Tuesday, June 21, 2016

सत्तापर्वात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ

२०१४ च्या निवडणुका झाल्या. नरेंद्र मोदी यांनी रंगविलेल्या गुजरात मडेलची भूरळ जनतेवर घालून भाजपाने केंद्रात सत्ता हस्तगत केली. राजकीय सत्तेची चव मोदीजी चाखत तर आहेतच परंतु त्याहीपेक्षा संघ हा सत्ताकारणाच्या शिर्षस्थानावर विराजमान होवून आपल्या योजना राबवीत आहे. अटलबिहारी यांच्या कार्यकाळात संघ दबूनच वावरत होता. संघावर वाजपेई यांचा वचक होता. परंतु नरेंद्र मोदीच्या कार्यकाळात तसे नाही. संघावर मोदीचा नव्हे तर मोदीवर संघाचे पूर्ण वर्चस्व आहे. मोदी हे संघाने त्यांच्यावर केलेल्या उपकाराच्या परतफेडीच्या भूमिकेमध्ये वावरत आहेत. संघ व त्यांच्या विविध शाखा आपापले ठरविलेले एजंडे पुढे रेटीत असताना दिसतात. त्यावर अंमलही होत आहे. मोदीच्या जाहीरनाम्यात नसलेले व संघाच्या पहिल्या पानावर असलेल्या मुद्यावरच देशात रोज घमासान होत आहे. यावर मोदीजी कसलीही प्रतिक्रिया न देता मौन राहणेच पसंत करतात. कदाचित त्यांच्या डावपेचाचा तो भाग असावा. मोदीजी परदेशात गेल्यावर खूप बढाया मारताना दिसतात मात्र देशात आल्यावर मौन राहतात. दोन वर्षानंतरही मोदी हे देशाचे नव्हे तर संघाचे, भाजपाचे व एका विशेष धर्माचे प्रधानमंत्री असल्यासारखे  वाटतात.

Friday, May 13, 2016

तृप्ती देसाई यांचे आंदोलन व काही अनुत्तरीत प्रश्न

भारतात हिंदू धर्मातील स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाला होणारा विरोध हि काही नवीन बाब नाही. वेद काळापासून सुरु झालेले मानवी अवमूल्यन व्हाया पुराणे ते मनुस्मृतीच्या काळापर्यंत अधिक वेगाने झाले. मनुने आपले स्वत:चे कडक कायदे बनवून समाजव्यवस्थेवर बळजबरीने लादले. वेद, पुराणे व स्मुर्त्याचा धर्मशास्त्रे म्हणून गौरव करण्यात आला. या वैदिक धर्मशास्त्रानुसार (आता हिंदू धर्म व त्याची धर्मशास्त्रे असे नामकरण) स्त्रियाना अस्पृश्य, विटाळलेल्या व खालच्या दर्जाच्या मानल्या गेल्या. त्यांच्या स्पर्शाने देव व मंदिरांचे भंजन होते. देव बाटतात म्हणून स्त्रियांना हजारो वर्षापासून मंदिर प्रवेश व शिक्षण घेण्यापासून रोखण्यात आले होते. काळ बदलला, मनुस्मृती बाद होवून भारतीय राज्यघटनेचे कायदे लागू झाले तरीही धर्माचा धंदा करणाऱ्यांनी स्वत:ला त्या कुजक्या  धर्मशास्त्राच्या पानातच बंदिस्त करून ठेवल्याचे दिसते.

Thursday, May 5, 2016

"सैराट" च्या निमित्ताने

वेगवेगळ्या माध्यमात “सैराट” बद्दलच्या प्रतिक्रिया वाचल्या. त्यात सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या. त्यामुळे नागराज मंजुळेकृत “सैराट” लवकरात लवकर बघितलाच पाहिजे असे झाले होते. खरे तर नागराज मंजुळेने “सैराट”च्या माध्यमातून समाजातील ‘वास्तव चित्र’ रेखाटले आहे. देशाच्या ग्रामीण भागात जातीय मानसिकता कशी कार्यरत आहे हे वास्तव समोर तर येतेच पण त्याही पेक्षा ग्रामीण भागातील ‘आर्थिक विषमतेचे’ भयानक चित्र उभे राहते. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडलेल्या जातीय घटनांचा अनुबंध असल्याची अनुभूती सैराटचे कथानक बघितल्यानंतर येते.

Saturday, April 30, 2016

शक्ती, प्रतिष्ठा व लालसा: एक अन्योन्य सबंध

प्रतिष्ठा कुणाला हवी नसते. प्रतिष्ठेसाठी मानवी मन तर हपापलेलेच असते. व्यक्तीगत पातळीवर  प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून भौतिक जीवनात अनेक तडजोडी केल्या जातात. अशा तडजोडी बहुतेकदा स्वत:च्या तत्वाच्या विरोधात असतात. तरीही प्रतिष्ठे साठी अशा तडजोडी केल्या जातात. म्हणून प्रतिष्ठेचा पहिला बळी म्हणून “तत्वाकडे” बघितल्या जाते. जो तत्वाला बाजूला सारून प्रतिष्ठेसाठी तडजोडी करतो त्याला अनेकांच्या रोषाला बळी पडावे लागते. लाचार होवून मिळविलेली प्रतिष्ठा हि पदाचे वलय असेपर्यंत चमकत असते. परंतु जी व्यक्ती ‘तत्वाला’ आपला अलंकार समझते व तत्वाप्रमाणे कार्यप्रवण करीत असते अशा व्यक्तीला प्रतिष्ठा मिळत नाही काय? एकार्थाने अशा व्यक्तींना भौतिक प्रतिष्ठेची गरजच नसते. पदांची लालसा हि त्यांच्यासाठी गौण असते. कारण अशा व्यक्तीकडे समाजातील प्रत्येक वर्ग व व्यक्ती आदरानेच बघत असतो. ते त्यांना ठायी ठायी सन्मान व प्रतिष्ठा देत असतात.

Tuesday, April 19, 2016

त्रीरूपी रामदेव: बाबा, व्यापारी आणि कसाई

आजकाल “रामदेव” नाव धारण केलेले रामकृष्ण यादव हे खूप फार्मात असल्या सारखे दिसतात. हे रामदेव सध्या अनेक अवतारात दिसू लागले आहेत. टीव्हीचे कोणतेही चेनेल चालू केले की ‘रामदेव’ या ब्रान्ड वल्लीची जाहिरात झळकताना दिसते. या रामकृष्ण यादवाचे अनेक रूप बघायला मिळतात. त्यापैकी एक ‘योगा’ च्या मल्लखांबातून निर्माण झालेले “बाबा रामदेव”, दुसरे पतंजली पिठाच्या माध्यमातून औषध विकणारा एक उद्योगपती (व्यापारी) म्हणून तर तिसरे मनात आणले तर भारत माता की जय न म्हणाऱ्या लाखो टोपीधारक लोकांचे शीर धडावेगळे करण्याची दर्पोक्ती करणाऱ्या कसायाच्या अवतारात.
या रामदेव उर्फ रामकृष यादव याना अनेकजन ‘संत व बाबा’  अशी बिरुदावली लावतांना दिसतात. अशांनी संताची लक्षणे कशी असतात? हे डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे. “संत” कसा असावा? या संदर्भात तुकाराम महाराज, चोखोबा, नामदेव आणि ज्ञानेश्वर या संतांचा नीट अभ्यास केला पाहिजे. अभ्यासांती रामदेव यांना संत किंवा बाबा म्हणण्याची कोणाचीही हिंमत झाली नसती.

Friday, April 8, 2016

आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ

आंबेडकरोत्तर काळात मुख्यत: पाच चळवळीचा उदय झाला. त्यापैकी १९५७ मध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना,   १९७२ ला दलित पथरचा उदय, तिसरा अन्याय व शोषणाविरुध्द लेखणीच्या माध्यमातून रोष प्रगट करीत जगाला आपली कैफियत सांगणारे दलित साहित्य तर चौथे बहुजनवादी भूमिका घेत निर्माण झालेली बामसेफ व बहुजन समाज पक्ष आणि पाचवे धम्मपरिवर्तन चक्राला गतिमान करण्याच्या ध्येयवेडाने पछाडलेल्या खंडीत धार्मिक संघटना. रिपब्लिकन पक्षाचे रचनाकार स्वत: बाबासाहेब आंबेडकर होते. परंतु १९५६ ला अचानक झालेल्या महापरीनिर्वानामुळे रिपब्लिकन पक्षाची घोषणा त्यांना करता आली नाही. १९६२ च्या मध्यात झालेल्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाने आपल्या भविष्याची दमदार सुरुवात केली होती. पक्षाने उत्तर प्रदेश मध्ये अनुक्रमे ३ खासदार व ८ आमदार तर महाराष्ट्रात ३ आमदार, १९६७ च्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश मध्ये १ खासदार व १० आमदार तर महाराष्ट्रात ५ आमदार निवडून आले होते. मात्र हे यश पक्षाला पचविता आले नाही. रिपब्लिकन पक्षावरील वर्चस्ववादाच्या भांडणात पक्षाचा राजकीय ग्राफ तेजीने घसरू लागला. कांग्रेस पक्षाने याचा नेमका फायदा घेत रिपब्लिकन पक्षाची गटातटात विभागनी करून भविष्यात हे गटतट कधीच एकत्र येणार नाही याचीही तजवीज करण्यात आली.

Saturday, March 12, 2016

नैतिकता से हारे उन्मादी और खुदगर्ज न्यूज चैनेल्स

हाल ही में जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी में 9 फरवरी को कुछ शरारती तत्वों द्वारा देश के बरबादी के नारे लगाए. नारे लगाने वालो के चेहरे ढके हुए थे. दिल्ली पुलिस ने अभीतक गिरफ्तारी नहीं की. जेएनयु के दूसरे प्रसंग में पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगे. झी टिव्ही के फुटेज में एबिव्हिपी के कुछ छात्र यह नारे लगाते देखे गए. ऐसे में कन्हैया कुमार (जेएनयु छात्र संघटन का अध्यक्ष), उमर खालिद और अनिर्भान भट्टाचार्य का आजादी के नारे का व्हीडियो सामने आता है. अचानक झी टीव्ही, इंडिया टीव्ही, न्यूज लाईव्ह और टाइम्स नाउ जैसे न्यूज चैनेल्समें हडकंप मच जाता है. इन न्यूज चैनेल्स के प्राइम टाइम में तीनो विद्यार्थियोको देशद्रोही, गद्दार और आतंकवादी घोषित किया जाता है. उन्हें जेल में डालने की सलाह दी जाती है. पुलिस द्वारा की गई तुरंत कार्रवाहीमें पहले  कन्हैया कुमार, बादमे उमर खालिद और  अनिर्भान भट्टाचार्य पर देशद्रोह के नाम पर जेल में डाल दिया जाता है.

Saturday, February 27, 2016

बुद्धाच्या मानसशास्त्रीय दृष्टीकोनातील पैलू

तथागत बुद्धाला जगातील पहिला मानस शास्त्रज्ञ म्हटल्या जाते. बुद्धांनी अनेक शास्त्रीय कसोट्या सांगितल्या आहेत. शास्त्रीय मानसिकता निर्माण होण्याची पहिली पायरी म्हणजे आसपासच्या घडणाऱ्या घडामोडीकडे तर्काच्या दृष्टीकोनातून बघणे. बुद्धाने जगातील घडामोडीकडे सूक्ष्म तार्कीकतेने बघितले आहे. भारतात मुख्यत: श्रमण व ब्राम्हण ह्या दोन परंपरा होत्या. ब्राम्हण हे कर्मकांडी संस्कृती, आस्था व अंधश्रध्देचे निर्माते होते. या संस्कृतीचा समाजावर अनिष्ठ परिणाम झाला होता. जनता ही मुख्यत: याज्ञिक, अंधविश्वास आणि कर्मकांडाद्वारे फलश्रुतीच्या जाळ्यात अडकली होती.

Sunday, February 21, 2016

यह कौनसी पत्रकारिता है? कैसा देशप्रेम?

देश में आज हडकंप और अराजकता का माहौल बना हुवा है. देश की जनता कभी भी पार्टी विचारधाराओ में बटी नहीं होती. अगर ऐसा होता तो देश में एक ही पार्टी हमेशा के लिए सत्ता में बनी रहती. कार्यकर्ता, जिसका पेट पार्टी आधारित कार्यक्रमों के अंतर्गत चलता है. ऐसे लोग कार्यकर्ता बनकर पार्टी चलाते है. आर्थिक लाभ इसमे अधिक होता है. कुछ लोग देश में सत्ता में बने रहने के लिए और सत्ता से आर्थिक लाभ पाने के लिए  अशांती फैलाते है. किंतु, इसमे वकील, प्रशासन, पत्रकार, पोलिस और न्यायाधीश शामिल होंगे, वे एक पार्टी और विचारधारा के प्रवक्ता के तौर पर बोलने और चलने लगेंगे, तो सोचो देश का क्या होगा, क्या देश बचेगा? देश का भविष्य क्या होगा? सोचनेवाली बात है.

Friday, February 19, 2016

शिवरायांचा आठवावा प्रताप

आज  देश कधी नव्हे एवढ्या धर्म असहिष्णूतेच्या गर्तेत सापडला आहे. धर्म व परंपरांच्या नावाने मत्सर भावना वाढीस लावल्या जात आहे. राजकीय स्वार्थासाठी धूर्त मंडळी धर्माचा वापर करून देशात दंगली घडवून आणताहेत. हे सारे करताना मात्र शिवाजी महाराज की जय अशा घोषणा करण्यात येत आहेत. हे फारच क्लेशदायक आहे. शिवरायांना कट्टर धर्मश्रध्द ठरवून त्यांच्या विचाराची मोडतोड करून समाजात विष पेरून ही धर्म व धूर्त मंडळी यशस्वी होत आहेत. मात्र त्याउलट शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्षतेचे केवळ नायकच नव्हे तर महानायक होते. हे सनातन्यांना सांगण्याची गरज आहे. आज ब्राम्हण्यवाद्याकडून शिवरायांच्या राजवटीला धार्मिक परिमाण दिले जात आहे. ते हिंदू धर्म रक्षक व मुस्लीम विरोधी होते असा त्यांच्याकडून प्रचार करण्यात येत आहे.

Friday, February 12, 2016

महिला विरुध्द पुरोहित व धर्मशास्त्रे

आपल्या देशात अनेक माणसे स्वत:ला समाजसुधारक म्हणवून घेतात परंतु समाजसुधारणा करने तर दूरच, अनिष्ट नीतीच्या विरोधात साध्या प्रतीक्रीयेलाही ते घाबरत असल्याचे बघायला मिळते. सवर्ण हिंदू सुधारक सनातनी लोकांच्या विरोधात द्रोह करून समानतेच्या सुधारणा आणू इच्छित नाही. भारतात  सुधारणावाद्यापेक्षा विषमतावादी व्यवस्थेला कवटाळनारे व चुप्पी साधनारेच लोक अधिक दिसतात. शनी शिंगणापुर मध्ये भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून हे उघड झाले आहे. बहुसंख्य हिंदु सामाजिक सुधारणा व महिलांच्या समान हक्काच्या संदर्भात उदासीन असलेले दिसतात. किंवा पारंपारिक धर्म व्यवस्थेविरोधात बोलल्यास आपला पानसरे वा दाभोळकर तर होणार नाही ना! एवढी  भीती वाटावी

Friday, January 22, 2016

रोहित वेमूला, आम्हाला माफ कर !

रोहित वेमूला, एक तडफदार उदयोन्मुख शास्त्रज्ञ, भारदस्त लेखक बनू पाहण्याची स्वप्ने बघणारा, वादविवादामध्ये आपली मते ठासून मांडणारा. आंबेडकरी विद्यार्थी संघटनेचा एक विद्यार्थी नेता म्हणून कोणालाही न भिता सामोरे जाणारा. तुझा तो कणखर बाणेदारपणा त्याच विद्यापीठाच्या आवारात तंबू टाकून विसावतानाही दिसला. तुझ्या एका हातात क्रांतीचे विचार सांगत असलेला बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचा फोटो सतत दिसत होता. तर बाजूलाच स्त्रियाना शिक्षणासाठी प्रवृत्त करणारी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेचा फोटो. जीवनातील आदर्श पुरुष म्हणून बाबासाहेब आंबेडकर व मान्यवर कांशीराम यांच्याकडे बघण्याचा तुझा दृष्टीकोन हा आजच्या आंबेडकरी युवकांच्या मनात

Saturday, January 2, 2016

रामदास आठवले यांची हिंदुत्वाकडे वाटचाल ?

रामदास आठवले हे राज्यात अनेकदा चर्चेचा विषय ठरलेले आहेत. आठवलेंच्या चर्चेत राहण्याचे मुद्दे हे कधीच गंभीर नसतात. समाजाचे मुख्य प्रश्न त्यांच्यासाठी अनभिज्ञच असतात. मुख्यत: त्यांचा पेहराव, त्यांची बोलण्याची स्टाईल व संसदेमधील त्यांचे चुटकुले आणि शेरोशायरी हेच त्यांच्या चर्चेत राहण्याचे विषय आहेत. त्यांच्या राजकीय चळवळीतील सहभाग बघितला तर त्यांचे आंबेडकरी विचारासी काही देणेघेणे होते का? आणि आता तरी आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. श्रीपाल सबनीस यांनी प्रधानमंत्री मोदी यांचेवर टीका केल्यामुळे सबनिसांनी माफी न मागितल्यास साहित्य संमेलन उधळून लावण्याची भाषा करून पुन्हा आठवले पुन्हा चर्चेत आले आहेत. परंतु रामदास आठवलेंच्या या नव्या भूमिकेमुळे ते हिंदुत्वाकडे वाटचाल तर करीत नाही ना! यावर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Wednesday, December 30, 2015

इतिहासाचा काय गर्व? नवा इतिहास तर रचा !

समाजातील प्रत्येक वर्ग वा देश आपापल्या इतिहासाचा गर्व करीत असतो. कोणाचा इतिहास हा कु प्रथानी भरलेला असतो, तरीही तो त्या विक्षिप्त इतिहासाला गौरवान्वित मानीत असतो. कोणाचा इतिहास हा कपट नीतीने भरलेला असतो. अशा इतिहासाला काही लोक आदर्श इतिहासाचे लेबल लावीत असतात. समाजातील एक वर्ग अशा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न बघत असतो. गत इतिहासात काही पुरुष निर्माण झालेत, की ज्यांच्या विचारामुळे सामाजिक व्यवस्था व मानवी जीवन नरकयातनाचे केंद्र बनलेली होते. असे विनाश पुरुष सुध्दा आज त्यांचे आदर्श बनलेले आहेत. आजच्या वर्तमान काळात जे लोक अशा इतिहासाला व विनाश पुरुषांना आपला आदर्श व गर्व मानून

दै.महानायक मधील लेख


Monday, December 28, 2015

शनिशिंगणापूर महिलांच्या अपमानाचे केन्द्र

भारत हा महिला विकासाच्या संदर्भात आघाडीवर दिसत असला तरी महिलांच्या धर्म व पूजा स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये मात्र मागासच दिसतो. वेदकालीन कालखंड ते आजतागायत दिसणारे दृश्य बघितले तर, धार्मिक बाबतीमध्ये तो  महिलांच्या अपमानाचे केंद्र बनलेला आहे. कोणी एकाने म्हटले आहे, भारत हा मुर्ख लोकांचा देश आहे. धर्माच्या आतंकात तो एवढा बुडाला आहे की, त्यात तो स्वत:च्या बुद्धीलाच हरवून बसतोय. धर्म व देव ह्या गोष्टी आल्या की त्यांचे  विज्ञान व तर्क गळून पडत असतात. धर्मव्यवस्थेचा तो पार गुलाम झालाय.

कोणीही, मग ती महिला असो वा एखाद्या खालच्या जातीचा असो, त्यांनी शनी शिंगणापूरचा शनी असो वा तो ब्रम्हचारी हनुमान असो वा दुसरा कोणताही देव असो, यांच्या मुर्त्यांना स्पर्श केल्याने कोणाचेही काही बिघडत नाही हे शनीशिंगणापूरच्या घटनेने पुरते सिद्ध झाले आहे. स्पर्श केल्याने संकटाचे पहाड कोसळते, या ना त्या प्रकारचे प्रसंग ओढवतात हे सारे थोतांड असल्याचे साऱ्यांना कळून चुकले आहे. देवाची भीती हा पोटभरण्याचा धंदा झाला आहे.  

Thursday, December 24, 2015

इतिहास से गर्व क्या? नया इतिहास भी तो निर्माण करो!

समाज का हर वर्ग या देश अपने अपने इतिहास पर गर्व करते है किसी का इतिहास कुप्रथाओसे भरा होता है, फिर भी वे अपने मैले इतिहास को गौरवान्वित मानते है किसीका इतिहास छल कपट से भरा होता है, ऐसे इतिहास को भी कुछ लोक अपना आदर्श घोषित कर वर्तमान मे उसका प्रयोग करना चाहते है गत इतिहास में ऐसे पुरुष पैदा हुवे है, जिनकी विचारधारासे सामाजिक व्यस्वस्था तस की नस हो गयी थी ऐसे विनाशपुरुष भी आज किसीके गौरव है वर्तमान स्थिति में जो लोग तथा समूह ऐसे इतिहास को और कपट नितिकारोको अपना आदर्श घोषित कर उनके विचारों पर अंमल करना चाहते है, वे लोग लोकतंत्र को नकारते है, समानता से उन्हें डर लगता है, की जिससे वे अपना वजूद खो न बैठे अहंकारिता की कायरता उनके दिल दिमाग में बैठी होती है इस विचारधारा के लोग कभी भी बहुसंख्यांक नहीं होते अल्पसंख्यांक होते हुवे भी वे

Sunday, December 13, 2015

...... हा तर मुलभूत हक्क विरोधी निर्णय

हरियाणा सरकारकडून राज्याच्या पंचायत निवडनुकामध्ये उभे राहण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली. या नियमानुसार पंचायती निवडणुकांमध्ये उभे राहण्यासाठी किमान दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असण्याची अनिवार्यता, तसेच वीज बिल व बक हप्ते न भरणारे व थकबाकी असणारे लोक निवडणुकांना उभे राहू शकणार नाहीत. ज्यांच्यावर गंभीर अपराधिक आरोप आहेत असे व ज्यांच्या घरी कार्यान्वित शौचालय नसेल अशा लोकांनाही निवडणूक लढविण्यापासून हरियाणा सरकारने वंचित केले  आहे.
सरकारच्या या निर्णयाविरुध्द दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा सरकारच्या नियमांना वैध ठरविले आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निकाल वरकरणी चांगला वाटत असला तरी तो धक्कादायक आहे. हा निर्णय जनतेच्या निवडणूक लढविण्याच्या मुलभूत हक्कावर गदा

Saturday, December 5, 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीनिर्मुलन व आजची वास्तव स्थिती

भारतात जातीव्यवस्थेची भीषणता मांडणारे व जातीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगणारे बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती होत. जातीची मीमांसा करताना ते कोणासही भीत नसत. म्हणूनच जाती व वर्णव्यवस्थेची जननी असणाऱ्या मनुस्मृतीला जाळून टाकण्याचे धाडस त्यांनी केले. कोणत्याही देशात न आढळणारी जातीसंस्था हा भारतातील एक “महारोग” असे ते म्हणतात. हिंदू लोक बुद्धिहीन व अमानुष आहेत म्हणून जातीभेद पाळतात असे नव्हे, तर ते अधिक धर्मपरायण असल्यामुळे जातीभेद पाळतात. त्यासाठी त्यांच्या मनात जातीय वृत्ती रुजविणारा धर्म हाच जबाबदार आहे. बाबासाहेब म्हणतात, जातीव्यवस्थेचे खरे शत्रू जातीभेद पाळणारे लोक नसून त्यांना जातीभेद पाळावयास शिकविणारी शास्त्रे आहेत. शास्त्रवचने पवित्र व अपरिवर्तनीय असून ती सदैव पाळली पाहिजे. ही मानसिक श्रद्धा लोकांच्या मनात ठासून भरली आहे. म्हणून प्रथम शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा नष्ट करने हाच खरा उपाय आहे असे ते म्हणतात. वेद व शास्त्रे ह्याचे

Tuesday, December 1, 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले जातीमुल्यांकन

बाबासाहेब आंबेडकरांचा “अनिहीलेशन फ कास्ट” हा ग्रंथ असंख्य भारतीयांना अपरीचयाचा आहे. एखाद्या पुस्तकावर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो व नाव दिसले की ते पुस्तकच अस्पृश्य होत असते. त्या पुस्तकांना चाळने तर सोडाच, त्यावर नजर पडली तरी ते न पाहिल्यासारखे केल्या जाते. हा भारतीय जातीयवादाचा अस्सल नमुना आहे. ह्या जातीय मानसिकतेमुळे डाक्टर आंबेडकरांचे अनेक गाजलेली व तर्काने तुडूंब भरलेली पुस्तके सामान्य हिंदुच्याच नव्हे तर उच्चवर्णीय हिंदुच्या ग्रंथालयातील बुकसेल्फ मध्येही मिळणार नाहीत. बाबासाहेबांचे अनिहीलेशन फ कास्ट, कास्ट इन इंडिया व अनटचेबल हे समाजशास्त्रावरील प्रभावी ग्रंथ भारतातील विद्यापीठात अभ्यासक्रमात अजूनही लावले नाही. हे पाहता देशातील विद्यापीठे देखील जातीय मनोवृत्तीपासून अलिप्त नाहीत असे म्हणावे लागते. आंबेडकरांचे विचार न वाचताच त्यांच्याविषयी द्वेषमुलक भावना ठेवणारी पिढीच या देशात निर्माण करण्यात आली आहे. काही संघटना द्वेषाचा हावारसा आजही चालवीत आहेत. तसे नसते तर आंबेडकरांच्या विचारांनी हा देश कधीचाच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या जापान व नेदरलंड या देशाच्या रांगेत जावून बसला असता.

Friday, November 6, 2015

असहिष्णुतेचे विषाणू

इतिहासकार इरफान हबीब यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ या भाजपाच्या मातृसंघटनेची तुलना इसीस/तालिबानी अशा आंतकवादी संघटनेसी केली असल्याची बातमी अनेक वर्तमानपत्रात झळकली. त्यावर भाजप व संघीय नेत्यांचे तोल सुटलेले वक्तव्य व आगपाखड झालेले त्यांचे चेहरेही जनतेसमोर आले. यामुळे निर्माण झालेल्या मूळ प्रश्नाला बगल देता येणार नाही. इसीस/तालिबानी व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांच्या कार्यपध्दतीची तुलना सुध्दा निरपेक्ष पध्दतीने होणे आवश्यक आहे. इसीस/तालिबानी व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांच्यात बरेच साम्य बघायला मिळते. ते दोघेही कट्टर धर्मवादी असून आपली विचारसरणी दुसऱ्यावर थोपविन्याच्या बाजूचे आहेत. इसीस/तालिबानी स्त्रियांवर बंधने आणू इच्छितात तर स्त्रियांवर बंधने घालणारा मनुस्मृती हा संघासाठी प्रिय ग्रंथ आहे. इसीस/तालिबानी आपल्या विचाराविरोधी कृत्यासाठी खुणसूत्र घडवून

Friday, October 23, 2015

वंचितावरील (दलित) अत्याचारात लक्षणीय वाढ

याअगोदर वंचित (दलित) समाजावर जातीय अत्याचार होत नव्हते असे नाही. कांग्रेस सत्तेमध्ये असलेल्या महाराष्ट्रात अमानुष असे खैरलांजी हत्याकांड झाले. सातारा जिल्ह्यातील मुळगाव (२०१२) येथे रेखा चव्हाण या महिलेस विवस्त्र करून लाकडी दांडक्याने मारहाण करीत गावातील रस्त्यांवर फिरविण्यात आले होते. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई, खर्डा आणि पाथर्डी याठिकाणी वंचित समाजावरील अत्याचाराच्या कौर्याने तर परिसीमा गाठली. सतरा वर्षीय नितीन आगे यास उच्चवर्णीय मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली व त्याचे शरीर झाडाला अडकविण्यात आले होते. सोनई गावात तीन तरुणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती तर सातारा जिल्ह्यात शेतात विहीर खोदली म्हणून मधुकर घाटगे यांची निर्घुण हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. वसई येथे महापुरुषाबद्दल अपशब्द उच्चारल्याचा जाब विचारल्याने एक पत्रकारासह दोन भावावर तरुणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला

Friday, October 9, 2015

असा भारत हवाय कुणाला?

भारतीय घटनेने लोकशाही जीवन प्रणालीची सर्व समावेशक व्याख्या केली आहे. न्याय, स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव ही मूल्ये लोकशाही जीवन प्रणालीचा गाभा आहे. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य व संधीची समानता याचे सोबतच व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता निर्माण करणाऱ्या बंधुतेवर तिने भर दिला आहे. असे असले तरी वरील मुल्यांचा वेगवेगळा व सुट्या पध्दतीने विचार करता येत नाही. प्रत्येक मूल्य एकमेकाशी अतूटपणे जोडले गेले आहे. ह्याच एकत्रित जीवन प्रणालीला “लोकशाही जीवन” असे म्हटले जाते. प्रत्येक भारतीयाने ही “लोकशाही जीवनप्रणाली” जपने अपेक्षित आहे. ह्या “लोकशाही जीवन” पध्दतीला तडे गेल्यास तिचे फार अनिष्ठ परिणाम होवू शकतात. याची अनेक उदाहरणे आज बघायला मिळतात. अफगाणिस्थान मध्ये तालिबानने, सिरीया व  इराक या देशात इसीसने तर आफ्रिकेमधील काही देशात बोको हराम सारख्या संघटनांनी ‘एकात्म लोकशाही जीवनप्रणाली’ ला आवाहन देत ती उधळून लावीत आहेत. मानवतेला मोठ्या हिंसक, विक्राळ व क्रूर पध्दतीने चीरडण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. धर्मांधतेवर आधारित संघटना कोणत्या थरावर जातात याचे हे ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण आहे.

Friday, September 25, 2015

आरक्षणाची नाकेबंदी

भारतीय समाज व्यवस्थेचा इतिहास बघितल्यास विविध प्रकारच्या लादलेल्या कृत्रिम परंपरामुळे समाजात असमानता, विषमता, गुलामी प्रवृत्ती व अस्पृश्यता उदयास आली. ह्या व्यवस्थेमध्ये देशातील फार मोठा वर्ग बळी पडला होता. त्यांचे मौलिक हक्क पूर्णत: हिरावल्या गेले होते. सामाजिक सन्मान, शिक्षणाचा गंध व आर्थिक समृध्दी ही त्यांच्या पासून कोसो दूर होती. होती ती फक्त गुलामी. ब्रिटीश भारतात हे सारे बदलण्याची सुरुवात झाली नसली तरी पाश्चात्य देशातील समतेच्या विचारानी भारताच्या सीमा भेदल्या होत्या. नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक असमानता दूर केल्याशिवाय भारतात समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण होणार नव्हती. त्यासाठी भारतीय घटनेने हा हजारो वर्षाचा कलंक दूर करण्यासाठी मागासलेल्या समाजघटकांना प्रगतीच्या संधी उपलब्ध्द व्हाव्या म्हणून राज्य घटनेने अनु.जाती व जमातींसाठी अनुच्छेद १४ ते १८, २९(२) आणि ४६ व्या कलमाद्वारे विशेष

Thursday, September 17, 2015

आदिवासीसाठी धोक्याची घंटा: एक दृष्टीक्षेप

आदिवासी समुदायाचा इतिहास हा त्यांच्या स्वतंत्र धर्म, संस्कृती, समृध्दी व भाषेचा इतिहास आहे. त्यांच्या  स्वतंत्र लोकशाही पध्दतीमध्ये समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य याचे आचरण आहे. सहचार, सहविश्वास व सहमदत हा त्यांच्या जीवनाचा भाग. आपला स्वतंत्र धर्म व संस्कृती कोणावरही न लादता दुसऱ्याच्या धर्माचा भार आपल्या अंगावर वाहून वा लादून घेणे हा आता त्यांच्या नैसर्गिक स्वभावातील कृत्रिम शैली झालेली आहे. निसर्गावर त्यांची अतीव श्रद्धा असून दऱ्याखोरया, डोंगरे, जल, जंगल व प्राणीमात्रासी त्यांचा सबंध ही त्यांची जीवनशैली. आदिवासी समाज हा जसा जंगलात रमला तसा तो गावकुसाच्या आतमध्ये एका टोकाला वसला.

Tuesday, August 25, 2015

चळवळीत नवचैतन्य निर्माण करणाऱ्या तरुण नेत्याची गरज


आता देशात असंतोषातून आंदोलने पेटू लागलेली आहेत. गुजरात मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी चाललेल्या आंदोलनामध्ये एक हितेश पटेल हा तरुण पटेल समुदायाचे नेतृत्व करताना दिसतोय. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास १० लाखाचा समुदाय आंदोलनात सहभागी होतो. हितेश पटेल या तरुणाच्या संघटन कौशल्याला दाद द्यावी लागेल. दुसरा अल्पेश ठाकूर हा तरुण ओबीसी जातीचे नेतृत्व करून पटेल समुदायाला मागणीला आव्हान देतो. एकूणच गुजरातचे २२ ते २५ वयोगटातील तरुण त्या त्या समुहाचे नेतृत्व करताना दिसतात.
महाराष्ट्राचे तरुण याबाबतीमध्ये मागेच दिसतात. मागच्या सहा दशकापासून आंबेडकरी राजकीय व सामाजिक चळवळ ही गंजलेल्या, विकावू, स्वार्थी व दलालांच्या हातामध्ये आहे. याकडे आंबेडकरी तरुण केवळ ओशाळल्यागत नजरेने पहात आहे. परंतु गटातटाच्या या मस्तवाल बैलांना कोणीही प्रश्न विचारन्याची हिंमत करीत नाही. आताच्या या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील बैलांना समाजाचे कोणतेही प्रश्न दिसत नाहीत. बेरोजगारी, शिक्षणाचा प्रश्न, दलितांवरील सामाजिक बहिष्काराचा प्रश्न, नोकऱ्यांचा प्रश्न, खाजगी संस्थामध्ये आरक्षणाचा प्रश्न, आरक्षनाच्या अंमलबजावणीचा प्रश्न, महिलावरील अत्याचाराचा प्रश्न व राजकीय सत्तेमध्ये स्वत:च्या ताकदीवर उभा राहण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. पण समाज भरडत असलेल्या विविध प्रश्नावर ह्या बैलांनी तोंडाला कुलूप लागल्यागत केले आहे. ह्या अज्ञानी, प्रश्नाची समज व त्याची खोली माहीत नसलेले व बोलण्याचा ढब नसलेल्या नेत्यांचा भार आता का सहन करायचा? सिंग नसलेल्या ह्या बैलांना चळवळीच्या मार्गातून बाहेर फेकण्याची वेळ आली आहे. वेगवेगळया पागाच्या (गटांच्या) या बैलांची वेसन धरून त्यांना गोठ्यात जेरबंद केले पाहिजे.
नवचैतन्य निर्माण करणारे तरुण आता समाजाचे नेते झाले पाहिजेत. त्यासाठी तरुणांनी सामाजिक, राजकीय व आर्थिक अशा विविध विषयाचे ज्ञानकौशल्य प्राप्त करून समाज मनाला सरळ हात घालेल असे संभाषण कौशल्य साधले पाहिजेत. संघटन शक्ती व जनतेचे मुद्दे घेवून जो तरुण समाजात जाईल त्याला आपोआपच नेतृत्व मिळेल. गंज लागलेल्या बैलांना बाजूला सारून तरुणांनी समाजाचे नेतृत्व केले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना तरुणाकडून भरपूर आशा होत्या.

बापू राऊत  

Saturday, August 22, 2015

शिवाजी महाराज, शिवसेना व पुरंदरे

श्री ब. मो. पुरंदरेना “महाराष्ट्र भूषण” हा पुरस्कार जाहीर झाल्यापासूनच पुरंदरे हे चर्चेत आहेत. पुरंदरेना महाराष्ट्र भूषण देण्यात कोणते निकष वापरले गेले? हा प्रश्न अनेकजन उपस्थित करीत आहेत. वास्तविकत: महाराष्ट्रात पुरंदरेपेक्षा घराघरात जनजागृतीचे व खरा शिवाजी महाराज पोहोचविण्यात इतिहासकार मा.म.देशमुख यांचे कार्य मोठे आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य असूनही मा.म.देशमुख यांच्या नावाचा महाराष्ट्र भूषण साठी कधीही विचार करण्यात आला नाही. परंतु फडणवीसाचे सरकार सत्तेवर येताच पुरंदरेना महाराष्ट्र भूषण घोषित करून तो कडेकोट बंदोबस्तात प्रदान करण्यात आला. हा “महाराष्ट्र भूषण” या शब्दाचा खरा तर अपमान आहे. आजच्या घडामोडीत या पूरस्काराला “जातीवादाचे पारितोषिक” ह्या शब्दाशिवाय दुसरा पर्यायी शब्द होवू शकत नाही.

Thursday, July 23, 2015

सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण – २०११: एक दृष्टीक्षेप

सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण - २०११ चे आकडे भारत सरकारने नुकतेच प्रकाशित केले. शीर्षकात “जातनिहाय सर्वेक्षण” असे नाव असले तरी सरकारने कोणत्याही जातीचे नाव न घेताच जातीविहीन आकडे प्रकाशित केले आहेत. यातून जातीची लपवाछपवी चालू असल्याचे दिसते. जनगणनेच्या प्रसिध्द झालेल्या आकडेवारीवर अनेक अर्थातज्ञानी आक्षेप घेतलेले आहेत. संपूर्ण जनगणना झाली असतानाही शहरी आकडेवारीला बगल देत केवळ ग्रामीण भारताची आकडेवारी जाहीर करण्यात आली.  सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून देशात गरिबांची संख्या वाढलेली असतानाच अनुसूचित जाती व जमातीचे आर्थिक चित्र भयावह असेच आहे. देशातील तीन कुटुंबापैकी एक कुटुंब हे भूमिहीन आहे. देशात अनुसूचित जाती व जमातीच्या भूमिहीनांचे प्रमाण अधिक वाढलेले

Friday, June 26, 2015

शाहू महाराज व बहुजनवादी चळवळ

आज देशात बहुजनवादी राजकारण व समाजकारणाची धार अधिक तीव्र झालेली दिसते. आपल्या हक्कासाठी बहुसंख्य असलेल्या मध्यम व मागास जातींनी एकत्र येवून अल्पसंख्य परंतु पुढारलेल्या व शोषक धर्मसत्ताक जातीविरुध्द केलेली चळवळ म्हणजे “बहुजनवादी चळवळ” असी प्रचलित व्याख्या आहे. या बहुजनवादी चळवळीची नाळ ही २५०० वर्षापूर्वीच्या तथागत गौतम बुद्धाच्या काळापर्यंत जाते. गौतम बुद्धांच्या “बहुजन हिताय बहुजन सुखाय” या शब्द रचनेची फोड केल्यास पुढारलेल्या व धर्मसत्ता हाती असणाऱ्या अल्पसंख्यांक जाती  ह्या अशिक्षित शेतकरी, अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी ह्या बहुसंख्यांक जातीचे आर्थिक, सामाजिक व धार्मिक शोषण करून स्वत: मजेत जीवन जगत असत. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तथागत बुद्धाने  “बहुजन हिताय बहुजन सुखाय” ची हाक बहुजनांना दिली होती.

Sunday, June 14, 2015

उजवीकडे झुकलेल्या नेते व विचारवंताचा चळवळीवरील प्रादुर्भाव

पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील श्री रावसाहेब कसबे यांनी पुरोगामी चळवळीच्या ऱ्हासाचे कारण दलितांचा ब्राम्हणद्वेष असल्याचे सांगितले. रावसाहेब कसबे यांच्या या वाक्याला प्रसिध्दी माध्यमांनी लागोलाग प्रसिध्दी दिली. झी टीव्ही वर रावसाहेब कसबे, शेषराव मोरे व हरी नरके या तथाकथित विचारवंतांना चर्चा करण्यासाठी बोलाविन्यात आले. टीव्ही स्वर उद्घोषक जसे नेहमी नेहमी हिंदुस्थान हिंदुस्थान म्हणून बळरत असतात. तसेच काहीसे उदय निरगुडकर नावाचे झी चे उद्घोषक समरसता समरसता नावाचा सतत होषा करीत होते. समता या शब्दावर समरसतेचे आक्रमण होते असे निरगुडकराना ठणकावून सांगण्याची हिंमत रावसाहेब कसबे, शेषराव मोरे व हरी नरके यांना झाली नाही. हे दुर्दैवच आहे. चर्चेमध्ये या तिघाही तथाकथित

Monday, May 11, 2015

“पत” हरविलेली आंबेडकरी राजकीय चळवळ

लोकसभा, विधानसभा व नुकत्याच झालेल्या औरंगाबाद, नवी मुंबई महानगरपालिका तसेच काही नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल बघा. रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज पक्ष या पक्षांच्या राजकीय ताकदीचा अंदाज झालेल्या या निवडणूक निकालावरून दिसतो. रिपब्लिकन नेत्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिलेली आहे. बहूजन समाजाचे मताचे राजकारण करून आपली स्वत:ची झोळी भरणारे आठवले, गवई, कवाडे, मायावती व आंबेडकर या सर्वांना बहुजन जनतेने चांगलाच धडा शिकविलेला दिसतो. त्यामुळे एकूणच आंबेडकरवादी राजकीय पक्षाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. आंबेडकरी जनतेने  वर्षानुवर्षे जे स्वप्न बघितले होते ते एम.आय.एम सारख्या नवीन पक्षाने मुस्लीम समाजामध्ये स्वाभिमान व आत्मभान जागृत करून पहिल्या निवडणुकामध्येच विधानसभा व महानगरपालीकामध्ये प्रवेश करून दाखवून दिले.  

Saturday, April 25, 2015

मंडल आयोग व ओबीसी चळवळ

मंडल आयोग म्हणजे काय? याचे सरळ उत्तर द्यायचे झाल्यास, मंडल आयोग हा धर्मामुळे मृतप्राय झालेल्या ओबीसीचा, त्यांची सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षती बघण्याचा आरसा होय. ओबीसीमध्ये  सामाजिक व राजकीय मागासलेपणाचा प्रतिशोध घेण्याची मानसिकता निर्माण करण्याचे कार्य करण्याबरोबरच जातीव्यवस्था व उच्चवर्णीयांचा सांस्कृतिक दहशतवाद हाच आमच्या मागासलेपणाच्या दुरावस्थेला कारणीभूत असल्याची जाणीव प्रथमताच मंडल आयोगामुळे झाली.

Tuesday, March 24, 2015

सम्राट अशोकाचे धम्मविषयक धोरण

जगाच्या इतिहासात ज्या ज्या सम्राटांनी आपल्या कर्तुत्वाची छाप पाडली त्या सम्राटामध्ये मौर्यवंशीय सम्राट अशोकाचे स्थान अविवादीत आहे. प्राचीन वा अर्वाचीन सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा चक्रवर्ती सम्राट होय. सम्राट अशोकाने भारतावर इ.स.पू. २७२ ते इ.स.पू. २३२ च्या दरम्यान राज्य केले. सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्याने पश्चिमेकडे अफगाणिस्तान  इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूर व केरळ पर्यंत आपला राज्य विस्तार केला होता. ५०,००,००० वर्गकिमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक व भारतीय खंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते.

Saturday, March 21, 2015

आम आदमी पक्षातील मनोमिलाप किती दिवस चालणार!

आम आदमी पार्टीचे बिज हे अण्णा आंदोलनातून उगवले. जनलोकपाल सारखे कायदे अमलात आणने, भ्रष्टाचाराचा महारोग व कमीशनबाजी नष्ट करण्याची अपेक्षा प्रस्थापित राजकीय पक्ष व नेते यांच्याकडून  करने हे मुर्खपनाचे आहे. ज्याला आपण चिखल समजतो त्या चिखलात उतरूनच हवे ते जनकायदे बनविता येतील. त्यासाठी नव्या राजकीय पक्षाची अनिवार्यता का व कशी आहे? हे अरविंद केजरीवाल, योगेन्द्र यादव व प्रशांत भूषण यानी अण्णा हजारेना पटवून सांगितले होते. परंतु राजकरणात सहभागी  न होता राजकारण्यांची जातकुळी कशी असते? हे अण्णा हजारेंना