बापू राऊत / Bapu Raut
Tell the slaves he is slave and he will revolt
Sunday, September 8, 2024
टिळक निर्मित गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली ?
Sunday, August 25, 2024
पेशवाईचे पतन: हिंदुच्या मुक्तीसाठी खुले झालेले द्वार!
ब्रिटीशाना भारतावर आपल्या साम्राज्याची मुहर्तमेढ
पक्की करण्यासाठी शेवटचा लढा महाराष्ट्राच्या भूमीवर लढला गेला. पेशवाईच्या अंताने
ब्रिटीशांनी आपला रोखलेला शेवटच्या श्वास सोडला असे म्हणता येईल. असे होण्यास येथील
अविवेकी व भोगाविलासी सरंजामदार व विषमतेनी बरबटलेली पेशवाई जबाबदार होती. बाळाजीपंत
नातू हे पेशवाई दरबारातील अंतस्थ माहिती ब्रिटीशांचे प्रतिनिधी असलेल्या एलीफिस्टनला
पुरवीत असायचे. दुसऱ्या बाजीरावाच्या डळमळीत धोरणामुळे त्याचा आष्टी व भीमा
कोरेगाव (१८१८) च्या लढाईत अंतिम पराभव झाला. बाळाजीपंत नातु या कारस्थानी व्यक्तीने
स्वत: ब्रिटीश सेनेच्या साक्षीने शनिवारवाड्यातील भगवा झेंडा काढून ब्रिटीशाचा
युनियन जॅक फडकवला. ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीरावाने जॉन माल्कम पुढे शरणागती
पत्करून आपल्या उदरनिर्वाहासाठी वार्षिक ८ लाख रुपयाच्या करारावर सही केली. त्यानंतर
बाजीराव हे बनारस मधील विठुर येथे उरलेले आयुष्य जगत राहिले. हा पेशवाईच्या अंताचा
शेवटचा टप्पा होता.
Saturday, July 20, 2024
तामिळनाडूतील दलित अत्याचार व स्टॅलिन यांची संदिग्ध भूमिका
तामिळनाडू हे
ई.व्ही.रामासामी पेरियार यांच्या विचाराचा वारसा लाभलेले राज्य. त्यांनी तमिळ
जनतेला समतेची व धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. त्यांच्याच विचाराचा आदर्श घेणारे
डीएमके (द्रविड मुन्नेत्र कझडम) व एआयडीएमके (अण्णा द्रविड मुन्नेत्र कझडम) हे दोन्ही
पक्ष नेहमीच राज्यातील सत्तेमध्ये असतात. त्यामुळे समतेचे व जाती निर्मुलनाचे लोन
प्रत्येक तामिळी कुटुंबात पोहोचवयास हवे होते. परंतु तसे झालेले दिसत नसून हिंदू
धर्मातील निम्न जातीवरील अत्याचार रोज पुढे येत आहेत. अशा घटनात सतत होणारी वाढ हि
डीएमके पक्षप्रमुख एम के स्टालिन यांचे वक्तव्य व कृती यात तारतम्य जुळत नसल्याचे
दिसते. त्यामुळे केवळ पुरोगामीपणाचा आव आणून सामाजिक सुधारणा करता येत नाही तर
त्याला कृतीची जोड असणे आवश्यक असते.
Sunday, July 7, 2024
के. चंद्रू यांचा शालेय जातीनिर्मुलन अहवाल काय सांगतो ?
Friday, June 21, 2024
आगामी विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निकालाचे परिणाम काय होतील !
Tuesday, June 11, 2024
बहुजन चळवळीची पुनर्रचना कशी होईल!
Tuesday, May 28, 2024
बदलता अभ्यासक्रम बदलती मानसिकता
देशात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या अंतर्गत महाराष्ट्र
सरकारने काही पावले उचलली आहेत. त्यानुसार राज्याच्या शिक्षण मंडळाने इयत्ता
बारावी पर्यंतच्या अभ्यासप्रणालीत काही बदल केले असून नव्या आराखड्यासंदर्भात
नागरिकाकडून काही आक्षेप असल्यास ते नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. नव्या राष्ट्रीय
शैक्षणिक धोरणाचे प्रारूप बघितल्यास त्यात धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव याचा
अभाव दिसून येतो तर दुसऱ्या बाजूने त्या त्या राज्यातील मातृभाषा व स्थानिक भाषेला
प्राधान्य देत असताना इंग्रजीला ऐच्छिक सदरात टाकण्यात आले. किमान ५ व्या व आठव्या
इयत्तेपर्यंत शिक्षणाचे माध्यम मातृभाषा ठेवण्यात आली. परंतु ९ वी ते १२ पर्यंत
कोणते माध्यम असावे यावर संदिग्धता कायम आहे. इंग्रजीला निकडीची भाषा न करता
ऐच्छिक करणे हे भाषा क्षेत्रात विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर व त्यांची क्षमता
अधिक संकुचित करणारी ठरू शकते.
Wednesday, May 22, 2024
बुद्धाच्या मानसशास्त्रीय दृष्टीकोनातील पैलू
तथागत
बुद्धाला जगातील पहिला मानस शास्त्रज्ञ म्हटल्या जाते. बुद्धांनी अनेक शास्त्रीय
कसोट्या सांगितल्या आहेत. शास्त्रीय मानसिकता निर्माण होण्याची पहिली पायरी म्हणजे
आसपासच्या घडणाऱ्या घडामोडीकडे तर्काच्या दृष्टीकोनातून बघणे. बुद्धाने जगातील
घडामोडीकडे सूक्ष्म तार्कीकतेने बघितले आहे. भारतात मुख्यत: श्रमण व
ब्राम्हण ह्या दोन परंपरा होत्या. ब्राम्हण हे कर्मकांडी संस्कृती, आस्था व अंधश्रध्देचे निर्माते
होते. या संस्कृतीचा समाजावर अनिष्ठ परिणाम झाला होता. जनता ही मुख्यत: याज्ञिक,
अंधविश्वास आणि कर्मकांडाद्वारे फलश्रुतीच्या जाळ्यात अडकली होती.
Wednesday, May 15, 2024
चाणक्य : तो, मी नव्हेच !
भारतीय जनतेच्या मनात चाणक्य या व्यक्तीरेखेविषयी अनेक कांगोरे कोरले गेले आहेत. “अर्थशास्त्र” या पुस्तकाचे लेखक म्हणून चाणक्य (कौटिल्य) यांचेकडे बघितल्या जाते. हा ग्रंथ अर्थकारणापेक्षा राजकारण व प्रशासन यावर अधिक भाष्य करते. भारतात उपद्रवी मूल्यांना चाणक्यनीती संबोधण्याची परंपरा असून उपद्रवी व्यक्तिला चाणक्याची उपमा दिली जाते. कुणाचा कसा गेम करायचा यावर हि नीती (साम,दाम,दंड,भेद) अधिक भर देते. चाणक्य हे महान रणनीतीकार होते अशा स्वरूपाच्या कथा कादंबरी व नाटकातून प्रस्तुत केल्या जातात.
Tuesday, April 9, 2024
आधुनिक भारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान
स्वातंत्र्यपूर्व
काळात भारत राजकीयदृष्ट्या एकराष्ट्र नव्हते. ते अनेक संस्थानात विभागले होते.
प्रत्येक प्रांतात अनेक वंशाचे व धर्माचे लोक राहत
होते. प्रत्येक संस्थाने स्वतंत्र असल्यामुळे त्यांच्यात सांस्कृतिक कलह अधिक
होता. काहींचा धर्म एक असला तरी त्यात जातींची शोषणाधीष्ठीत उतरंड होती. आधुनिक
विचारधारेचा देश म्हणून मान्यता पावलेल्या ब्रिटीशांनासुध्दा येथील सांस्कृतिक
वर्चस्ववादाचे रूपांतरण समानतावादात करता आले नाही.
Monday, March 25, 2024
महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकांची आकडेवारी काय निर्देश देते ?
देशात निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या
निवडणुका जाहीर झाल्या. त्यानुसार महाराष्ट्रातील निवडणुक हि एकूण पाच टप्प्यात
होणार आहे. निवडणुकांच्या घोषणाबरोबरच विविध पक्ष व गठबंधन यांच्यात मतदार
संघासाठी रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसते. महाराष्ट्रात मुख्यत: दोन निवडणूक आघाड्या
दिसतात. त्यापैकी एक शरद पवार -उद्धव ठाकरे प्रणीत महाविकास आघाडी असून दुसरी
भाजपाप्रणीत महायुती..यात एक तिसरा महत्वाचा घटक
आहे, तो म्हणजे सध्यातरी स्वत: निवडून न येता एकाला जिंकवून
देणारा तर दुसऱ्याला हरविणारा. बहुजन वंचित आघाडी (बविआ) हा तो घटक होय. मागच्या
निवडणुकाप्रमाणेच यावर्षीच्या निवडणुकामध्ये बविआ हाच
महत्वाचा घटक ठरू शकतो. बहुजन वंचित आघाडीची ठाकरे
-पवार आघाडी सोबत युती होवू नये. यासाठी अदृश्य खेळ व वाटाघाटी चालू असणे हे
राजकारणात नवे असे काही नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा वंचितला किती जागा
द्यायच्या हा घोळ असून त्यांना स्वत:चेच मतदारसंघ वाटप करण्यात अडचणी येत असून
महायुतीला सुध्दा त्याच प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.
Monday, February 26, 2024
ओबीसी आरक्षणात मराठा भागीदारीची मागणी कितपत योग्य ?
गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे.
त्यासाठी त्यांनी “एक मराठा लाख
मराठा” या नावाने आंदोलने करणे सुरु केले. मराठा आरक्षणाची मागणी
केंद्र शासनाने आर्थिक मागास घटकासाठी (EWS) लागू केलेल्या
१० टक्के आरक्षणाने पूर्ण झाली असून महाराष्ट्रातील गरीब मराठा या आरक्षणाचा लाभ
घेवू शकतो. परंतु मनोज जरांगे या मराठा समाजातील नेत्याने मराठा समाजाला ओबीसी
कोट्यातून सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी मागणी पुढे केली. ओबीसीमध्ये समाविष्ठ
असलेले कुणबी या घटकाचे मराठ्या सोबत सगेसोयरे असे नाते जोडत सर्व मराठे हे कुणबीच
आहेत अशी भूमिका घेत मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याचा मुद्दा समोर केलाय.
त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. सपूर्ण महाराष्ट्रात लाखोंचे
मोर्चे काढले. या दबावतंत्राचा महाराष्ट्र सरकावर इष्ट परिणाम होत सरकारने विशेष
अधिवेशन घेवून मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पास केलाय. तरीही
मनोज जरांगे हे ओबिसी आरक्षणातच मराठ्यांची भागीदारी व
सगेसोयरेसंबंधावर अडून आहेत.
Saturday, January 27, 2024
शिवधर्माच्या यशस्वीतेचे काय झाले ?
Monday, January 15, 2024
श्रीलंकेतील प्रसिध्द पर्यटन स्थान सिगिरिया व कल्पित पुर्वाग्रह
सिगीरीयातील अदभूत स्मारक व तेथे असणारी उद्याने, जल तलाव, बगीचे यास ते रावणाची खास स्थाने असल्याचे दाखवितात. वास्तविकता श्रीलंका व तेथील जनतेचा रावणाशी काहीच सबंध प्रस्थापित नाही. श्रीलंकेतील जनतेला रावणाविषयी माहिती विचारल्यास त्याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगतात. श्रीलंकेतील कोणत्याही पौराणिक वा पुरातात्विक साहित्यात रावणाविषयी काहीही लिहिले गेले नाही. त्यामुळे रावण व त्यासबंधित पात्राचे ऐतिहासिक पुरावे व कालावधीची साक्ष कोठेही मिळत नाहीत.यावरून रामायणातील रावणकथा ह्या भारताच्या काही लोकांच्या सुपीक डोक्याची उत्पत्ती आहे हे दृष्टीस पडते.
Tuesday, November 14, 2023
संस्कृत भाषा भारताच्या पाली प्राकृत पेक्षा जुनी कशी ठरेल?
भारताची मूळ भाषा कोणती? यावर बरेच वादविवाद झडत असतात. भारतात प्राकृत, द्रविड, मुंडा, संस्कृत आणि अशा अनेक बोलीभाषा अस्तित्वात आहेत. यापैकी मूळ भाषा कोणती? या वादामध्ये काही तथाकथित धर्मवादी व संघीय विचारधारेचे लोक संस्कृत हीच या देशाची मूळ भाषा असून इतर भाषांची निर्मिती संस्कृत पासून झाली असा सूर लावीत असतात. यामध्ये तथ्यात्मक पुराव्यावर लक्ष न देता भावनात्मक पुळका आणून आपल्या “इतिहासकार” या पेशासी इमान न राखणाऱ्या काही तथाकथित इतिहासकारांचा समावेश आहे. “आम्हाला पुराव्यांचे व तथ्यात्मक वस्तुस्थितीसी काही देणेघेणे नाही. आम्ही सांगतो तोच इतिहास, आम्ही जे म्हणतो तेच खरे” असे सांगणारा एक समूह भारतात आहे. वास्तविकता असे लोक ठग, भांड, षडयंत्रकारी, विभाजनकारी व वर्चस्ववादी मनोवृत्तीचे असतात. त्यांच्यावर अनेक लोक विश्वास टाकून तेच सत्य आहे असे मानायला लागतात परंतु तो एक “असत्य व कुटनीतीचा” मोठा ढिगारा असतो. यातून देशाचे समाजस्वास्थ्य बिघडण्याचे मोठे धोके असतात