Tuesday, May 26, 2020

टिळक व गांधी : राजकीय सत्ता संघर्षातील विरोधाभासी केंद्र

टिळक व गांधी या दोहोंमध्ये एक मूलभूत फरक होता. अस्पृश्योद्वार झाल्याशिवाय भारत स्वातंत्र्य होणार नाही ही गांधीची ढोंगी विचारसरणी तर ब्राह्मणांनी कौन्सिलात गेल्याशिवाय देशोद्वार होणार नाही ही टिळकांची जातीश्रेष्ठतेची भूमिका. देशाच्या राजकारणांची व ब्रिटीशविरोधातील आंदोलनाची सर्व सूत्रे ही आपल्या हातामध्ये असावी याची सुप्त धडपड दोघांच्याही अंतरंगात होती. रानडे व गोखले यांचेकडून राजकीय सूत्रे आपल्या हातात घेवू पाहण्याची टिळकांची नीती तर राष्ट्रीय राजकारणातून टिळकांना घालविण्याची गांधीची व्युव्हरचना,  दोघांची ही पध्दत वेगळी असली तरी उद्देश मात्र एकच होता आणि तो म्हणजे एकमेकांना राजकारणातून घालविण्याचा.  

Wednesday, April 8, 2020

महात्मा ज्योतिबा फुले : एक थोर समाजक्रांतिकारक


लोकहितवादी, महादेव रानडे, गोपाळ गणेश आगरकर, बाळशास्त्री जांभेकर हे महात्मा फुल्यांच्या समकालीन सुधारक होते. परंतु हे सुधारक हे बहुजन समाजाविषयी केवळ शब्दामधून उसासे व सहानुभूती दाखवत. हे सुधारक आपल्या सुधारकी विचाराच्या विरोधी कृतीही करीत असत. पण ज्योतिबा फुले अशा सुधारक फळीतील नव्हते. 'बोले तैसा चाले' हा त्यांचा बाणा होता.  ब्राम्हणेत्तराना जागे करण्याबरोबरच ब्राम्हण महिलावर होणार्‍या अन्यायाच्या निर्मूलनाला सुद्धा त्यांनी आपले कर्तव्य समजले.

Thursday, April 2, 2020

प्लेग, टिळक, चाफेकर बंधू आणि आजचा कोरोंना


आज संपूर्ण जगाला कोरोंना विषाणूनी वेढलेले आहे. शक्तीशाली व विकासात अग्रेसर समजले जाणारे अमेरिका, इटली, स्वीडन, स्पेन, फ्रांस, जर्मनी, कॅनडा व ब्रिटन हे देश या कोरोंना विषाणूने पुरे हबकले आहेत. त्यांच्या आर्थिक व्यवस्थेचे कंबरडे मोडायला लागले आहे. आधुनिक तंत्रज्ञान व आरोग्य सोईनी सशक्त असलेल्या या देशात लाखो लोक विषाणूनी संक्रमित होवून हजारो जन मृत्यूमुखी पडत आहेत. हा विषाणू जगासाठी एक धोक्याची घंटाच असून जगाची आर्थिक स्थिती व समीकरणे बदलविणारा  ठरू शकतो.

Wednesday, March 4, 2020

लेण्यांद्री लेण्याचे विद्रुपीकरण


महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे शहर. प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेल्या या शहराला लेण्याचे शहर असे म्हटले जाते. जुन्नर हे ‘हीनयान’ बुध्दीझमचे मोठे केंद्र होते. सातवाहन काळात जुन्नर हे पुणे शहरापेक्षा मोठे केंद्र असावे. पूर्व काळात येथील व्यापार हा नाणेघाट ते कल्याण अशा मार्गाने चालत असे. या शहराच्या आजूबाजूला असलेल्या पर्वतरांजीत लेण्यांच्या मालिकाच मालिका आहेत. डोंगरातील खडकांना काटून लेण्या कोरलेल्या आहेत. अशाच अनेक लेण्यांपैकी येथील लेण्यांद्री हि एक प्रसिध्द लेणी. लेण्यांद्री लेण्यावर जाण्यासाठी ३०७ पायऱ्या चढून जावे लागते. ह्या लेण्याची सुरक्षा व देखभाल भारतीय पुरातत्व विभाग करते. परंतु तेथील परिस्थिती बघितल्यास या भारतीय पुरातत्व विभागा विषयी मनात निराशा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. कारण हजारो वर्षाच्या या सांस्कृतीक धरोहारीला भारतीय पुरातत्व विभागाने पूर्णपणे दुर्लक्षित ठेवले असून एकूण २६ लेण्यापैकी केवळ ७ नंबरची लेणी सोडली इतर लेण्या बघण्यासाठी चांगली सोय केलेली दिसत नाही.  

Monday, February 17, 2020

शिवरायांचा आठवावा प्रताप


आज  देश कधी नव्हे एवढा धोक्याच्या वळणावर उभा आहे. देशाला अनेक समस्यांनी ग्रासले असून एक नागरिक दुसर्‍या नागरिकाकडे संशयित भावनेतून बघायला लागला आहे. रोजचे मोर्चे व आंदोलनानी रस्ते आणि चौक गजबजलेले दिसताहेत. मागण्यांचे फलक हातामध्ये धरून मार्च निघताहेत. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात जिला जगातिल सर्वात मोठ्या लोकशाहीचा गौरव प्राप्त झाला आहे. त्या देशात  धर्म,परंपरा व वर्चस्वाच्या नावाने मत्सर भावना वाढाव्यात हे देशास हीन करणार्‍या कृती आहेत. राजकीय स्वार्थासाठी धूर्त मंडळी धर्म व जुने इतिहासाचे दाखले व भाकडकथावर विश्वास ठेवून भारतीय नागरिकात द्वेषाचे बिजारोपण करून हिंदू व मुस्लिम यांच्यात दरी निर्माण करण्याचे कारस्थान रचनार्‍यानी एकदा तरी शिवरायाच्या राज्यरचनेचा व जनतेचा सांभाळ करण्याच्या वृत्तीचा अभ्यास करायला पाहिजे.

Sunday, February 16, 2020

राजनीति का नया अखाड़ा: बजरंगबली बनाम जय श्रीराम


राजनीति एक बड़ा अजीब खेल है। राजनीति में कब क्या होगा, इसका किसे कोई पता नहीं होता। कब  करीबी दोस्त विरोधी बन जाएगा और कब कट्टर विरोधी दोस्त बनेगा इसपर कुछ भरोसा नहीं किया जा सकता। देश में ऐसे कई उदाहरण हैं। राजनीति में कब करीबी रिश्तेदार दुश्मन बनकर चुनावी मैदान में प्रतिस्पर्धी बनेगा इसकी भविष्यवाणी करना मुश्किल है। सत्ता की लालसा ने मानवीय नैतिकता को कमज़ोर कर दिया है। सत्ता, स्वार्थ और धन राजनेताओं के जीवन का हिस्सा बन गए हैं। उन्होने सिद्धांत, मानवता, भाईचारे और विविधता में एकता को अवसरवाद, घृणा, सामाजिक विभाजन और हत्या जैसे अवसरों में बदल दिया।

Friday, February 14, 2020

राजकारणातील नवे प्यादे : बजरंगबली विरुध्द जय श्रीराम


राजकारण हा मोठा विचित्र खेळ आहे असे म्हणतात, ते काही खोटे नाही. राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नसतो. जवळचे मित्र कधी विरोधक बनतील तर कट्टर विरोधक कधी मित्र याचा काही भरोसा नसतो. असे अनेक उदाहरणे महाराष्ट्रात व देशातही बघायला मिळतात. मित्राचे असू द्या पण जवळचे नातेवाईकही कधी विरोधात जातील आणि निवडणूक मैदानाच्या आखाड्यात एकमेकाचे प्रतिस्पर्धी बनतील याचे भविष्य सांगणेही कठीण झाले आहे. सत्तेची लालसा हि माणसाच्या  नैतिकतेला निष्प्रभ करून टाकीत असते. सत्ता, स्वार्थ व संपत्ती हि राजकारण्यांच्या जीवनाचा भाग बनली आहे. त्यामुळे तत्व, मानवता, बंधुभाव आणि विविधतेतील एकतेला सुरुंग लागून त्याची जागा संधीसाधुत्व, द्वेष, सामाजिक फुट व हत्या या प्रकारांनी घेतली आहे.

Sunday, January 12, 2020

भारतीय नागरिकत्वाचे अधिकार आणि जनआंदोलन


भारतातील प्रत्येक व्यक्तीला अधिकाराच्या दृष्टीने नागरिकत्व हा अतिशय महत्वाचा विषय आहे. संविधानात भारतीय नागरिकात्वाच्या प्रश्नाचा विचार संविधान अंमलात आले त्यावेळचे नागरिक आणि त्यानंतरचे नागरिक असा केला आहे. संविधानातील अनुच्छेद १४ व १५ हे भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारासी सबंधित असून कायद्यापुढे सर्व नागरिक समान असून त्यांना धर्म, वंश, जात, लिंग व  जन्मस्थान यावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येत नाही. असे असतानाही देशात जनआंदोलने होत आहेत. नुकताच भारतात सुधारित नागरिकत्व कायदा अंमलात आला (सीएए) या कायद्यानुसार पाकिस्तान, बांग्लादेश व अफगाणिस्तान येथून आलेल्या परदेशी पण मुस्लिम नसलेल्या व्यक्तीस भारतीय नागरिकता देण्यात येईल व त्यासाठी लागणारी कागदपत्रे भारत सरकार स्वत:च बनवून देईल.  येथे भारतीय संविधानातील मूलभूत अधिकाराच्या संदर्भातील अनुच्छेद १५ चे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट होते. भारत हे धर्माधित राष्ट्र नसून कोणत्याही नागरिकाकडे धर्माच्या चष्म्यातून बघता येत नाही. संविधानातील तरतुदी बघितल्या तर संविधानाने दिलेले अधिकार आणि विशेषाधिकार याचा वापर भारतीय नागरिकांनाच करता येतो. भारतीय संविधानाच्या अनुक्रमणिका दोन मध्ये भारतीय नागरिकत्वाच्या संदर्भात चर्चा आलेली असून त्याची काय वैशिष्टे हे बघितले पाहिजे. 

Saturday, December 28, 2019

वढू बद्रुक ते भीमा कोरेगाव


वढू बद्रुक हे पुणे जिल्ह्यातील एक गाव. भीमा आणि इंद्रायणी नद्यांच्या संगमावर वसलेले हे गाव साधेसुधे नसून त्याला इतिहासाची मोठी झालर आहे. शूरविर राजे संभाजी व स्वामिनिष्ठ असलेला गणपत गोपाळ गायकवाड या दोन ऐतिहासिक व्यक्तिरेखांची समाधीस्थळ असलेल हे गाव. एक राजा तर दूसरा आपल्या राजनिष्ठेवर प्रगाढ विश्वास ठेवणार्‍या प्रजेचा घटक. असे हे गाव २०१७ साली अचानक प्रकाशझोतात आले, ते १ जानेवारी २०१७ रोजी भीमा कोरेगावला झालेल्या हिंसक दंगलीमुळे. त्या आधीच गावातील वातावरण गावाबाहेरच्या लोकांनी येवून सतत धुमसत ठेवलं होत. केवळ त्याचा विस्फोट व्हायच बाकी होत.

Monday, November 18, 2019

शिवसेना-राष्ट्रवादी-कांग्रेस युती किती सम, किती विषम ?


शिवसैनिकाला महाराष्ट्राचा “मुख्यमंत्री” बनविणारच असे वचन शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना दिल्याचे उध्दव ठाकरे सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेत ५०-५० टक्केचा हिस्सा मागत भाजपाकडे अडीज वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली आणि महायुतीच्या बिघाडीला सुरुवात झाली.  दरम्यान भाजपाला पूर्णचंद्राची सवय झाल्यामुळे आणि सत्तास्पर्धेमध्ये समान विचारधारेचा कोणीही प्रतिस्पर्धी नको असल्यामुळे भाजपाने शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीला केराची टोपली दाखविलेली दिसते. त्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी कांग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे सहकार्य मिळाले तरच त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचता येते. परंतु सत्तास्थापनेत आड येणारी बाब म्हणजे विरोधाभासी विचारधारा आणि त्याचा परंपरागत मतदारावर होणारा परिणाम होय. त्यामुळे सरकार बनले तरी ते टिकेल आणि चालेल काय? याची सांशकता सगळेच व्यक्त करू लागलेले दिसतात.  

Sunday, October 27, 2019

विधानसभा निवडणूक निकालाचा अन्वयार्थ


महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकांचा ज्वर संपून त्याचे निकाल २५ ऑक्टोबर २०१९ ला जाहीर झालेत. हे निकाल अंदाजाला पराभूत करून अचंभीत करणारे निघाले.   कारण ज्याप्रकारे मतदान संपल्याबरोबरच सार्‍या न्यूज चॅनेल्सनी आपापले एक्झिट पोल दाखविले त्यावरून दोन्ही राज्यात भाजपाला अभूतपूर्व यश मिळण्याचे दावे करण्यात आले होते. हे दावे कोणत्या बळावर केले हे स्पष्ट नसले तरी भाजपाला लोकसभेच्या विजयावर आधारित हे एक्झिट पोल होते हे स्पष्ट जाणवते. त्यामुळे या न्यूज चॅनेल्सनी आत्मपरिक्षण करायला शिकत संतुलित राहायला पाहिजे हे सांगणा-या या निवडणूक निकालाने भारतीय मतदारांना कोणत्याही राजकीय पक्षांनी गृहीत धरू नये असेही स्पष्ट बजावल्याचे दिसते.

Wednesday, October 2, 2019

बेडसे लेणी: निसर्गाच्या कुशीतील प्रेक्षणीय स्थान


पवना नदीच्या जवळ व पठारी मैदानातील ३०० फुट उंचीच्या डोंगरमाथ्यावर लेण्याचा समूह असून त्यांना बेडसे लेणी असे संबोधले जाते. बेडसे लेण्यांमध्ये चैत्यगृह, एक मोनास्ट्री, दोन स्वतंत्र गुहा असून काही अपूर्ण गुहा आहेत. या अपूर्ण गुहा म्हणजे दगडाच्या कडकपणामुळे आकार येत नसल्याकारणाने सोडून दिलेला अर्धवट भाग. गुहेच्या समोर काही कुंड असून त्यापैकी एका कुंडाच्या समोर “पाणी पिण्यासाठी” असे ब्राम्हीलिपीत लिहलेले आढळते. लेण्याच्या वरच्या बाजूस पत्र्यासारखे दिसणारे दगडी छत असून स्थापत्य कलेचा तो अप्रतिम नमूना आहे. ह्या बेडसे लेणी, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असून भाजे लेणी पासून ९ कि.मी. अंतरावर आहेत. लोकांना कार्ला आणि भाजे लेण्यांविषयी बरीच माहिती आहे. वास्तविकता मावळ प्रदेशातील ह्या लेण्यांचा त्रिकोण (कार्ला-भाजे-बेडसे) बेडसे लेण्याशिवाय पूर्ण होवू शकत नाही. बेडसे लेण्या जवळच पवना धरणाला लागून लोहगड,

Monday, September 16, 2019

ऐसा धर्म, जहा भगवान नहीं


भगवान तथा इश्वर कहा है? कैसा है? किसीने देखा नही। पर उसके अनुभूति पर विश्वास रखा। अनुभूति पर विश्वास रखो कहनेवाला कोण होता है? मन के डर को अनुभूति कहना कितना सच है? झूठ बोलना आसान है, लेकिन सच बोलने के लिए हिंमत चाहिए होती है। दुनिया का हर एक धर्म ईश्वर से जुडा है। लेकिन दुनिया में कुछ ऐसा भी धर्म और लोग है, जो ईश्वर के अस्तित्व को नहीं मानते। वही  इश्वर आज किसी की निजी संपत्ती बन बैठा है। उसे करोडो लोगोंके आस्था का केंद्र बना दिया है। इस आस्था के केंद्र “सौदेबाजी और लुट” के अड्डे बन गए। लेकिन लोग पुण्य और पाप के भय से चुप्पी साधे हुए है।

Sunday, August 25, 2019

दहीहंडी: मरणोत्सवाची की उत्सवाची


देशात दरवर्षी कृष्णजन्मोत्सव येतो, तो येतो एक नव्या जागृत मानवतेची, प्रेमाची व बंधुत्वाची उमेद घेवून. कट्टर धर्मांधतेला, असहिष्णूतेला व अमानवीय मूल्यांना नष्ट करणारा हा उत्सव केवळ उत्तर भारतापुरता मर्यादीत न राहता विदेशात या उत्साहाचे लोन पसरले आहे. या श्रीकृष्ण जन्मोत्सवदिनी देशात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. हा उत्सव कृष्ण मंदिरात व परंपरा प्रेमींच्या घरात साजरा होतो. एवढेच नव्हे तर रस्त्यावरून वाजतगाजत शोभायात्रा  काढण्यात येवून मोठ्या तल्लिनतेने नागरिक यात सहभागी होत उत्साही होवून नाचत असतात. हीच तर आहे धर्मस्वातंत्र्याची व आपला उत्सव जबाबदारीने पार पाडण्याची पध्दत. सद्सदविवेकबुध्दीच्या स्वातंत्र्याचा आणि दुसर्‍याच्या धर्मतत्वाना मान देत आपला धर्म मुक्तपणे प्रतिज्ञापित करण्याचा तो एक अधिकार आहे.

Saturday, August 17, 2019

अनुच्छेद 370 वरील जनमताचे पडसाद


5 ऑगस्ट 2019 ला भारत सरकारने कलम 370 व 35 अ रद्द करण्याचा जो निर्णय घेतला तो स्वातंत्र्यानंतरच्या काळातील घेतलेल्या काही धाडसी निर्णयापैकी एक होता. जवाहरलाल नेहरूच्या काळात झालेले संस्थानांचे विलीनीकरण, इंदिरा गांधीच्या नेतृत्वात 1971 ला पाकिस्तान सोबत युध्द करून निर्माण केलेला नवीन बांगला देश व बँकाचे राष्ट्रीयकरण आणि व्ही.पी.सिंग यांनी मंडल आयोग लागू करण्याचा घेतलेला महान निर्णय. याच कळीत नरेंद्र मोदीचा निर्णय सुध्दा चपलख बसणारा आहे. सरकारच्या या  निर्णयाचे स्वागत बहुसंख्यांक समूहाने ढोल ताशाद्वारे केले.  परंतु ज्यांच्यासाठी तो निर्णय होता

Thursday, June 20, 2019

महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाची दिशा


देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांचे आलेले परिणाम अनेकाना अचंभित करणारे होते. महाराष्ट्र ही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रातील लोकसभा निवडनुकामध्ये एकूण 48 जागापैकी भाजपा-शिवसेना युतीला 41 जागावर विजय मिळाला. राज्यात कांग्रेस पक्षाची पुर्णपणे धूळधाण उडत काँग्रेसला केवळ चंद्रपुर लोकसभा क्षेत्रात विजय मिळविता आला. तर राष्ट्रवादी पक्षाला आपल्या परंपरागत बालेकिल्ल्यात कसाबसा निसटता विजय मिळवीत 4 जागेचा जोगवा त्यांच्या पदरी पडलाय. निवडणुकांचे हे निकाल अनेकांना चिंता लावणारे व चिंतन करवणारे ठरले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाचा मागोवा घेणे अगत्याचे ठरते.

Sunday, June 9, 2019

केमेस्ट्री सोबतच जातीय मानसीकतेने केलाय माया-अखिलेशचा पराभव


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका (2019) मध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल व बहुजन समाज पक्षाचे गठबंधन होते. हे गठबंधन केवळ तीन पक्षांचे नव्हते तर ते जाट-दलित-ओबीसी आणि मुस्लिम समाजाचे होते. कारण एकत्र आलेले हे पक्ष त्या त्या जातीसमूहाचे प्रतिनिधित्व करणारे होते. यांची कागदी लोकसंख्या अंदाजे 78 टक्के आहे. या एकगठ्ठा मतामुळे भाजप युपी मध्ये पराभूत होईलच हे स्पष्ट होते. यामागील कारणही तसेच होते. या पक्षाच्या संयुक्त गणितीय आकडेवारीमुळेच गोरखपूर, फुलपूर आणि कैराना मध्ये झालेल्या पोटनीवडणुकामध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला. गोरखपूर फुलपूर हे मतदारसंघ मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य याचे मजबूत गढ होते. त्यामुळे 2019 ची लोकसभा निवडणुक सपा-बसपा गठबंधन मोठ्या अंतराने सहज जिंकेल असे निवडणूक पंडित व विश्लेषकांनी मांडलेले गृहीतक मात्र  सपशेल पराभूत झालेय.

Friday, May 31, 2019

जातीवादी मानसिकता का परिणाम है सपा– बसपा का पराजय


उत्तर प्रदेश में सपा और बसपा का गठबंधन हुवा। यह गठबंधन केवल दो या तिन पार्टीयोंका नहीं था, वह था जाट-दलित-ओबीसी और मुस्लिम समुदाय का। लगता था यह गठबंधन भाजपा को पराजित करेगा। इसके पीछे की कहानी भी सटीक और गणनात्मक थी। वह थी गोरखपुर और  फूलपुर में  गठबंधन उमेदवारोंकी अप्रत्याशित जित। दोनों जगह क्रमश: मुख्यमंत्री आदित्यनाथ और उप मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य गढ़ के तौर पर थी। गठबंधन के जमीनी सामाजिक और जातीय आकड़ोंका पलड़ा भाजपा से कई अधिक था। लेकिन उत्तर प्रदेश में सपा-बसपा गठबंधन जितने की समाजशास्त्रियों तथा चुनावी पंडितो की धारणा धरातल पर ही रह गई।  

Wednesday, May 8, 2019

येथेही आहे साक्रेटिसच्या खुन्यांची वंशावळ

ज्या देशाला शिस्तीने चालायचे असते तो देश कायद्याची निर्मिती करीत असतो. नागरीकानी त्या कायद्यांचे कसोशीने पालन केले तरच देशात कायद्याचे राज्य स्थापित होते. परंतु कायद्याचे पालन न करता ज्या देशातील जनता आणि शासनव्यवस्थेत बसणारे सत्ताधारी आपले व्यक्तिक हित व स्वार्थ बघायला लागतात तेव्हा त्या देशात अंतर्गत संघर्षाला सुरुवात होत तो देश अनागोंदीकड़े वाटचाल करतो. मग कायद्याचे राज्य नष्ट होवून एकाधिकारशाही सुरु होते. दमनशाही व संघर्ष ही त्या देशाची नित्याची बाब होवून जाते.

Thursday, April 11, 2019

महाराष्ट्रातील बहुजनवादी पक्षांची सद्यस्थिती

प्रचलित प्रघातानुसार बहुजनवादी पक्ष समुहामध्ये मुख्यत: फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारधारेवर बोलणार्‍या पक्षाचा अंतर्भाव होतो. त्या अर्थाने बहुजन समाज पक्ष, भारीप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया, बहुजन मुक्ति पार्टी  इत्यादी पक्षाना बहुजनवादी पक्ष असे म्हणता येते. या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात या पक्षांची महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर असलेली वास्तव स्थिती काय आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. बहुजनवादी पक्ष हे मुख्यत: वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करतात ज्यात अनु.जाती, जमाती विमुक्त भटक्या जाती यांचा समावेश होतो. एकदा भाषणात भाजप मंत्री नितिन गडकरी यानी म्हटले होते, फुले-आंबेडकरी पक्षांचे एक मोठे दुर्दैव्य आहे, ते म्हणजे या पक्षांची विचारधारा व उद्देश एक असला तरी हे पक्ष निवडनुका मध्ये कधीच एकत्र येवून लढत नाहीत. हे पक्ष गटातटामध्ये इतके विभागले आहेत की त्यांची गणनाही करता येत नाही. हे वास्तव आज कोणालाही नाकारता येणार नाही. महाराष्ट्रात या पक्षांच्या म्हणविल्या जाणार्‍या एकूण दीड कोटी मतापैकी केवळ २० लाख मते या पक्षांना पडतात. याचा अर्थ मतांचे मोठया प्रमाणात विभाजन होवून ९० टक्के मते ही प्रस्थापित पक्षाकडे वर्ग होतात.

Monday, March 25, 2019

In Uttar Pradesh, law is misused to target minorities (Indian Express dt.25.03.2019)

An everyday communalism has settled down. The sense of impunity was reinforced by Yogi Adityanath’s decision to withdraw all the complaints that the state had filed against him and his associates since the 1990s.

Patterns of communal violence are changing in Uttar Pradesh. As Sudha Pai and Sajjan Kumar had shown in Everyday Communalism: Riots in Contemporary Uttar Pradesh (OUP, 2018) after the 2004 BJP defeat, which former prime minister, Atal Bihari Vajpayee, partly attributed to the 2002 Gujarat riots, the Hindutva forces have opted for a new modus operandi. Rather than instigating major and violent state-wide riots as in the past, the BJP-RSS have attempted to create and sustain constant, low-key communal tension together with frequent, small, low-intensity incidents out of petty everyday issues that institutionalise communalism at the grass roots, to keep the pot boiling. Vigilante groups such as the Bajrang Dal and the Hindu Yuva Vahini (HYV) of Yogi Adityanath have been instrumental in implementing this technique of polarisation.

Monday, March 18, 2019

मान्यवर कांशीराम व निवडणूकातील संधिपर्व


भारतीय लोकशाहीचा मोठा उत्सव हा एप्रिल ते मे महिन्यात संपन्न होणार आहे. हा लोकशाहीचा उत्सव म्हणजेच भारतीय निवडणुका होत. २०१९ च्या लोकसभा निवडणुका ह्या ऐतिहासिक असतील. ऐतिहासिक अशासाठी की, जर मनुवादाचे समर्थक  (भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) या निवडणुका मध्ये यशस्वी होत सत्तेवर परत आल्यास भारताची लोकशाही, तिचे नैतिक मुल्ये, सामाजिक संरचना आणि तिच्या विविधतेचा चेहरा बदलण्याची दारुण शक्यता. दूसरा, ज्यांचेवर भारतीय लोकशाही वाचविण्याची जबाबदारी ज्या संस्था, पक्ष आणि व्यक्तींची होती त्यांचा आपसातील टकराव, मतभेद, दंडेलशाही आणि स्वार्थ यामुळे तिचा होणारा पराभव. कोणीतरी म्हटलेच होते, जर भारतीय संसदेची सूत्रे ही परत भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे गेली तर भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेली “संसदीय निवडणुक” निकाली निघेल आणि देशात अराजकता दडपशाहीचे नवे पर्व सुरु होवून गुलामगिरीची नवी पध्दत विकसित होईल. आजच्या अशा अवस्थेमध्ये मान्यवर कांशीराम असते तर निवडणुका व गठबंधना संदर्भात त्यांची भूमिका कशी असती? हे त्यांच्या विचारांचे स्मरण करून समोर ठेवण्याचा एक प्रयत्न आहे.

Friday, March 15, 2019

मान्यवर कांशीरामजी और चुनावी अवसरवादिता


भारतीय जनतंत्र का बड़ा त्यौहार याने संसदीय चुनाव एप्रिल-मई मे होने जा रहा है। 2019 का संसदीय चुनाव एक ऐतिहासिक होगा। ऐतिहासिक इसीलिए की, अगर मनुवाद के समर्थक (भाजपा एंव आरएसएस) इस चुनाव मे बहुमत से जीत हासिल करेंगे उस हालात मे भारत का इतिहास, भारतीय लोकतंत्र और विविधता के पेहराव का चरित्र बदल जाएगा। दूसरा, भारतीय लोकतंत्र को बचाने की ज़िम्मेदारी जिन संस्थाओ और सहिष्णुता के रखवालों की थी उनके आपसी टकराव और स्वार्थ के कारण भारतीय जनतंत्र का पराभूत होना होगा। किसी ने कहा था, अगर भारत की मनुवादी ताकते बहुमत से सत्तापर काबिज होगी तब भारत मे चुनावतंत्र का खात्मा होगा। अराजकता और गुलामी का दौर चालू होगा। इस स्थिति मे अगर बहुजनवादी सोच के मान्यवर कांशीराम होते तब संसदीय चुनावों और गठबंधन का स्वरूप कैसा होता? इसपर मान्यवर कांशीराम साहब के विचारोंकों याद करके उन्हे प्रस्तुत करने का यह एक प्रयास है।