Thursday, December 7, 2017

ओबीसी सेवासंघाच्या ८ व्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने

ओबीसी सेवा संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी १० डिसेंबर २०१७ रोज रविवारला आयोजित करण्यात आले आहे. पापड हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचे ते जन्मगाव. पंजाबराव देशमुख यांचे जेवढे योगदान देशासाठी आहे तेवढेच भरीव काम त्यांनी बहुजन समाजाच्या कल्याणासाठी केलेले आहे. ओबीसी सेवासंघ ही संघटना ओबीसी वर्गातील बुद्धिवादी अधिकारी, कर्मचारी व उद्योजक वर्गाची राष्ट्रव्यापी संघटना आहे. या संघटने मार्फत आतापर्यंत मुंबई, नाशिक, भुसावळ, नागपूर, भंडारा, गोंदिया व कोल्हापूर या महाराष्ट्रातील प्रमुख शहरात सात राज्य अधिवेशने झालेली आहेत.

Thursday, November 16, 2017

जातीनिहाय जनगणना: ओबीसीच्या मुक्तीचा जाहीरनामा

भारतीय समाज एकसंघ आणि समानतेच्या अधिष्ठानावर उभा राहावयाचा असेल तर समाजातील सर्व नागरिकांचा दर्जाही समान असला पाहिजे. तथापि भारतातील काही समाज घटक काही ऐतिहासिक कारणामुळे, इतर समाज घटकापासून जवळ जवळ सर्वच क्षेत्रात मागासलेले राहिले. ते जोपर्यंत इतर  समाजाच्या बरोबरीस येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समतेचे तत्वज्ञान प्रत्यक्षात येवू शकणार नाही. या शुध्द तार्किक विचाराने भारतीय संविधानकर्त्यांनी मागासलेल्या समाजघटकांना इतर समाज घटकाबरोबर बरोबरीने येण्यासाठी त्यांना काही खास सवलती देण्यात आल्या. दुसऱ्या शब्दात यालाच आरक्षण असे म्हटले जाते. भारतीय संविधानात मागासवर्ग या शब्दाची निश्चित असी व्याख्या दिलेली नाही. तथापि

Wednesday, October 25, 2017

विश्वविद्यालय चुनावों मे एबीवीपी की हार

“अखिल भारतीय विद्यार्थी परिषद” (एबीवीपी) यह संघ की एक शाखा है संघ की यह विद्यार्थी शाखा विश्वविद्यालयोंके चुनावो में भाग लेकर अपने चुने हए प्रतिनिधिद्वारा विद्यापीठ प्रशासनपर अपना दबाव बढाता है भाजपा के भावी नेता इस विद्यार्थी परिषद से निकलते है संघ की यह छात्र शाखा विद्यार्थी और विश्वविद्यालयोमे संघ की विचाराधारा कों प्रसारित करती है मुख्यत: बहुजन समाज के विद्यार्थी इनके अजेंडे पर होते है बहुजन छात्रपर सीधे तौर पर संघ विचारधारा नहीं थोपते बल्की सुरुवाती दौर में  बहुजन विद्यार्थीयोकी समस्याओ पर अपना ध्यान केंद्रित कर उन्हें “अखिल भारतीय विद्यार्थी परिषद” का सभासद बना लेते है जिस वर्ग या जातीसमूह से विद्यार्थी आते है, उस वर्ग या जातिविशेष की समस्याओ पर संघ और परिषद के काम करने के तरीके कों अवगत कराया जाता है. मुख्यत: हिंदू मुस्लिम भेद पर प्रकाश डालकर मुसलमान देश के लिए कितने खतरनाक है, इसका सिध्दांत (थेरी)  समझाया जाता है

Saturday, October 14, 2017

नांदेड महापालिकेच्या निकालासंदर्भाच्या निमित्ताने ........

नुकताच नांदेड महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला. त्यात कांग्रेसने इतरापेक्षा चांगलीच बाजी मारली. निवडणुकांच्या निकाल बघितल्यानंतर मला एका हताश झालेल्या तरुणाचा फोन आला. म्हणाला,  नांदेड हा आंबेडकरवाद्यांचा बऱ्यापैकी बालेकिल्ला आहे. तिथे नेहमी प्रबोधनात्मक कार्यक्रम होत असतात. कोपर्डी प्रकरणानंतर लाखोच्या प्रमाणात बहुजन क्रांती मोर्चे निघाले. त्या मोर्च्याच्या संख्येवरून नांदेड च्या आगामी राजकारणात बदल होईल असे वाटले होते. परंतु महानगरपालिकेचा निकाल लागला आणि माझा भ्रमनिराश झाला. असे का झाले असावे? असा त्यांनी मला प्रश्न केला. प्रश्न महत्वाचा तसाच गंभीर होता. मी त्याला उत्तरादाखल म्हणालो, महापालिकेच्या एकेका वार्डात

Sunday, October 8, 2017

कोण है श्रेष्ठ: रावण या राम ?

हर साल दशहरा आता है. दशहरे में कुछ लोग और संस्थाए रावण का पुतला बनाकर जलाते है. बड़े बड़े शहरों में नेताओ और तथाकथित सफ़ेद / भगवे वस्त्रधारी साधूओ के समक्ष रावण कों जलाने का कार्यक्रम होता है. रावण कों जलाने का काम राम, लक्ष्मण और सीता के पात्रधारी युवक व युवतियो द्वारा किया जाता है. लेकिन एक प्रश्न उठता है, रावण कों क्यों जलाया जाता है? क्या था उसका अपराध? क्या रावण ने इतना घिनौना काम किया था? जिससे लोग तिरस्कार कर उसे जला दे? तथा राम का चारित्र्य इतना मौल्यवान था की भक्ति भाव से उसकी पूजा की जाए? क्या राम सन्मान के इतने पात्र थे, की  उन्हें भगवान का दर्जा मिले? जैसी दानव की व्याख्या की जाती है वैसीही भगवान की व्याख्या हो. उनके गुणों, कार्यों और चारित्र का इमानदारी से विश्लेषण हो और बादमे उन्हें उस दर्जे के लायक समझा जाए. अच्छे और बुरे आदमी की समीक्षा जिस तथ्योंपर होती है, वही तथ्योपर तथाकथित दानव और भगवान की समीक्षा हो.

Wednesday, September 6, 2017

मराठा आंदोलनाचे “पानिपत”

कोपर्डी प्रकरणातून मराठा आंदोलनाचा जन्म झाला. असा साधारण समज परंतु एकूणच स्थिती बघितली तर त्यात काहीही तथ्यांश दिसत नाही. तरीही कोपर्डी हे आंदोलनाचे तात्कालिक कारण आहे. कोणत्याही जाती जमातीची महिला असो. तिच्यावर अन्याय झाल्यास जो अपराधी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे कोणताही सुज्ञ माणूस म्हणू शकेल. महिलावरील अत्याचाराला जातीच्या चष्म्यातून बघणे हाच एक मोठा जातीयवाद आहे. भारतीय मानसिकतेमध्ये असा जातीयवाद ठासून भरलेला आहे. “एक मराठा लाख मराठा” या शब्दांशामध्ये जाती अभिमानाचा फार मोठा दर्प दडलेला आहे. तो या मराठा मोर्च्याच्या दृश्याने उघड झाला.

तरीही विचाराचा वारसा चालविनारच.............

पत्रकार तथा लेखक गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. मन स्तब्ध व अस्वस्थ झाले. भारतात एका नव्या “नरसंहारक” संस्कृतीचा विकास झाला. या नरकासुराना कसे रोखायचे? कोण रोखणार? आता तर बोलण्याचे व लिहिण्याचे स्वातंत्र्यच पूर्णत: हिरावून घेतल्या गेले आहे. आमच्या विरोधात बोलाल वा लिहाल, तर खबरदार. तुमचाही आम्ही लंकेश करू. असा हा सरळ धमकीवजा इशारा आहे.

Saturday, August 26, 2017

धर्म के ठेकेदार और महिलाओका शोषण

भारत का आधुनिक कालखंड, जहा किताबों एंव लेखो में लिखीत, नारो मे सिमित, वर्तमानपत्रों में छापित तथा विद्वानों, संन्यासियो एंव राजनेताओ के भाषणों में तरंगति और लहराती नारी की महिमा कितनी सुंदर और सहज दिखती है. कभी कभी लगता है इनके अंदर नारी पूर्णत: समा गई हो. नारी हमारी माता है और बहन है. वह विश्व की जननी है. इसके अलावा दूसरे भी रिश्ते होते है. जिसे हम सन्मानजनक दृष्टी से देखते है. महिला का सन्मान सर्वोपरि होता है. सभ्य नागरी समाज में महिला का स्थान बराबरी और सामान अधिकार का होता है. नारी के चरित्र्य की रक्षा समयोचित की जाती है. यही सभ्य समाज के लाक्षणिक गुण होते है. ऐसे सभ्य समाजपर सृजनता का प्रातिनिधिक होने पर गर्व होना चाहिए. भारतीय सभ्य समाज ने महिलाओको सब अधिकार दिए जिसका वह हकदार है.

Wednesday, August 9, 2017

विठ्ठल रामजी शिंदे यांचे बौध्दानुयायन

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे भारतातील सुधारक चळवळीतील अग्रगण्य नेते होते. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग हा मवाळ व्हाया जहाल असा होता. सामाजिक सुधारणांच्या संदर्भात बाळ गंगाधर टिळकासी वैचारिक खटके उडाल्यानंतर त्यांच्या विचारसरणीत आमुलाग्र बदल झाला होता. धार्मिक व सामाजिक विषमतेतील विसंगती त्यांना डिवचू लागली होती. धर्म ही त्यांच्या जीवनातील मुलभूत प्रेरणा होती. परंतु त्यांच्या कल्पनेतील धर्म हा पोकळ व भाटूगिरी तत्वाचा नव्हता. त्यानी धर्माची सरळसुध व्याख्या केली होती. धर्म म्हणजे सबलानी दुर्बलांना, वरिष्ठांनी कनिष्ठांना सत्तेमध्ये व ज्ञानामध्ये सहभागी करून घेणे होय. समाजातल्या सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला बलशाली करणे हाच धर्म होय असे ते सांगत असत.

Friday, July 7, 2017

धर्मवेडा सावरकर व त्याची जातवेडी “सहा सोनेरी पाने”

भारतातील कट्टर धर्मवादी, सनातनी व तालिबानी हिंदुत्ववादी यांचा आवडता महापुरुष? म्हणजे वी. दा. सावरकर. तालिबानी हिंदुत्ववाद्यासाठी सावरकर म्हणजे महान देशभक्तस्वातंत्र्यसेनांनी, क्रांतीवीर, कृतिशूर विचारवंतउपयुक्ततावादी समाजसुधारकमहाकवीइतिहासकारसाहित्यिकअमोघ वक्ता इत्यादी.हिंदुत्ववाद्यासाठी सावरकरांचे उभे आयुष्य म्हणजे तत्वज्ञानाचायुगप्रवर्तक घोषणांचाधाडसी हालचालींचाशूर कृत्यांचात्यागाचा आणि हालअपेष्टांचा विस्मयकारक चित्रपटच होय! जो व्यक्ती ब्राम्हण समाजासाठी व जातीचा उच्च दर्जा कायम ठेवण्यासाठी भांडतो त्या व्यक्तीला ब्राम्हण इतिहासकार व साहित्यकारदेवपन प्राप्त करून देशाचा हीरो घोषित करीत असतात. विविध अलंकाराच्या शब्दसुमनांनी त्यांचे जीवन अदभूत व विस्मयकारी बनवून टाकीत असतात. परंतु सावरकरांच्या प्रतीमेवरून या  ओवाळलेल्या शब्दसुमनाच्या फुलांची पुटे काढून टाकली तर दिसतो केवळ ओबडधोबडपणा, कट्टर जातीयवादीपणा, ब्राम्हणी धर्माभिमानीपणा, स्वजातीचा गर्विष्ठपणा व खोटेपणाचा अस्सल प्रमाद. हिंदुत्ववादाच्या बुरख्याआडून भारतावर ब्राम्हणांचेसामाजिक, धार्मिक व राजकीय वर्चस्व स्थापित करने हा त्यांचा मुख्य उद्देश होता. नाटकी गद्य व पद्यानी सामान्य माणसाला धर्मबंधनात गुरफुटून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न सावरकरांनी आपल्या  सहा सोनेरी पानया ग्रंथातून केलेला दिसतो.

Saturday, June 24, 2017

अब कहा है? तथाकथित दलित नेता

भीम आर्मी के संघटक चंद्रशेखर आझाद कों गिरफ्तार कर जेल में डाला गया. पता नहीं, आदित्यनाथ योगी की पुलिस चन्द्रशेखर आझाद से कैसा बर्ताव करती होगी? लेकिन एक प्रश्न तो उठता है की, चंद्रशेखर आझाद किसके लिए जेल गया? क्या गुनाह था उसका? क्यों हो रहा उसे जेल? क्या शोषितोंने शोषण के खिलाफ आवाज उठाना गुनाह है?. शब्बिरपुर और सहारनपुर में अत्याचारो का प्रतिकार करना तथा दिल्ली के जंतरमंतर पर उन अत्याचारों कों लाखो जनसमुदाय के सामने सारे दुनिया कों बताना इस देश के मनुवादियोकों हजम नहीं हुवा ऐसा प्रतीत होता है.

Monday, June 5, 2017

संवादासाठी अधीर “काश्मीर”

वर्तमानपत्रात काश्मीर प्रश्नावर लिहताना पत्रकार वृत्तलेखक भड़क मथळ्याचे लेख लिहीत असतात. धगधगते काश्मीर, काश्मीरचा पेटता वणवा व हातून निसटता काश्मीर असे ते शीर्षक असलेले लेख असतात. असे लेख वाचूनच सामान्य माणसांचे माथे भडकायला सुरुवात होत असते. अशा लेखांच्या माध्यमातून काश्मिरी लोकासंदर्भात अन्य भारतीय समाजात विष पेरल्या जाते. याहूनही भयानक असते ते भारतीय वृत्त वाहिन्यांचे महा “आकडतांडव”. या वाहिन्यांचे वृत्त निवेदक काश्मीर संदर्भातील बातम्यांना अधिक रंजक बनवीत असतात. त्याच त्या ब्रेकिंग न्यूज, तेच ते रक्ताळलेले फोटो. न्यूज दाखविताना ज्या जोशात व आवेशात वृत्त निवेदक (ॲक़ंर) बातम्या सांगत असतो, ते ऐकून इतर भारतीयांचे रक्त न खवळले तर नवलच. वाहिन्यांचा हा प्रकार देशासाठी व काश्मीर साठी मात्र धोक्याचा आहे. वास्तविकता जमिनी हकीगत ही फार वेगळीच असते.

Sunday, May 28, 2017

....... यह चमारोकी नपुसकता नहीं तो, और क्या है?

उत्तर भारत में चमारोंको दूसरे सवर्ण हिंदूओ द्वारा मारा और काटा जा रहा है. चमार खुद कों हिंदू धर्म का अभिन्न अंग मानते है लेकिन स्वर्ण उन्हें हिंदू नहीं अछूत (दलित) कहते है. मुस्लिम ईसाई के विरुद्ध  दंगोके समयपर उनपर हिंदू या हिंदुत्व का लेबल चिपकाया जाता है. वे हिंदू धर्म की वर्णव्यवस्था (जातिव्यवस्था) कों मानकर चलते है. और निचले दर्जे का काम करनेमे वे खुद कों गर्व महसूस करते है. वे ब्राम्हणों द्वारा घरमे पूजा पाठ करवाते है. और उन्हें मुहमांगी दक्षिणा देते है. वे खुद जमीनपर बैठकर ब्राम्हणों तथा उची जाती के लोगोको कुर्सी पर बिठाते है. लेकिन वे कुर्सी खाली होकर भी जमीन पर बैठ जाते है. इस समानता को वे

Friday, May 26, 2017

बहेनजी (मायावतीजी) कों खुला खत

बहेनजी, आप का भीम आर्मी के सबंध में बयान सुनकर मै स्तब्ध और खिन्न रह गया. क्लेश हुवा. क्या बहनजी ऐसा भी कह सकती है? मायावती जी भीम आर्मी कों संघ एंव भाजपा का एजंट कह रही है. फिर बसपा प्रमुख के तौर पर आप मोदी का प्रचार करने गुजरात गई थी. वो क्या था?. भीम आर्मी समाज के सरक्षण और प्रबोधन का काम कर रहा है. अन्याय के खिलाफ खड़ा हो रहा है. दिल्ली के जंतर मंतर में भीम आर्मी के समर्थन के लिए जिस तरह का जनसागर इकठ्ठा हो गया था, जिसतरह चंद्रशेखर लोगो कों आवाहन कर रहा था, वो देखकर आपके पैर की

Saturday, April 8, 2017

बहुआयामी “बाबासाहेब”

बाबासाहेब आंबेडकर हे एक केवळ वादळ होते असे नव्हे तर ते एक उष्माघात होते. या “आंबेडकर” नावाच्या उष्माघाताने अनेकांना आपल्या ज्वालामध्ये गुरफुटले. आजही काहीना या ज्वाला फार दाहक वाटतात तर काहीना अंगात सामावून घ्यावा एवढा थंडावा. बाबासाहेबावर जेवढे प्रेम करणारे आहेत तेवढेच त्यांचे कट्टर विरोधकही आहेत. त्यांच्या कट्टर विरोधकांमध्ये संघ परिवाराचा मोठा गोतावळा आहे. परंतु हा संघीय गोतावळा “आंबेडकर की जय” म्हणू लागला आहे. हेगडेवार व गोळवळकर यांना कधी वाटले नसेल की, मनुस्मृतीला जाळणाऱ्या आंबेडकरांना संघ कधी आपला महानायक म्हणून कवटाळेल?. कारण ज्या व्यवस्थेच्या समर्थनार्थ व प्रसारार्थ हेगडेवार व गोळवलकर जंग जंग पछाडत होते, त्याच काळात बाबासाहेब वर्णव्यवस्था उध्वस्थ करण्यास निघाले होते. भारतीय संविधान हाच लोकाधीकाराचा ‘आत्मा’ आहे असे सांगत सुटले होते. भाई म्हणत लाल सलाम ठोकणारे मार्क्सवादी, ज्यांनी कधीकाळी बाबासाहेबांना राजकीय जीवनातून बहिष्कृत करण्यासाठी जंग जंग पछाडले ते कम्युनिस्ट आता प्रथम जयभीम व नंतर लाल सलाम ठोकू लागले. बाबासाहेब आंबेडकरामध्ये ते आपल्या अस्तित्वाचा मार्ग शोधू लागले आहे. कम्युनिस्टांच्या मरणासन्न चळवळीचा आधार

Wednesday, February 22, 2017

बहुजन समाज पक्षाचे बदलते प्रचारतंत्र

निवडणुका कोणत्याही असोत, प्रत्येक पक्षाचे एक वेगळे प्रचारतंत्र असते. आता पारंपारिक प्रचार तंत्राची जागा हायटेक प्रचार तंत्राने घेतली एवढाच काय तो फरक. २०१४ च्या लोकसभा निवडणुकामध्ये नरेंद्र मोदींनी ज्या पध्दतीने जिंकण्याच्या व्युव्हरचना केल्या व यशस्वी झाल्या, तेव्हा पासून इतर पक्षांनीही आपापल्या प्रचाराच्या  पध्दती मध्ये बदल केला. २०१४ च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदीनी न भूतो न भविष्यती अशी विजयश्री खेचून आणली. मोदी खोटे बोलतात परंतु रेटून बोलतात. मोदींनी मिडीयाच्या माध्यमातून स्वत:ची विकासपुरुषाची प्रतिमा निर्माण केली. साथीला सोशल मिडिया व चाय पे चर्चा असे स्वरूप होते. मोदीच्या गुजरात विकासाचे स्वरूप भारतातील जनतेला आजही कळले नाही. मोदीचा गुजरात आज असंतोषाच्या सीमेवर आहे. एकूण परिस्थिती बघता पुढच्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये मोदीचा चेहरा पाहणे जनता पसंत करेल की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेतच.

Thursday, February 16, 2017

भारत में अल्पसंख्याकों और दलितोपर अत्याचार (यू.एस. कमीशन ऑन इंटरनेशनल रिलिजियस फ्रीडम का रिपोर्ट)

हाल ही में अमेरिकी कमीशन के “इंटरनेशनल रिलिजियस फ्रीडम” द्वारा सार्वजनिक तौर पर एक रिपोर्ट प्रकाशित की गई। यह कमीशन विश्व स्तरपर धार्मिक स्वतंत्रता पर नज़र रखता है और मानवाधिकारों की सार्वभौमिक घोषणा में उल्लेखित मानकों को ध्यान में रखकर अपना रिपोर्ट बनाता है। और अमेरिकी सरकार कों उस देश के प्रति नीतिगत फैसला लेने के लिए सुपुर्द करता है. इस रिपोर्ट में 1 फ़रवरी, 2015 से 29 फ़रवरी, 2016 तक की अवधि की महत्वपूर्ण घटनाओं का उल्लेख किया गया है।

रिपोर्ट के अनुसार, 2015 में, भारत में धार्मिक सहिष्णुता की स्थिति बिगड गई है और धार्मिक स्वतंत्रता के उल्लंघनों में अधिक वृध्दि पाई गई। अल्पसंख्यक समुदायों को हिंदू राष्ट्रवादी समूहों द्वारा बड़े पैमाने पर प्रताड़ना, उत्पीड़न और हिंसा की कई घटनाओं का अनुभव करना पड़ा है। इन तथाकथित राष्ट्रवादी समूह कों  भारतीय जनता पार्टी का मौन रूप से समर्थन प्राप्त होने का आरोप लगा है. यह राष्ट्रवादी धार्मिक –विभाजनकारी भाषा का इस्तेमाल कर लोगोंको भड़काते हैं। और भिन्न भिन्न समाज के बिच संघर्ष की स्थिति पैदा करते है।

Tuesday, December 27, 2016

भीमा कोरेगावच्याही पलीकडे .......

१ जानेवारी हा दिवस “अन्याय मुक्ती दिन वा शौर्य दिन” म्हणून बहुजन समाजाकडून दरवर्षी साजरा केला जातो. आज जरी हा दिवस महाराष्ट्रापुरता साजरा केला जात असला तरी भविष्यात तो देशभर साजरा केल्या जाईल. या “अन्याय मुक्ती दिनाची” नाळ ही पुणे जवळील भीमाकोरेगाव या गावाशी सबंधित आहे. १ जानेवारी १८१८ हा दिवस हजारो वर्षाच्या सांस्कृतिक गुलामगिरीच्या बेडया तोडणारा होता. दुबळ्या लोकांना अन्यायपूर्ण वागणूक देत त्यांना अधिक दुबळे बनविनार्यां शेंडीधारकांची उर्मी उतरविणारा व अज्ञ लोकांना चिथावणी देवून स्वत: नामानिराळे राहणाऱ्या पेशवेशाहीच्या अस्ताचा सुदिन होता. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर नावाचा महान विद्वान १ जानेवारीला देशाच्या कोणत्याही कानाकोपर्यात असोत भिमाकोरेगावाच्या स्तंभावर माथे टेकण्यासाठी न चुकता जात असत.

Monday, November 21, 2016

बेचैन भारत में जनता की आवाज कहा है?

हाल ही में सर्वोच्च न्यायालय ने चलन बंदी के बारेमे कहा की, ....ऐसे ही रहा तो देश में दंगा सादृश्य परिस्थितियाँ निर्माण होगी. वैसेही आज भारत एक अफरातफरी के माहोल में जी रहा है. कही धर्म के नामसे, कही देशी जिहाद, कही धार्मिक आतंक  तथा कही दूसरे धर्म का होने के कारण एक दूसरे को मार रहा है. गाय के नामपर कुछ नकली राष्ट्रवादी गुंडे दलितोंकी बेरहमीसे पिटाई कर रहे है. उनपर कार्यवाही तक नहीं होती. गरीब और अमीर का फासला बढकर गरीब गरीब होते जा रहे है और अमीर दुनिया के अमिरोके लिस्ट में पहुच रहे है. भ्रष्टाचार ने अपनी सीमा पार कर ली है. देश के गद्दारों का स्विस बैंक और पनामा में काला पैसा जमा है. इन देशद्रोही कालाबाजारखोर बदमाषोकी की यहाँ वाही वाही हो रही है. उन्हें सन्मान मिल रहा है. वे मस्तवाल बुल (बैल) बनकर देश का पैसा विदेशोमे भेज रहे है. उनके ऊपर सरकार कोई भी कार्यवाही नहीं कर रही. लेकिन इसमे जनता की आवाज भी कहा दिख रही है? जनता गूंगी और मुकी बनकर बेचैनी से देख रही है. इस बेचैनी को विस्फोट के रूप में व्यक्त करना भूल गई है. 

Tuesday, November 1, 2016

“चार्वाक दर्शन” का वैज्ञानिक रूप

भारत में अनेकानेक दार्शनिक चिंतनोकी परंपरा रही है। उनमे मुख्यत: वैदिक, चार्वाक, जैन और बौद्ध दर्शन मुख्य है। वस्तुत: भारतीय दर्शन वैदिक (ब्राम्हण) और अवैदिक (श्रमण) वर्गों में बटा है। कभी कभी इसका वर्गीकरण आस्तिक और नास्तिक के तौर किया जाता है। ‘नास्तिको वेद निन्दक’ याने वेदो को नकारने वाले को नास्तिक कहा गया है। लेकिन वैदिकों के इस व्याख्या पर आज के विद्वानोमे आक्षेप और रोष है। उनके अनुसार आस्तिक का अर्थ है, अस्तित्व तथा प्रत्यक्ष रूप में  दिखाई देनेवाले प्रारूप को मानना और नास्तिक का अर्थ है, प्रत्यक्ष प्रारूप को नकार देकर अस्तित्वहीन कल्पना में खोजते रहना। इस अर्थ से वेद अर्थहीन कल्पनाओंकी खाण है। चार्वाकोने इन वेदों के अर्थहीन बातो का बहुत विरोध किया है। क्योकि वेदों/स्मुर्ती/पुराणों ने मिलकर भारत के सत्य इतिहास को दफना दिया है।

Wednesday, October 5, 2016

ओणम, महाबली और राष्ट्रीय स्वंयसेवक संघ

पिछले महीने देश का सांस्कृतिक माहोल बिघाडनेवाली दो घटनाए घटी। यह जानबूझकर किया गया प्रयास था। पहली घटनामे, केरल राज्य में प्राचीन काल से बड़ी धूमधाम से ओणम का फेस्टिवल मनाया जाता है। यह सांस्कृतिक उत्सव राजा महाबली के आगमन के तौरपर उनके स्वागत के लिए होता है। इस संदर्भ में राष्ट्रीय स्वंयसेवक संघ कि मल्यालम पत्रिका केसरी ने ओणम पर विशेषांक निकाला। विशेषांक में लिखे लेख में राजा महाबली कि मान्यताओं को तोडमरोडकर पेश किया गया। लेख में महाबली को असुरों (राक्षसों) का राजा और ओणम को महाबली के नाम से नहीं किंतु वामन (विष्णु) के स्वागत के तौर मनाया जाता है। ऐसा कहा गया। दूसरी घटना में, भाजपा के अध्यक्ष अमित शहा कि ओरसे सोशल मिडिया में किया गया ट्विट। ट्विट मे एक बैनर दिखाया गया, जहा वामन नाम का ब्राम्हण राजा महाबली के सर पे पैर रखकर उसे नरक में धकेल रहा है। राष्ट्रीय स्वंयसेवक कि पत्रिका का लेख और अमित शाह का ट्विट एकसाथ प्रगट होना, आदतन संघपरिवार के सोची समझी निती के तौरपर हुवा है।

Saturday, September 10, 2016

“अविवेकी” कोपर्डी आंदोलन

सध्या कोपर्डी गावात घडलेल्या “बलात्कार व खुन” प्रकरणाच्या निषेधाचे पेव जिकडे तिकडे उठू लागलेले दिसतात. असा निषेध होणे ही आवश्यक बाब झाली असून ती स्वागतार्हच आहे. कोपर्डीत जेव्हा बलात्कार व खुनाची घटना घडली त्याच काळात नवी मुंबईतील नेरूळ येथे प्रेमप्रकरणात स्वप्नील शिंदे या दलित तरुणाला जिवंत मारण्यात आले होते. बलात्कारी व्यक्ती वा खुनी हा कोणत्याही समूहाचा असो त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा झालीच पाहिजे. याउलट गुन्हेगाराला शिक्षा करण्यात कायदा कमी पडत असेल तर कायद्यात सुधारना करून अशा व्यक्तीना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. परंतु ज्याप्रकारे कोपर्डीकांडाचे सादरीकरण चालू आहे ते बघितल्यास कोपर्डी आंदोलन म्हणजे अविवेकाच्या नव्या शोधासारखेच वाटायला लागले आहे. कोपर्डीचे प्रकरण काय होते? आणि आता आंदोलन कशासाठी चालू आहेत? हे बघितले की या आंदोलनाचा, आंदोलनकर्त्या नेत्यांचा व आंदोलनात सहभागी झालेल्या समूहाचा अविवेकीपणा स्पष्ट होतो.

Sunday, August 21, 2016

नागरी (सभ्य) समाज की ऐसी की तैसी

किसी देश की सभ्यता और विकास उस देश में बसे हुए नागरी समाज के वर्तन पर निर्भर होता है  समाज में बसी हुयी कुप्रथाए, कु रीतिया, पुरानी परंपराए, अत्याचार और असमानता पर वे हमेशा हमला करते है मानवता और अधिकार के मुद्दे उनके अजेंडेपर होते है  किंतु, अगर यह सत्य है, तब उसका अनुभव भी आना जरुरी होता है अनेक देशो में इसके परिणाम दिखाई देते है  लेकिन जब भारत और दूसरे देशो के नागरी समाज की तुलना की जाती तब एक बड़ा अंतर दिखाई देता है  भारत का नागरी समाज “नपुसक और भयभीत” प्रतीत होता है  नपुसकता होती क्या है? जो समाज अपने आसपास घटित हुई घटनाओ पर कुछ भी प्रतिक्रिया न देकर केवल आखों से देखते रहता है  जो समाज अन्याय और असत्य के खिलाफ बोलने के लिए डरता हो, ऐसे समाज को “नपुसक समाज” कहा जाता है  भारत के नागरी समाज को इसी दृष्टिकोण से देखा जा सकता है  ऐसे लोगोंके चुप्पी के कारण आज देश  धर्मांधता, जातीयवाद, विषमता, कट्टरवाद, आर्थिक व सामाजिक असमानता आणि धर्मवादी गुंडों के चुंगुल में फसते जा रहा है

Saturday, August 20, 2016

नागरी समाजाची ऐसी की तैसी !

एखाद्या देशाची प्रगती ही त्या देशात असलेल्या नागरी समाजाच्या भूमिकेवरुण ठरविता येते असे म्हटले जाते. नागरी समाजाला दुसऱ्या शब्दात सभ्य समाज असेही म्हणतात. समाजातील अनिष्ठ प्रथा, रुढी, परंपरा, अत्याचार व विषमता यावर हल्ला करीत मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना ह्या नेहमी त्यांच्या अजेंड्यावर असतात. त्यासाठीच ते लढत असतात. परंतु हे जर सत्य असेल तर त्याची प्रचीती यायला हवी. इतर देशातील नागरी समाज व भारतातील नागरी समाज यांच्यात मात्र फार मोठी तफावत दिसते. एकंदरीत अभ्यासावरून भारतातील नागरी समाज हा “नपुसकांच्या व भेकड” भूमिकेतच अधिक दिसतो. मला “नपुसकत्व” या शब्दाच्या खोल दरीत जावून त्याचा अर्थ जाणून घ्यायचा नाही. तर या शब्दाचा व्यवहारातील साध्या व सोप्या भाषेतील निर्देशकाकडे बघायचे आहे. या अर्थाने नपुसक समाज म्हणजे काय? तर अवतीभवती ह्रदयाला हेलावून टाकणाऱ्या घटना घडत असताना मुकपणे बघणाऱ्या समाजाला नपुसक समाज म्हणता येईल. जो समाज एखाद्यावर अत्यंत क्रूरपणे अत्याचार होत असताना प्रतिक्रिया द्यायला घाबरतो असा समाजही “नपुसकच असतो. भारतीय नागरी समाजाकडे याच दृष्टीकोनातून बघावे लागते. या समाजाच्या अशा घाबरट गुणधर्मामुळे हा देश दिवसेनदिवस धर्मांध, जातीयवादी, विषमतावादी, कट्टरवादी, आर्थिक व सामाजिक असमानता आणि धर्मवादी गुंडागर्दीच्या विळख्यात सापडलेला आहे.

Wednesday, July 27, 2016

छोड़ दो ऐसे धर्म और काम को !

हाल ही में मा. नरेंद्र मोदीजी के हाय प्रोफाइल वाले गुजरात में दलितोको सरेआम मारनेका व्हीडियो सामने आया है। ग्यारह जुलाई को वेरावल के ऊना गांव में मरे हुए जानवर के चमड़ा उतारने के मामले में दलित युवकों की पिटाई की गयीदलित युवको को मारनेवाले गोरक्षा समितीके सदस्य थे घटना का वीडियो वायरल होने पर भी पुलिस हरकत में नहीं आई दलितोके विरोध करने के बाद गोरक्षा समितिके कुछ लोगोको गिरफ़्तार किया गया लेकिन मामला क़ानून की कड़ी धाराओं के तहत दर्ज नहीं किया गया
गाय है क्या? गाय एक जानवर है। जैसे बाकी जानवर होते है। हर जानवर की एक अपनी उपयुक्तता होती है, जैसी बकरी की होती है। लेकिन धर्म के ठेकेदारोने गाय का इतना महिमामंडन कर दिया की उसके शरीर के अंदर पुरे ३३ करोड देवी देवता को बसा दिया। आजतक लाखो गायों को काटा गया लेकिन किसी भी गाय के पेट से कोई भी देवी देवता बाहर नहीं निकली। गाय के पेट के अंदर से कोई भी देवता ने अपना चमत्कार दिखाकर गाय को मारनेवाले का पेट नहीं फाड़ा। ऐसी स्थिति में कहा रफूचक्कर होते है देवी और देवता? हाल ही में धर्म के ठेकेदारोने अफवाए फैला दी है की गाय के मूत्र में सोने का अंश है। बकवास की बाते करनेमें इन धर्म के ठेकेदारों का कोई हात नहीं पकड़ सकता। सामान्य लोगो को अंधविश्वास में डुबो देते है। वे अंधविश्वास के नाम से पैसा कमाते है। अभी तो गायों के रक्षा के नाम पर सरकार को लुटा जा रहा है।

Monday, July 18, 2016

मा.रत्नाकर गायकवाड यांना खुले पत्र

मा.गायकवाड साहेब, सविनय जयभीम
दै.लोकसत्ता मध्ये दिनांक १०.०७.२०१६ रोजी आपले मनोगत प्रकाशित झाले. काही न्यूज चनेल्स वर सुध्दा आपण आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याकडून आंबेडकर भवन पाडण्यासंदर्भात आंबेडकरी समुहात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्या लेखात ‘दलितांच्या सर्वांगीण विकासाठी एक मध्यवर्ती सामाजिक केंद्र निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी इमारत फंड उभारण्यास सुरुवात केली होती आणि त्या उभारलेल्या पैशातूनच बाबासाहेबांनी १० आक्टोबर १९४४ साली गोकुळदास पास्ता यांच्याकडून २३३२ चौ.यार्डाचा भूखंड घेतला व २९ जुलै १९४४ साली शेड्युल्ड कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची स्थापना केली’ असे आपल्या लेखातून स्पष्ट होते.

Saturday, July 9, 2016

आंबेडकर भवन व इलाईट क्लास

सध्या मुंबई स्थित आंबेडकर भवन  च्या मुद्द्यावरून आंबेडकरी समाजातच दोन गट पडल्याचे जाणवते. एक आंबेडकर भवन पाडल्याचा निषेध करणारा तर दुसरा समर्थन करणारा. भावी काळात आंबेडकरी समाज आपापसातच भिडण्याची ही नांदी आहे. पहिल्यांदाच आंबेडकरी समाजातील व्हाईट कलर वर्गाने आंबेडकरांच्या प्रतीकाच्या विरोधी भूमिका घेतलेली दिसते. एव्हाना एखाद्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडल्यावर जे आक्रंदन राजकीय नेते, टय सुटवाला वर्ग व सामान्य जनता करायची ती तीव्रता कमी झालेली आढळते. म्हणजे एकूणच आंबेडकर या महामानवाप्रतीची आस्था  कमी झाली असेही म्हणता येते. तसे बघितल्यास महाराष्ट्र ही महामानवांची कर्म व जन्मभूमी राहिली असली तरी ती वैचारिक क्रांती करून बदल घडविणारी भूमी असा तिचा मुळीच लौकिक नाही. स्वार्थी व दलाल (चमचेगिरी) प्रवृत्तीचा एक खास वर्ग येथे तयार झाला आहे.

Tuesday, July 5, 2016

निवडणुकीच्या आखाड्यात उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य. दिल्लीच्या केंद्रीय सत्तेची चाबी मिळवायची असेल तर ती याच राज्यातून मिळते. हा एक अलिखित समज आहे. आणि तो खराही आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये  भाजपाला याच उत्तर प्रदेशने दिल्लीची सत्ता मिळवून दिली. ज्यांच्या हातून उत्तर प्रदेश निसटतो तो देशाच्या मध्यवर्ती सत्तेच्या बाहेर फेकल्या जातो. कांग्रेसला आजची अवकळा जी प्राप्त झाली ती याच उत्तर प्रदेशामुळे. बाबरी मस्जिद पाडली गेल्यामुळे मुस्लीम समाजाने तर कांशीराम यांनी बहुजन जनतेमध्ये स्वाभिमान जागविल्यामुळे बहुजन समाजाने कांग्रेस पासून फारकत घेतली. त्यामुळे अपरिहार्यपणे कांग्रेसला गठबंधनाच्या (युपीए) माध्यमातून सत्ता उपभोगावी लागली हा अलीकडचाच इतिहास आहे.
उत्तर प्रदेशातील वर्ष २०१७ च्या विधानसभा निवडणुका म्हणजे काहींचा नव्याने राजकीय उदय, काहीचे पुनरागमन तर काही जे सत्तेमध्ये बसले आहेत त्यांना अधिक बळ प्राप्त करून देण्याचे साधन झाले आहे. मोदीच्या लोकप्रियतेचा कस लावणारी ही विधानसभा निवडणूक असेल. त्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व त्यांच्या अनेक संघटना कामी लागल्या आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शाह हे उत्तर प्रदेशात तळ ठोकून बसलेले आहेत. कोणत्या पक्षाला कशा प्रकारे खीळखिळे करायचे याची ते रणनीती आखीत आहेत.

Tuesday, June 21, 2016

सत्तापर्वात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ

२०१४ च्या निवडणुका झाल्या. नरेंद्र मोदी यांनी रंगविलेल्या गुजरात मडेलची भूरळ जनतेवर घालून भाजपाने केंद्रात सत्ता हस्तगत केली. राजकीय सत्तेची चव मोदीजी चाखत तर आहेतच परंतु त्याहीपेक्षा संघ हा सत्ताकारणाच्या शिर्षस्थानावर विराजमान होवून आपल्या योजना राबवीत आहे. अटलबिहारी यांच्या कार्यकाळात संघ दबूनच वावरत होता. संघावर वाजपेई यांचा वचक होता. परंतु नरेंद्र मोदीच्या कार्यकाळात तसे नाही. संघावर मोदीचा नव्हे तर मोदीवर संघाचे पूर्ण वर्चस्व आहे. मोदी हे संघाने त्यांच्यावर केलेल्या उपकाराच्या परतफेडीच्या भूमिकेमध्ये वावरत आहेत. संघ व त्यांच्या विविध शाखा आपापले ठरविलेले एजंडे पुढे रेटीत असताना दिसतात. त्यावर अंमलही होत आहे. मोदीच्या जाहीरनाम्यात नसलेले व संघाच्या पहिल्या पानावर असलेल्या मुद्यावरच देशात रोज घमासान होत आहे. यावर मोदीजी कसलीही प्रतिक्रिया न देता मौन राहणेच पसंत करतात. कदाचित त्यांच्या डावपेचाचा तो भाग असावा. मोदीजी परदेशात गेल्यावर खूप बढाया मारताना दिसतात मात्र देशात आल्यावर मौन राहतात. दोन वर्षानंतरही मोदी हे देशाचे नव्हे तर संघाचे, भाजपाचे व एका विशेष धर्माचे प्रधानमंत्री असल्यासारखे  वाटतात.