Thursday, June 26, 2025
लद्दाख येथील बौध्द धर्म: उगम व प्रसार
Saturday, June 21, 2025
लद्दाख में बौध्द धर्म
आज के समय लद्दाख
भारत का एक केंद्रशासित प्रदेश है। जब जम्मू काश्मीर पूर्ण राज्य के स्वरूप में
था, तब लद्दाख जम्मू काश्मीर का अभिन्न अंग था। लद्दाख सामरिक दृष्टी से भारत का
महत्वपूर्ण प्रदेश है। क्योकि लद्दाख की सीमाए भारत के अंतर्द्वंदी पाकिस्तान और
चीन के साथ जुडी है। भारत के स्वतंत्रता के बाद लद्दाख को हड़पने का प्रयास
पाकिस्तान ने १९४८ में, तथा चीन द्वारा १९६२ में किया गया था। लेकिन लद्दाखवासियोने भारतीय सेना का
साथ देकर १९७१ के युध्द में पाकिस्तान के बाल्टिस्तान क्षेत्र से तुरतुक और थांग
का भूभाग वापिस ले लिया। लद्दाखवासियोंको भारत के प्रति अपनापन एंव जो श्रध्दा रही, वह अद्वितीय है।
इसका मुख्य कारण भारत गौतम बुध्द की कर्मभूमि होना एंव लद्दाख के लोगो में बौध्द
धर्म के प्रति दृढ़ आस्था रहना है। लद्दाख में इसाई धर्म के प्रसार के लिए ब्रिटिश, जर्मन, इटली एंव
हंगेरी से इसाई मिशनरी आये। उन्होंने यहाँ पहले लद्दाखी एंव तिब्बती भाषा सीखकर
बौध्द धर्म को जाना। लद्दाखी -अंग्रेजी और जर्मनी शब्दकोष बनाए।
Thursday, April 17, 2025
युगप्रवर्तक: मान्यवर कांशीराम
कांशीरामजी यांच्या राजकीय सत्ता हातात घेण्याच्या संकल्पनेला काही बुद्धिवादी विचारवंताना सोडले तर बहुंतांशी विचारवंतांनी फारसे उचलून धरले नव्हते. याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्ष व प्रस्थापित विचारांच्या मिडीयाच्या विरोधात गेलो तर आयुष्यात आपल्याला काहीही (पद व प्रतिष्ठा) साध्य करता येणार नाही’ या भीतीने काही तथाकथित आंबेडकरवादी कांशीरामजींच्या संघर्षापासून दूर राहिले. व्यक्तिगत लाभासाठी सत्ताधार्यांना चुचकारणे व त्यासाठी समाजाचा बळी देणे हे अशा लोकांचे ध्येय राहिले होते.दलितांच्या सामाजिक न्याय व आर्थिक उन्नतीच्या मुद्द्यांना बगल देण्याचे प्रयत्न जाणीव पूर्वक होत आहेत. अशा अवस्थेत बहुजनवादी कधीपर्यंत विघटीत राहणार आहेत? हा आजचा मोठा प्रश्न आहे. संपूर्ण समाजाचा विकास बघायचा कि केवळ एक दोन नेत्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा विकास हे आता लोकांनीच ठरवायला हवे. एक संघटना व एक पक्ष या भूमिकेकडे हा बहुजन समाज कधी बघणार आहे? सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय लढे हे एकाच वेळेस व एकमेकाच्या साथीने लढल्यास ध्येय लवकर गाठता येईल हे आजच्या तथाकथित नेत्यांना का कळत नाही? समाजाच्या विकासासाठी नियोजन, साधनसामग्री, दबाव गट, एकीकृत वोट बँक, अवलोकन करण्याची क्षमता व सत्ताधार्यांना वाकविण्याची कुवत निर्माण झाली पाहिजे.
Tuesday, April 15, 2025
संभाजी महाराजाचे खरे शत्रू कोण?
चित्रपटगृहात संभाजी राजेवर आधारित छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देशात दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली. वास्तविकत: छावा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या “छावा” कादंबरीवर आधारित आहे. अशा कादंबर्या व नाटकातील बरेच प्रसंग हे काल्पनिक असतात. परंतु साध्या व भोळ्या जनतेला असे प्रसंग खरे वाटू लागतात व त्यातूनच आपले मत बनवीत असतात. अशावेळेस स्वार्थी व राष्ट्रद्रोही प्रवृत्तीचे नेते त्यात तेल ओतण्याचे काम करतात. यातून आपल्या देशाचे नुकसान होते हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
Wednesday, February 12, 2025
प्यू रिसर्च सर्वे: जगभरात वाढत्या धार्मिक राष्ट्रवादाची दाहकता
अलीकडेच प्यू रिसर्च सेंटर्स या संस्थेने जगभरात वाढता धार्मिक राष्ट्रवाद व त्याची देशानुरूप तुलना यावर संशोधनात्मक सर्वे केला. प्यू रिसर्चने हा सर्वे एकूण ३५ देशांमध्ये जानेवारी २०२४ पासून मे २०२४ पर्यंत करण्यात आला. या सर्वेनुसार जगभरात धार्मिक राष्ट्रवादाची होत असलेली वाढ ही एक जागतिक प्रवृत्ती बनत चालली आहे. हा धार्मिक राष्ट्रवाद त्या त्या देशाची सद्यस्थिती व राजकारणाला प्रभावित करीत असून अशा देशात प्रभावी धर्मवादी नेतृत्वाचा उदय झाला आहे. बहुसंख्यांक धर्मवाद व राजकारण एकमेकाचे सहकारी बनू लागले असून ते धर्मनिरपेक्ष लोकशाहीला मारक ठरत आहे.
Sunday, January 26, 2025
मनुस्मृति का दहन! लेकिन आगे क्या?
Sunday, January 12, 2025
मनुस्मृतीचे दहन ! परंतु पुढे काय?
Friday, November 1, 2024
विधानसभा निवडणुकामध्ये बहुजन-आंबेडकरी राजकारणाची स्थिती काय?
महाराष्ट्रात
विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने राजकारण करणारा
प्रत्येक पक्ष कामी लागला असून तिकीट नाकारलेले नेते पक्षनिष्ठा व विचार सोडून आमदारकीच्या
तिकिटासाठी इकडून तिकडे पळापळ करू लागले आहेत. दुसऱ्या मोठ्या पक्षात तिकीट न मिळाल्यास
त्यांचा ओढा वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज
पक्षाकडे असतो. या पक्षांचे पारंपारिक व्होट व स्वत:च्या प्रभावातील मतदान मिळवून निवडणुक
जिंकू असे या आयारामांना वाटत असते. तर आपल्या पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढेल हे
गृहीत धरून हे पक्षही त्यांना तिकीट देत असते. होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये
बसपा व वंचित आघाडीने अनुक्रमे २८८ व २०८ जागावर उमेदवार दिले असून अन्य बहुजन आंबेडकरी
पक्षसुध्दा स्वतंत्ररीत्या व आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यात नवीन
असे काही नसून यशाची पर्वा न करता प्रत्येक निवडणुकांमध्ये हे घडत असते. बहुजन आंबेडकरी
राजकारणावरील हि खिपलने गळून पडावीत याची सामान्य जनता अनेक वर्षापासून वाट पाहते. परंतु प्रत्यक्षात हे घडणे नाही याची रेघ व मेख
जनतेनी ओळखून घेतली पाहिजे.
Sunday, September 8, 2024
टिळक निर्मित गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली ?
Sunday, August 25, 2024
पेशवाईचे पतन: हिंदुच्या मुक्तीसाठी खुले झालेले द्वार!
ब्रिटीशाना भारतावर आपल्या साम्राज्याची मुहर्तमेढ
पक्की करण्यासाठी शेवटचा लढा महाराष्ट्राच्या भूमीवर लढला गेला. पेशवाईच्या अंताने
ब्रिटीशांनी आपला रोखलेला शेवटच्या श्वास सोडला असे म्हणता येईल. असे होण्यास येथील
अविवेकी व भोगाविलासी सरंजामदार व विषमतेनी बरबटलेली पेशवाई जबाबदार होती. बाळाजीपंत
नातू हे पेशवाई दरबारातील अंतस्थ माहिती ब्रिटीशांचे प्रतिनिधी असलेल्या एलीफिस्टनला
पुरवीत असायचे. दुसऱ्या बाजीरावाच्या डळमळीत धोरणामुळे त्याचा आष्टी व भीमा
कोरेगाव (१८१८) च्या लढाईत अंतिम पराभव झाला. बाळाजीपंत नातु या कारस्थानी व्यक्तीने
स्वत: ब्रिटीश सेनेच्या साक्षीने शनिवारवाड्यातील भगवा झेंडा काढून ब्रिटीशाचा
युनियन जॅक फडकवला. ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीरावाने जॉन माल्कम पुढे शरणागती
पत्करून आपल्या उदरनिर्वाहासाठी वार्षिक ८ लाख रुपयाच्या करारावर सही केली. त्यानंतर
बाजीराव हे बनारस मधील विठुर येथे उरलेले आयुष्य जगत राहिले. हा पेशवाईच्या अंताचा
शेवटचा टप्पा होता.
Saturday, July 20, 2024
तामिळनाडूतील दलित अत्याचार व स्टॅलिन यांची संदिग्ध भूमिका
तामिळनाडू हे
ई.व्ही.रामासामी पेरियार यांच्या विचाराचा वारसा लाभलेले राज्य. त्यांनी तमिळ
जनतेला समतेची व धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. त्यांच्याच विचाराचा आदर्श घेणारे
डीएमके (द्रविड मुन्नेत्र कझडम) व एआयडीएमके (अण्णा द्रविड मुन्नेत्र कझडम) हे दोन्ही
पक्ष नेहमीच राज्यातील सत्तेमध्ये असतात. त्यामुळे समतेचे व जाती निर्मुलनाचे लोन
प्रत्येक तामिळी कुटुंबात पोहोचवयास हवे होते. परंतु तसे झालेले दिसत नसून हिंदू
धर्मातील निम्न जातीवरील अत्याचार रोज पुढे येत आहेत. अशा घटनात सतत होणारी वाढ हि
डीएमके पक्षप्रमुख एम के स्टालिन यांचे वक्तव्य व कृती यात तारतम्य जुळत नसल्याचे
दिसते. त्यामुळे केवळ पुरोगामीपणाचा आव आणून सामाजिक सुधारणा करता येत नाही तर
त्याला कृतीची जोड असणे आवश्यक असते.
Sunday, July 7, 2024
के. चंद्रू यांचा शालेय जातीनिर्मुलन अहवाल काय सांगतो ?
Friday, June 21, 2024
आगामी विधानसभा निवडणुकीवर लोकसभा निकालाचे परिणाम काय होतील !
Tuesday, June 11, 2024
बहुजन चळवळीची पुनर्रचना कशी होईल!
Tuesday, May 28, 2024
बदलता अभ्यासक्रम बदलती मानसिकता
देशात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या अंतर्गत महाराष्ट्र
सरकारने काही पावले उचलली आहेत. त्यानुसार राज्याच्या शिक्षण मंडळाने इयत्ता
बारावी पर्यंतच्या अभ्यासप्रणालीत काही बदल केले असून नव्या आराखड्यासंदर्भात
नागरिकाकडून काही आक्षेप असल्यास ते नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. नव्या राष्ट्रीय
शैक्षणिक धोरणाचे प्रारूप बघितल्यास त्यात धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव याचा
अभाव दिसून येतो तर दुसऱ्या बाजूने त्या त्या राज्यातील मातृभाषा व स्थानिक भाषेला
प्राधान्य देत असताना इंग्रजीला ऐच्छिक सदरात टाकण्यात आले. किमान ५ व्या व आठव्या
इयत्तेपर्यंत शिक्षणाचे माध्यम मातृभाषा ठेवण्यात आली. परंतु ९ वी ते १२ पर्यंत
कोणते माध्यम असावे यावर संदिग्धता कायम आहे. इंग्रजीला निकडीची भाषा न करता
ऐच्छिक करणे हे भाषा क्षेत्रात विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर व त्यांची क्षमता
अधिक संकुचित करणारी ठरू शकते.
Wednesday, May 22, 2024
बुद्धाच्या मानसशास्त्रीय दृष्टीकोनातील पैलू
तथागत
बुद्धाला जगातील पहिला मानस शास्त्रज्ञ म्हटल्या जाते. बुद्धांनी अनेक शास्त्रीय
कसोट्या सांगितल्या आहेत. शास्त्रीय मानसिकता निर्माण होण्याची पहिली पायरी म्हणजे
आसपासच्या घडणाऱ्या घडामोडीकडे तर्काच्या दृष्टीकोनातून बघणे. बुद्धाने जगातील
घडामोडीकडे सूक्ष्म तार्कीकतेने बघितले आहे. भारतात मुख्यत: श्रमण व
ब्राम्हण ह्या दोन परंपरा होत्या. ब्राम्हण हे कर्मकांडी संस्कृती, आस्था व अंधश्रध्देचे निर्माते
होते. या संस्कृतीचा समाजावर अनिष्ठ परिणाम झाला होता. जनता ही मुख्यत: याज्ञिक,
अंधविश्वास आणि कर्मकांडाद्वारे फलश्रुतीच्या जाळ्यात अडकली होती.
Wednesday, May 15, 2024
चाणक्य : तो, मी नव्हेच !
भारतीय जनतेच्या मनात चाणक्य या व्यक्तीरेखेविषयी अनेक कांगोरे कोरले गेले आहेत. “अर्थशास्त्र” या पुस्तकाचे लेखक म्हणून चाणक्य (कौटिल्य) यांचेकडे बघितल्या जाते. हा ग्रंथ अर्थकारणापेक्षा राजकारण व प्रशासन यावर अधिक भाष्य करते. भारतात उपद्रवी मूल्यांना चाणक्यनीती संबोधण्याची परंपरा असून उपद्रवी व्यक्तिला चाणक्याची उपमा दिली जाते. कुणाचा कसा गेम करायचा यावर हि नीती (साम,दाम,दंड,भेद) अधिक भर देते. चाणक्य हे महान रणनीतीकार होते अशा स्वरूपाच्या कथा कादंबरी व नाटकातून प्रस्तुत केल्या जातात.
Tuesday, April 9, 2024
आधुनिक भारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान
स्वातंत्र्यपूर्व
काळात भारत राजकीयदृष्ट्या एकराष्ट्र नव्हते. ते अनेक संस्थानात विभागले होते.
प्रत्येक प्रांतात अनेक वंशाचे व धर्माचे लोक राहत
होते. प्रत्येक संस्थाने स्वतंत्र असल्यामुळे त्यांच्यात सांस्कृतिक कलह अधिक
होता. काहींचा धर्म एक असला तरी त्यात जातींची शोषणाधीष्ठीत उतरंड होती. आधुनिक
विचारधारेचा देश म्हणून मान्यता पावलेल्या ब्रिटीशांनासुध्दा येथील सांस्कृतिक
वर्चस्ववादाचे रूपांतरण समानतावादात करता आले नाही.
Monday, March 25, 2024
महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकांची आकडेवारी काय निर्देश देते ?
देशात निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या
निवडणुका जाहीर झाल्या. त्यानुसार महाराष्ट्रातील निवडणुक हि एकूण पाच टप्प्यात
होणार आहे. निवडणुकांच्या घोषणाबरोबरच विविध पक्ष व गठबंधन यांच्यात मतदार
संघासाठी रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसते. महाराष्ट्रात मुख्यत: दोन निवडणूक आघाड्या
दिसतात. त्यापैकी एक शरद पवार -उद्धव ठाकरे प्रणीत महाविकास आघाडी असून दुसरी
भाजपाप्रणीत महायुती..यात एक तिसरा महत्वाचा घटक
आहे, तो म्हणजे सध्यातरी स्वत: निवडून न येता एकाला जिंकवून
देणारा तर दुसऱ्याला हरविणारा. बहुजन वंचित आघाडी (बविआ) हा तो घटक होय. मागच्या
निवडणुकाप्रमाणेच यावर्षीच्या निवडणुकामध्ये बविआ हाच
महत्वाचा घटक ठरू शकतो. बहुजन वंचित आघाडीची ठाकरे
-पवार आघाडी सोबत युती होवू नये. यासाठी अदृश्य खेळ व वाटाघाटी चालू असणे हे
राजकारणात नवे असे काही नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा वंचितला किती जागा
द्यायच्या हा घोळ असून त्यांना स्वत:चेच मतदारसंघ वाटप करण्यात अडचणी येत असून
महायुतीला सुध्दा त्याच प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.
Monday, February 26, 2024
ओबीसी आरक्षणात मराठा भागीदारीची मागणी कितपत योग्य ?
गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे.
त्यासाठी त्यांनी “एक मराठा लाख
मराठा” या नावाने आंदोलने करणे सुरु केले. मराठा आरक्षणाची मागणी
केंद्र शासनाने आर्थिक मागास घटकासाठी (EWS) लागू केलेल्या
१० टक्के आरक्षणाने पूर्ण झाली असून महाराष्ट्रातील गरीब मराठा या आरक्षणाचा लाभ
घेवू शकतो. परंतु मनोज जरांगे या मराठा समाजातील नेत्याने मराठा समाजाला ओबीसी
कोट्यातून सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी मागणी पुढे केली. ओबीसीमध्ये समाविष्ठ
असलेले कुणबी या घटकाचे मराठ्या सोबत सगेसोयरे असे नाते जोडत सर्व मराठे हे कुणबीच
आहेत अशी भूमिका घेत मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याचा मुद्दा समोर केलाय.
त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला. सपूर्ण महाराष्ट्रात लाखोंचे
मोर्चे काढले. या दबावतंत्राचा महाराष्ट्र सरकावर इष्ट परिणाम होत सरकारने विशेष
अधिवेशन घेवून मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पास केलाय. तरीही
मनोज जरांगे हे ओबिसी आरक्षणातच मराठ्यांची भागीदारी व
सगेसोयरेसंबंधावर अडून आहेत.














