai Chiruthaigal Katchi (VCK). In 2012, the PMK formed a nine-member front of intermediate castes, called the “All Communities’ Federation”, following its defeats in the 2009 Lok Sabha elections and the 2011 Assembly elections in Tamil Nadu.

Hostilities between Dalits and Vanniyars erupt again in Tamil Nadu


A. ANUSUYA stood amid the charred remains of her hut at Kattayan Theru, a Dalit colony near Marakkanam town in Tamil Nadu, on May 2, grief writ large on her face. The 27-year-old woman’s wedding was to take place on May 27 at Kottakuppam near Puducherry, 32 km from her place, and invitation letters had been sent to relatives. Her mother had thoughtfully arranged a loan and bought ten sovereigns of jewellery for Anusuya when gold prices came down in April.

Monday, April 29, 2013

बुध्द का धर्म




बुध्द ने ऐसे धर्म को जन्म दिया, जिसमे इश्वर की कोई जगह नहीं है। जिसमे परमात्मा को कोई स्थान नहीं है। बुध्द ने संदेह से शुरू की यात्रा और शून्य पर पूर्ण की। संदेह और शून्य के बिच में बुध्द का सारा बोध है। संदेह को धर्म का आधार बनाया और शून्य को धर्म की उपलब्धि। बाकी सब धर्म विश्वास को आधार बनाते है और पूर्ण को उपलब्धि। बुध्द धर्म को समझने के लिए जिज्ञासा चाहिए।

Thursday, April 18, 2013

Capitalism Versus Caste (Article from Times of India)

A new order based on the market can sweep away centuries of caste discrimination
Chandra Bhan Prasad and Milind Kamble“Ho to tum Dilli se saheb, per soch badi chhoti hai” (You might be from Delhi, but you are narrowminded), jeers Prashant Patil. Aged 28, Prashant is upset about being asked what makes a Patil woman work on dalit farmland. “Caste ka chashma utar kar dunia dekho” (See the world without the blinkers of caste), he counsels. 

Tuesday, April 9, 2013

संशयाच्या भोव-यात हरी नरके


लक्ष्मण माने यांनी आपणास काही लोकांनी कट करून फसविले असा आरोप करीत कटात सहभागी असलेल्या काही जणांची नावे त्यांनी घेतली. त्यात हरी नरके या नावाचा अंतर्भाव आहे. हरी नरके हे परिवर्तनवाद्याच्या विचारपीठावर नेहमी उच्चारले जाणारे नाव. याच परीवर्तनवाद्यांनी देशाच्या बाहेरही सन्मान दिला. फुले आंबेडकरांचा विचार सांगणारा एक विचारवंत. परंतु मागील दोन वर्षापासून हरी नरकेनी आपली छावणी बदलल्याचा आरोप होत असल्याचे ऐकायला

Saturday, April 6, 2013

लक्ष्मण माने व उत्साही विरोधकांचा अत्यानंद

  
लक्ष्मण माने हे भटक्या विमुक्ताचे नेते म्हणून नव्हे तर उपरा या त्यांच्या आत्मकथनाने अधिक  लोकप्रिय आहेत. फुले आंबेडकर विचारधारेचा कट्टर समर्थक व  फर्डा वक्ता अशी त्यांची ओळख आहे. लक्ष्मण मानेला आपण कधीही प्रत्यक्षात भेटलो नाही वा त्यांना समोरासमोर कधी बघितले नाही तरी लक्ष्मण मानेच एक नात मनाच्या कप्प्यात कोरलेले आहे. हे नात फुले-आंबेडकरी विचाराच आहे. पुरोगामी विचाराच्या व्यक्तीना उपराकार लक्ष्मण माने यांच्या बाबत आपुलकी निर्माण होणे ही स्वाभाविक बाब आहे. जरी ते राजकीय दृष्ट्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी कांग्रेसशी जवळीक

Monday, March 25, 2013

बाबासाहेब आंबेडकर व म.गांधी: वाद प्रतिवाद


डाक्टर बाबासाहेब आंबेडकरानी लिहिलेल्या ऐतिहासिक ग्रंथांपैकी अनिहीलेशन  ऑफ कास्ट(जाती निर्मुलन),  मुक्ति कोन पथे व कास्टस इन इंडिया हे गाजलेले प्रबंध होत. वरील तीनही प्रबंध म्हणजे वादविवादपटूता, तर्कसंगत युक्तिवाद, ज्ञान, पांडित्य व संभाव्य बौद्धिक हल्ल्याची आकलन शक्ती व त्याच ताकदीने दिलेले प्रतिउत्तर यांचा मिलाप असलेले अप्रतिम ग्रंथ होत. जागतिक दर्जाचे हे ग्रंथ बहुजन समाजातील बुद्धिवाद्यांनी अभ्यासले की नाही हे माहीत नाही परंतु जो अभ्यासेल तो पेटून उठल्याशिवाय राहणार हे मात्र निसंदिग्धपणे सांगता येते. हे तीनही प्रबंध क्रांती घडवू शकणा-या ज्वाला ठरू शकतात.

Wednesday, March 13, 2013

जातींनिर्मूलनातील मा. कांशीरामजींचे योगदान



मान्यवर कांशीरामजीचे जीवनकार्याची तटस्थपणे समीक्षा केल्यास मै अकेला ही चला था जानिबे मंजील, मगर लोक जुडते गये और कारवाँ बनता गया” ह्या काव्यपंक्तीच्या लहरी आपोआपच मनाच्या कोप-यातून डोकावून जातात. कर्मचा-यांचे सामाजिक संघठन “बामसेफ” ची निर्मिती, राजकीय संघर्ष करण्यासाठी  डी.एस.फोर ची स्थापना आणि निवडणुकाद्वारे राजकारणाच्या मैदानात उतरन्यासाठी बहुजन समाज पार्टीची निर्मिती व त्यानंतर देशात बहुजन समाजाचा निर्माण झालेला

Thursday, February 14, 2013

दीक्षाभूमी: आंबेडकरी चळवळीचे प्रेरणास्थान


महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात दीक्षाभूमीनावाचे पवित्र स्थान असून ते जागतिक बौद्धांचे आशास्थान बनले आहे. दीक्षाभूमीची तुलना मुसलमानाची हज व ख्रिश्चनाच्या पवित्र जेरुसलेम व वॅटीकन सिटीशी होऊ लागली आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या धर्माच्या श्रद्धास्थानासारखे महत्व दिक्षाभूमिला प्राप्त झाले आहे. असे असले तरी दीक्षाभूमी केवळ

Friday, February 8, 2013

जाती आधारित आरक्षण व प्रकाश आंबेडकरांचा उतावीळपणा


सध्या वर्तमानपत्रे व विविध वृत्तवाहीन्यावर प्रकाश आंबेडकर हे मुलाखती देत सुटले आहेत. आंबेडकरी चळवळीच तत्वज्ञान व फुले-आंबेडकरी चळवळीची आगामी दिशा तसेच आंबेडकरवादी राजकीय चळवळ कशी मजबूत करता येईल याचे भाष्य मुलाखतीच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेसमोर यायला हवे होते. महाराष्ट्रात

Tuesday, January 29, 2013

आशीष नंदी का बयान पिछडों के बारेमे सवर्णो के गंदी सोच का एक उदाहरण है।



जयपुर साहित्य सम्मेलन में लेखक आशीष नंदी अपने अंदर की बात बाहर निकालते हुए कहा था कि इस देश मे भ्रष्टाचार के लिए पिछड़े और दलित (अनुसूचित जाति और जनजाति के लोग) जिम्मेदार हैं। मंच पर ही मौजूद एक और जातिवादी साहित्यकार ने आशीष नंदी के इस वक्तव्य का ताली बजाकर सहमति और खुशी जाहीर की। तबतक मौके पर उपस्थित कुछ लोगों ने आशीष नंदी के इस बयान का कड़ा विरोध जताना शुरू कर दिया था। नंदी के इस बयान से पता चलता है कि देश का खुद को बुध्दीवादी  समझनेवाला मनुवादी वर्ग देश के कुल