Saturday, September 13, 2014

नैतिकतेवर अनैतीकतेची मात ही लोकशाहीवर संक्रात


विपरीत विचाराची माणसे एकदा सत्ताधारी झाली की ते आपल्या सोयीप्रमाणे व्याख्या बनवायला लागतात. त्यासाठी ते आपल्या बालहटटासाठी प्रचलित प्रवाह वा पद्धती बाद करण्याचा प्रयत्न करतात. आपले म्हणने ग्राह्य ठरविण्यासाठी तर्काचे नवनवीन प्रमेये मांडायला लागतात. संविधानात्मक परंपरेची नैतिकता जपणारा समूह की जो स्वत:ला लोकशाहीचा चौथा खांब समजतो तो (प्रिंट/इलेक्ट्रानिक मिडिया)  “नवे काही तरी घबाड हाती लागले” असे समजून २४ तास चर्चा करीत त्याची ब्रेकिंग न्यूज बनवितो व सभ्य समाजाचे  (सिविल सोसायटी) प्रतिनिधी म्हणून मिरविणारे सफेद कुर्ताधारी माणसे अनैतिकतेला नैतिकतेचा मुलामा देण्यात सामीलही होतात. यात घटनेच्या नीतीनियमाची पायमल्ली होते हे ते सहज विसरतात. एकूणच अराजकता व विध्वंसकारी प्रथेला जन्म देण्यास त्यांना अयोग्य असे काहीही वाटत नाही.

Saturday, August 23, 2014

मोहन भागवताचे “अविवेकी” भागवत पुराण

मोदी सरकार सत्तेवर येताच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे फारच उत्साहित झालेले दिसतात. मोदी सरकारच्या येत्या पाच वर्षाचा काळात “संपूर्ण भागवत पुराण” लिहिण्याची त्यांना  फार घाई झालेली दिसते. त्याचाच भाग म्हणून पुराणांवर आधारित भारताचा नवा इतिहास लिहिण्याचे आदेश त्यांनी आपल्या संघीय इतिहासकारांना दिलेले आहेत. जगातील संपूर्ण धर्मांना गिळंकृत करण्याची ताकद हिंदू धर्मात असल्याची दर्पोक्तीही त्यांनी अलीकडेच मारली असून या देशाचे नाव भारत असणे हे त्यांना मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. या देशातील सर्व जनता ही हिंदू असून त्यांनी
स्वत:ला हिंदुस्थानी म्हटले पाहिजे असे जबरदस्तीवजा आवाहन त्यांनी केले आहे. तर हिंदू व्यतिरिक्त  इतरांना ते दुय्यम दर्जाचे नागरिक समजतात.
मोहन भागवताचे वरील आवाहन हे पूर्णत: संविधान विरोधी आहे. संविधानामध्ये “हिंदुस्थान” या शब्दाला कोणतेही स्थान देण्यात आले नाही. संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये स्पष्ट करण्यात आले की, या संघराज्याचे नाव इंडिया, अर्थात भारत असे असेल व हा राज्याचा संघ असेल. याच अनुछेदात (२) (३) मध्ये राज्यांची राज्यक्षेत्रे संपादित केली जातील अशी राज्यक्षेत्रे यांचे मिळून भारताचे राज्यक्षेत्र बनते असेही स्पष्ट केले आहे. तसेच संविधानाच्या उद्देशिकेमध्ये “आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य” असे नमूद केले आहे. त्यामुळे कायद्यानुसार या देशाचे नाव इंडिया वा भारत असे असताना मोहन भागवत हे या देशाला हिंदुस्थान संबोधण्याचे आवाहन करतात. हा या देशाच्या घटनाद्रोहाबरोबरच राष्ट्रद्रोह ठरतो. परंतु या देशाच्या पोलीस यंत्रणेने त्यांच्यावर अजूनपर्यंत कोणताही आरोप ठेवला नाही. या उलट शासन त्यांना  सन्मानाने वागवीत आहे. परंतु अरुंधती राय, डाक्टर सेन यांच्यावर प्रशासनाकडून पटकन राष्ट्राद्रोहाचे आरोप लावले जातात. त्यामुळे आजच्या सरकारची स्पष्ट दिशा काय आहे? हे सांगण्यासाठी कोणा गोसाव्याची गरज नाही. संघीय लोक व हिंदू तत्त्वप्रणालीला मानणारा मिडिया “भारत” या शब्दाऐवजी “हिंदुस्थान” या शब्दाचा वारंवार वापर करताना दिसतात. ही भूमिका राज्यघटनेतील तत्वाविरोधी असून तो षडयंत्राचा भाग आहे असे मानायला पाहिजे.

मोहन भागवताचा प्रिय शब्द हिंदूया शब्दाच्या उत्पत्ती बाबत अनेक विद्वानांनी संशोधन करून “हिंदू” शब्द परकीय असल्याचे सिद्ध केले आहे. गतकाळातील अनेक भारतीय नेत्यांनी हे मान्यही केले. स्वामी दयानंद सरस्वतींनी (१८२४-१८८३) वेदाकडे परत चला असे म्हटले होते तर अरविंद घोष हे (१८७२-१९५०) वेदांना वैदिक धर्माचे मूळ स्थान मानतात. स्वामी विवेकानंद हिंदू या शब्दाला चुकीचा ठरवीत म्हणतातthe word Hindu is a misnomer; the correct word should be a Vedantins, a person who follows the Vedas. 

भारतीय व विदेशी विद्वानांच्या संशोधनात हिंदूहा शब्द कोणत्याही वेदात, उपनिषदात, पुराणात, मनुस्मृती, रामायण, महाभारत, भगवतगीता, जैन धर्म व बौध्द धर्माच्या साहित्यात कधीही आलेला दिसत नाही. महावीर, बुध्द, सम्राट अशोक, चाणक्य, पतंजली, मनु व शंकराचार्य यांनीही हिंदू हा शब्द कधीही उच्चारला नाही वा कोठे कोरून ठेवलेला नाही. तो कोणत्याही पुरातन वैदिक मंत्र उच्चारणात शोधूनही सापडत नाही.  मुस्लीम आक्रमणानंतर “हिंदू” या शब्दाचा उदय तर ब्रिटिशांच्या काळात “हिंदुवाद” हा शब्द प्रचलित झालेला दिसतो. त्यामुळे उदयास आलेला हिंदूहा पुरातन शब्द नसून त्याला आलेले धर्माचे स्वरूपही आधुनिक आहे. या धर्माला ना धर्मंसंस्थापक आहे ना त्याचा कोणताही धर्मग्रंथ. तरीही हा शब्द बहुजनाच्या मस्तकात टाकण्याची जबरदस्ती मोहन भागवतीय प्रवृत्ती करीत आहे. हा संघीय षडयंत्राचा भाग आहे.
हिंदुस्थानात राहणा-या प्रत्येकाला हिंदू का म्हटले जात नाही, असा सवाल संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला आहे. यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये राहणाऱयांना इंग्रज, जर्मनीत राहणाऱयांना जर्मन, अमेरिकेत राहणाऱयांना अमेरिकन म्हटले जाण्याचा तर्क दिला आहे. याच तर्काने भारतात राहणा-यांना भारतीय असे संबोधण्यात येत असते. याचे ज्ञान भागवताना नाही काय?. गुलामीदर्शक  “हिंदुस्थान” हा शब्द या देशातील बहुजनांना मान्य नाही. तरीही भागवती प्रवृत्ती “हिंदू व हिंदुस्थानीचे” गीत गातात. या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करायचे व त्याआडून भारतीयावर सनातन धर्मीय “चातुर्वर्णीय व्यवस्था” लादायची हा संघानितीचा एक भाग आहे.
जगातील सर्व धर्मांना गीळकृंत करण्याची ताकद हिंदू धर्मात असल्याची दर्पोक्तीही भागवताने मारली. त्यांच्या या दर्पोक्तीमध्ये कसलेही तथ्य नाही. या देशाच्या भौगोलिक परिस्थितिमूळे अरबांनी इंदू/सिंधू नदीच्या पलीकडील सर्व लोकांना हिंदू म्हटले. आणि त्यामुळेच नदी पलीकडे वास्तव्य करणा-या येथील विविध समुदायाच्या लोकांना विशेषत: जैन व बौद्धांना हिंदू लेबल आपोआप लावल्या गेले. फार मागे न जाता स्वातंत्र्यानंतरचा काळ बघितला तर या देशात कोणत्याही मुस्लीम वा ख्रिश्चन वा बौध्द समुहाने हिंदू धर्म स्वीकारला नाही. याउलट लाखो हिंदूचे मुस्लीम, ख्रिश्चन तसेच बौध्द धर्मात धर्मांतरण झालेले बघायला मिळते. हे धर्मांतरण स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी झालेले दिसते. जातीभेद, विषमता, अन्याय व अपमान या दलदलीतून निघून मुक्त जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धर्मांतरण  होय. मात्र राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कैचीत आदिवासी (आदिम धर्म) सापडलेला दिसतो. हिंदुत्ववादी आदिवासींना “वनवासी” म्हणून संबोधत असतात. त्यांना वनवासी संबोधून त्यांच्या “घरवापसीचा नारा” संघांनी दिला. आदिवासीचे हिंदुकरण करण्याच्या षडयंत्राला आदिवासी समाज बळी पडून आपली मूळ संस्कृती नष्ट करून घेत आहे. याच आदिवासीचे हिंदूकरण करणारे मात्र सरकार व खाजगी कंपन्या जल, जंगल  जमीन हिसकावून त्यांना जंगलाबाहेर हाकलून देत आहे. अन्न, वस्त्र व निवारा ह्या प्राथमिक गरजा आदिवासी ज्या जंगलातून पूर्ण करतात त्याच जंगलाच्या बाहेर त्यांना काढण्यात येत आहे.  त्याविरोधात मात्र “ब्र” शब्दही काढीत नाही. यावरून संघाला आदिवासीच्या जीवनासी, त्याच्या भूकेशी काही देणेघेणे नाही तर त्यांना केवळ हिंदूची लोकसंख्या फुगन्यासी सबंध आहे.
मोहन भागवताच्या संघाने या देशाचा इतिहास बदलविण्याचा घाट घातला आहे. गुजरात ही त्यांची प्रयोगशाळा आहे. बालसंस्काराच्या नावाखाली पौराणिक काल्पनिक मिथ हे इतिहास म्हणून कोवळया मनावर बिंबविण्याचा प्रयत्न हा सत्य लपवून ठेवण्याचा अघोरी उपाय होय. रामायण, महाभारतातील कपटी कारस्थाने, महिलावर झालेली चिखलफेक, ब्राम्हणी सामाजिक व्यवस्था, ब्राम्हण वर्गाचे समाजावरचे नियंत्रण व इतरांच्या धर्माचा द्वेष हे विषय शिकवून संघाला (अ)विवेकी समाज निर्माण करून आस्थेला सर्वोच्च स्थान देवून डोके हलविणारी विजय भटकरादी पिढी निर्माण करायची आहे काय?     
विवेकवाद हा 'प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान' या स्वरूपाचा असतो. विवेकवादाच्या वाटचालीतील महत्वाचे धोरण म्हणजे समाजाचा मनात समतेचे, एकतेचे, विज्ञानवृत्तीचे रोपण करने हे असते. आस्तिक व नास्तिक या वादात न पडता सहयोगी अस्तित्वावाराचा दृढविश्वास व त्यावरची वाटचाल. मोहन भागवताना “विवेक व विवेकवाद” या शब्दाची फार अलर्जी असावी. त्यामुळेच त्यांच्या मनात  “अविवेकी विध्वंसाची” पुनरुक्ती नेहमी नेहमी होत असावी. कारण विवेकशून्य माणसेच समाजात व माणसामाणसात विषवल्लीचे रोपण करीत असतात. अशा लोकांना शांतता, विश्वास व सहजीवन नकोसेच असते. तर त्यांना हवी असते अंधश्रद्धा, द्वेषावर आधारित समाजपद्धती व मानसिक दृष्ट्या पाया पडणारी पंगु पिढी. ती निर्माण करण्यासाठी भागवत व त्यांचे संघीय सैनिक आपली सारी हयात घालवीत आहेत. ज्यांना समाजाने शहाणे होवूच नये, त्याने उलट प्रश्न करूच नये असे वाटते तो धुर्तांचा वैमानिक असतो. त्यांचा तर्क व न्याय यावर विश्वासच नसतो. मोहन भागवत व त्याचा संघ आज अशा धुर्तांची भूमिका वटवीत आहे. या अविवेकी “भागवत पुराणाचा” उधळणारा चौखूर वेळेत रोखला नाही तर विनाशाशिवाय दुसरे काहीही हाताला लागणार नाही याचीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

बापू राऊत

९२२४३४३४६४

Wednesday, August 13, 2014

बिरसा मुंडा को भारतरत्न का सन्मान क्यों नहीं?

प्रिंट और इलेक्ट्रानिक मिडियाके माध्यमसे पता चलता है की, मोदी सरकारने मा. अटलबिहारी बाजपेई, मा.कांशीरामजी और प.मदन मोहन मालवीय को भारतरत्न देने का निर्णय लिया है. भारतरत्न देश के उन सपुतोको मिलना चाहिए जिन्होंने देश के लिए कुर्बानी दी है, जिनका कार्य स्वाभिमान और संघर्ष का प्रतिक बन गया हो. उनके कार्योंसे देश की जनता तथा युवको को प्रेरणा मिली हो. अटलबिहारी बाजपेई का कार्य भाजपा को सत्ता में लाकर देश का प्रधानमंत्री बनने तक सिमित है. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी की नीव रखनेका कार्य प.मदन मोहन मालवीय ने कीया है तथा  मा. कांशीराम ने महाराष्ट्र के पूना से सरकारी नोकरी छोडकर दबे कुचले तथा बहीश्कृत समाज के उत्थान के लिए कार्य किया, उन्हे  स्वाभिमान की ज्योत जगाकर राजकीय सत्ता हथीयाने का मन्त्र दिया. उत्तर प्रदेश में सरकार स्थापित करने के बाद भी उन्होंने सत्ता का लाभ कभी नहीं लिया था.

Tuesday, August 5, 2014

शंकराचार्य ने कहा शिर्डी के साईबाबा भगवान नही है ।

द्वारका शंकराचार्य ने शिर्डी के साईबाबा की पूजा न करनेकी हिंदुओको हिदायत दी हैवे कहते है  की, हिन्दुओ को साई बाबा की पूजा करना सही नही है हिंदू धर्म मे सिर्फ अवतार और गुरुओकी पूजा होती हैवे कहते है, कलियुग मे केवल बुध्द और कल्की का अवतार हुवा हैऐसे मे साई की पूजा करने का कोई मतलब नही साई न अवतार है और नही उन्हे गुरु के रूप मे आंक सकते है। गुरु आदर्शवादी होते है, लेकिन साई मे ऐसा कुछ नही था। हम मासाहारी को गुरु नही मान सकते। उन्होने केंद्रीय मंत्री उमा भारती की आलोचना करते हुवे उसपर राम भक्त नही होने का आरोप भी

Sunday, July 27, 2014

भारतीय इतिहास बदलविण्याचे षडयंत्र

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने मा.नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली. जनतेनी नरेंद्र मोदीच्या अच्छे दिन आनेवाले है, सबका विकास – सबका भला अशा प्रकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांना व त्यांच्या पक्षाला बहुमताने निवडून दिले. मोदीच्या प्रचारात धर्म, मंदिर यासारखे मुद्दे नव्हते तर विकास हा मुख्य मुद्दा होता. मोदी जिथे जात तिथल्या स्थानिक प्रश्नासी  निगडीत होत ते प्रश्न सोडविण्याची हमी देत असत. मोदींच्या याच हमीवर विश्वास ठेवून

Monday, July 21, 2014

दाभोळकरांच्या हत्या चौकसीवर पोलिसांच्या अंधश्रद्धेचा फवारा

इंटरनेट वरील आउटलुक या मासिकाच्या वेबसाईटवर १४ जुलै २०१४ चा अंक बघितला. त्या अंकामध्ये  डाक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीचा लेखाजोगा श्री आशिष खेतान या शोधकरिता पत्रकाराने मांडला. लेखातील मजकूर खेदजनक व धक्कादायक होता. तो लेख वाचताना मन सुन्न होत पोलीस व त्यांच्या मानसिकतेवर अनेक प्रश्न चिन्ह उभे राहत होते. हेच का ते तल्लख व सदसदविवेक बुद्धीचे महाराष्ट्रीयन पोलीस?. कसली यांची तल्लख बुद्धी व सदसदविवेक? हे तर अंधश्रद्धेचे महाबळी आहेत. असे लेख वाचताना राहून राहून वाटत होते. पोलिसांच्या मानसिक कुवतीची कीव येत होती.

Tuesday, July 15, 2014

शेतक-यानो सावधान, सरकार जबरदस्तीने तुमच्या जमिनी हडपणार !

दिनांक १५.०७.२०१४ च्या इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार ग्रामीण विकास मंत्रालयाने प्रधानमंत्र्याकडे देण्यासाठी १९ नवीन प्रस्ताव तयार केले आहेत. या प्रस्तावानुसार सरकार पब्लिक – प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्ट तसेच पूर्णत: प्रायव्हेट (खाजगी) प्रोजेक्ट करिता शेतक-यांच्या जमिनी त्यांची परवानगी न घेता सरकारकडून हस्तगत करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर खाजगी विकासक सुध्दा शेतक-यांच्या जमिनी जबरदस्तीने घेवू

Wednesday, June 18, 2014

लोकराजा शाहू महाराज

देशात व विशेषत: महाराष्ट्रात शिवाजी महाराजानंतर राजेशाहीतील सर्वात चर्चित व्यक्ती कोणी राहिली असेल तर ती म्हणजे कोल्हापूर संस्थानाचे राजे राजश्री शाहू महाराज होत. शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या कार्यामध्ये काही मुलभूत फरक दिसतात. ब्राम्हणी संस्कृती व तिची विचारधारा, ब्राम्हणी संस्कृतीचे भय व न्यूनगंड तसेच अस्पृश्यता व जातीभेद याचे निराकरण या कसोट्यांवर या दोन राजांची कर्तव्यकठोरता तपासली तर शाहू महाराज हे शिवाजी महाराजापेक्षा उजवे ठरताना दिसतात. आदिल व निजामशाही बरोबरच मोगलसाम्राटाकडून राज्य हिसकावून घेणे व ते टिकवून ठेवणे या संघर्षात शिवाजी महाराजांचा

Monday, June 2, 2014

United Nations condemns gang-rape and murder of teenage girls in Badaun, Uttar Pradesh

Statement by Lise Grande, United Nations Resident Coordinator; Dr Rebecca R Tavares, Representative, UN Women’s India Multi Country Office and Louis-Georges Arsenault, UNICEF Representative to India.
The UN in India condemns the brutal gang-rape and murder of two teenaged girls on the night of May 28 in Katra village in Uttar Pradesh’s Badaun district and calls for immediate action against the perpetrators and to address violence against women and girls across India.

Saturday, April 26, 2014

Bapu Raut: डाक्टर व संत :जाती संस्थेचे उच्चाटन - एक परिचय

Bapu Raut: डाक्टर व संत :जाती संस्थेचे उच्चाटन - एक परिचय: ‘ अॅनिहीलेशन    ऑफ   कास्ट ’ (जातीसंस्थेचे उच्चाटन) हा डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रसिध्द ग्रंथ. बाबासाहेब आंबेडकरांचा सदर ग्रंथ म्ह...

डाक्टर व संत :जाती संस्थेचे उच्चाटन - एक परिचय


अॅनिहीलेशन  ऑफ कास्ट(जातीसंस्थेचे उच्चाटन) हा डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रसिध्द ग्रंथ. बाबासाहेब आंबेडकरांचा सदर ग्रंथ म्हणजे आर्यसमाज प्रणित जातपात तोडक मंडळाचा लाहोर येथे होणा-या वार्षिक अधिवेशना करिता तयार करण्यात आलेले अध्यक्षीय भाषण होते. हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचे काम लाहोर येथील जात-पात-तोडकमंडळ करीत असे. आंबेडकरांनी अध्यक्षीय

Friday, April 18, 2014

आदिवासीयो की चुनौतिया है बेकरार (बीबीसी न्यूज) येथे क्लिक करा
दुनिया के सबसे क़ीमती बॉक्साइट भंडारों में से एक इन पहाड़ियों के नीचे दबा है और यहां के आदिवासी ज़िंदगी की बुनियादी चुनौतियों से लड़ने में ही लगे हैं.उनकी स्थानीय बोली को समझना उड़िया जानने वाले दुभाषियों के लिए भी आसान नहीं है. लेकिन उनके ख़ूबसूरत चेहरों पर आक्रोश, ग़ुस्सा और डर पढ़ने के लिए भाषा की ज़रूरत नहीं है. मैं गोर्था गांव की उस खंडहर होती इमारत के सामने खड़ा हूं, जहां स्कूल होना था, पर जहां ‘कोई मास्टर नहीं आया’ और जिसका इस्तेमाल इमली सुखाने के लिए होता है. जंगल है, हरा भरा है, पुराने पेड़ हैं, परिंदे हैं, जानवर हैं. पीने के पानी का पक्का इंतज़ाम नहीं है. बिजली के खंभे भी नहीं हैं.

Tuesday, April 15, 2014


    लोकजागर एप्रिल २०१४

डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून लोकजागर हे ई-मासिक  प्रकाशित करण्यात आलेले आहे.बहुजनांच्या समस्या प्रखरपणे मांडणे हा या मासिकाचा मुख्य हेतू आहे. आपल्या टीका वा समर्थनार्थ प्रतिक्रिया  आवश्यक आहेत. त्या आधारावरच गरज भासल्यास  ई-मासिकाची मांडणी व त्यातील माहितीची फेरमांडणी करता येईल.वाचकांच्या सूचनांचा सन्मान करून त्याची मते प्रकाशित करण्यात येतील.

मासिक वाचण्यासाठी वरील लोकजागर एप्रिल २०१४ वर क्लिक करा 




Saturday, April 5, 2014

The Plight of Religious Freedom in India


USCIRF has been closely monitoring the situation in India. Dr. Katrina Lantos Swett, Vice Chair, United States Commission on International Religious Freedom (USCIRF) In her report she said that,
In the months leading up to India’s 2014 national elections, there has been a rise in acts of violence targeting religious minorities and an increase in discriminatory rhetoric that has polarized national politics along religious and class lines. Underlying problems have been exacerbated by the implementation of ‘Freedom of Religion Acts’ across five Indian states, which have led to higher reported incidents of intimidation, discrimination, harassment, and violence against minorities. Severe outbreaks of communal violence against religious minorities, including the 2002 Gujarat riots targeting Muslims, the 2007 mob attacks against Christians in Odisha, and the anti-Sikh riots of 1984 have socially and economically marginalized large pockets of religious minority communities. As the 2014 Indian elections draw closer, it is important to examine the implications of this polarization in the context of the US-India relationship.
For any questions, please contact the Tom Lantos Human Rights Commission at 202-225-3599 or tlhrc@mail.house.gov, or Carson Middleton (Rep. Pitts) at 202-225-2411.
James P. McGovern and Frank R. Wolf
Co-Chairs, TLHRC
                                                               Joseph R. Pitts
                                                           Executive Committee Member, TLHRC

Thursday, March 27, 2014

सत्य हे कटू असते तेच खरे .......... हिंदुइझम :अॅन आल्टरनेटिव हिस्टरी

वेडी डॅनिजर या लेखिकेचा हिंदुइझम: अॅन आल्टरनेटिव हिस्टरी  हा ग्रंथ पेंग्विन पब्लिशर्स ने प्रकाशित केला. सदर पुस्तक म्हणजे वैदिक संस्कृत ग्रंथात लिहिल्या गेलेल्या वस्तुस्थितीदर्शक  विविध बाबीची चर्चा व त्याचे विश्लेषण होय. भारतातील ९९.९९ टक्के जनतेला संस्कृत भाषा कळत नाही. त्यामुळे सामान्य जणांना वैदिक संस्कृत ग्रंथात काय लिहिले आहे याचा थांगपत्ता लागणे कठीणच आहे. आतापर्यत संस्कृत ग्रंथातील ब्राम्हण समाजाच्या सोईचा भागच बाहेर येत असे. कारण भारतात प्रकाशक व लेखक हे त्याच समुहाचे असल्यामुळे ते संस्कृत ग्रंथातील वादग्रस्त भाग

Thursday, March 20, 2014

Good Times Are Gone [ By Romila Thapar, Outlook Magazine]

The news of the withdrawal of Wendy Doniger’s bookThe Hindus, An Alternative History, and the subsequent articles and comments on the news, make it clear that the issue is not confined to just the action against this book but has relevance to other aspects in contemporary Indian life. The immediate concern is that of the relationship between authors and publishers. There was a time when publishers closely followed the work of their authors and the implications of what they were publishing. Today perhaps only a few publishers, often only the small and private ones, have such concerns. International publishing houses, or even national ones with an extensive reach, do not always know their authors that well, so invariably they are not too sensitive to the political und­er­currents of the societies where their books sell. Still, the demand for banning a book

Saturday, March 8, 2014

The Doctor and the Saint By Arundhati Roy

ANNIHILATION OF CASTE is the nearly eighty-year-old text of a speech that was never delivered.* When I first read it I felt as though somebody had walked into a dim room and opened the windows. Reading Dr Bhimrao Ramji Ambedkar bridges the gap between what most Indians are schooled to believe in and the reality we experience every day of our lives.
My father was a Hindu, a Brahmo. I never met him until I was an adult. I grew up with my mother, in a Syrian Christian family in Ayemenem, a small village in communist-ruled Kerala. And yet all around me were the fissures and cracks of caste. Ayemenem had its own separate “Parayan” church where “Parayan” priests preached to an “untouchable” congregation. Caste was implied in peoples’ names, in the way people referred to each other, in the work they did, in the clothes they wore, in the marriages that were arranged,

Tuesday, February 25, 2014

बिन पेंदो के लोटे उदित राज, रामविलास पासवान और रामदास आठवले


जस्टिस पार्टी के नेता उदित राज इनके भारतीय जनता पार्टी प्रवेश करने तथा संघ परिवार के सामने घुटने टेकने की खबर मिली साथ ही रामविलास पासवान की भाजपा के राजकीय अखाड़े में जा मिलने और साथ में युती करने खबर ने और चौका दिया ये दोनों खबरे चौखा देने वाली थी क्योकि ये दोनों तत्वों की और संघ के हिन्दुवाद को लताडने की बात करनेवाले नेता लगते थे महाराष्ट्र में रामदास आठवले के शिवसेना और भाजपा के साथ जाने से और दोस्ती करने से मुझे कोई ताज्जुब नहीं लगा क्योकि रामदास आठवले हमेशाही अवसरवादी रहा है  आंबेडकरवाद आठवले के भेजे में ना कभी गया था, ना कभी जाएगा  वह तो सिर्फ सत्ताधारियोका खिलोना है ये लोग दलित समाज के वोटो के सिर्फ दलाल है और उससे ज्यादा कुछ नहीं

Saturday, February 22, 2014

आरक्षण व काही प्रश्न

राहुल गांधी सध्या जाहीरनाम्यासाठी कांग्रेसी नेत्याकडून जाहीर सूचना मागवीत आहेत. त्या जाहीर सूचनांचा भाग म्हणून कॉंग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी कांग्रेस पक्षाने आता जातीं आधारित राखीव जागांऐवजी आर्थिक दुर्बलतेच्या आधारे आरक्षणाच्या तरतुदीचा पुरस्कार करावा अशी मागणी पक्षाकडे केली. जनार्दन द्विवेदी हे सोनिया व राहुल गांधी यांच्या अंतस्थ गटातील समजले जातात. त्यामुळे कांग्रेसने जाणीवपूर्वक जनार्दन द्विवेदीच्या माध्यमातून जाती आधारित आरक्षण समाप्त करून आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी करने हे कांग्रेसचे अंतस्थ  राजकीय मनसुबे आहेत हे स्पष्ट होते. जनार्दन द्विवेदीच्या

Saturday, January 25, 2014

““मादे स्नाना”” या अमानवीय प्रथेचे दहन कधी होईल?


भारत हा परंपरा व धर्माच्या वेडाचारानी पछाडलेला देश आहे. या देशात आजही अमानवीय, रानटी व नीच प्रथांचे समर्थन केले जाते. विज्ञानाने आणलेल्या क्रांतीचा वापर या देशातील कुप्रथाना वाढविण्यासाठी व तिचे जतन करण्यासाठी महज केला जात आहे. गणपतीचे दुध पिणे व ही बातमी जगभर पसरविणे हे त्याचे एक उत्तम उदाहरण होय. या देशावर ब्रिटिशांचे राज्य प्रस्थापित झाले

Thursday, January 23, 2014

क्या नरेंद्र मोदी ओबीसी नेता है?

आजकल नरेंद्र मोदीजी खुद को ओबीसी का लीडर तथा ओबीसी वर्ग से आने की बात कर रहा है और ओबीसी से व्होट माँगने की याचना कर रहा है. लेकिन सवाल यह है की, नरेंद्र मोदी ने ओबीसी के लिए कुछ किया है? तथ्य इस प्रकार है 
१. ओबीसी को रिझर्वेशन दिलाने के लिए नरेंद्र मोदी की भूमिका झिरो (शून्य) थी. उन्होंने कभीभी  मंडल कमीशन के लिए आवाज नहीं उठाई?
२. नरेंद्र मोदी मंडल कमीशन के प्रबल विरोधी रहे है. नरेंद्र मोदी हमेशा आर एस एस के भूमिका के साथ रहे है, जब की आर एस

Wednesday, January 15, 2014

विवेकानंदांच्या विचारांचा मूलस्रोत बौद्ध तत्त्वज्ञानात

लेखक: संदीप जावळे (लोकप्रभा दि १७ जानेवारी २०१४ ला प्रकाशित )
येत्या १२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १५० वी जयंती आहे. भारतीय संस्कृतीची अस्मिता आणि तिचे स्वत्त्व पाश्चात्त्य जगाला पटवून देण्यात त्यांचा मोठा हातभार असला तरी त्यांच्या विचारांमागचा, प्रेरणांचा मूळ स्र्ोत बौद्ध धर्मात सापडतो अशी मांडणी या लेखात केली गेली आहे.स्वामी विवेकानंद हे भारतमातेचे थोर सुपुत्र होते. दुर्दैवाने त्यांना ३९ वर्षांचे अल्प आयुष्य लाभले,

Saturday, January 4, 2014

आद्यशिक्षीका सावित्रीबाई फुले यांचे अलौकिक गुण


सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या आद्यशिक्षीका होत. ज्या काळात स्त्रियांना चूल व मुल यापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले होते. मनुस्मृतीने स्त्रियांवर बंधने टाकली होती व समाजव्यवस्थेने ही बंधने बिनदिक्कत स्वीकारले होते, त्याकाळात सावित्रीबाई फुले ह्या महात्मा ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून समाजक्रांतीच्या चळवळीत अग्रेसर होत्या. आपले कार्य तडीस नेण्यासाठी त्यांनी सनातनी ब्राम्हणी समाजाकडून अपमान व अंगावर शेणखताचा मारा सहन केला. मुलीना शिकवायला जाताना त्यांच्या साडीवर शेण व चिखल फेकून खराब करण्यात येत असे परंतु आपल्या कार्यापासून त्या तसूभरही मागे सरल्या नाहीत. आजच्या स्त्रियांना जे स्वातंत्र्याचे जीवन जगायला मिळत आहे त्याचे श्रेय केवळ सावित्रीबाई फुलेना जाते. परंतु आजची स्त्री सावित्रीबाईला विसरून अज्ञान व काल्पनिक सरस्वतीचे गुणगान गाते हा एक दुर्व्यविलास आहे.

Sunday, December 29, 2013

आम आदमी पार्टी व आंबेडकरी आंदोलन

अलीकडच्या काळात सामान्य जनतेच्या दैनंदिन प्रश्नांना स्पर्श करीत आंदोलन उभे करणा-या चळवळींना जनतेचा पाठिंबा प्राप्त होतो हे अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांच्या जनलोकपाल आंदोलनातून स्पष्ट झाले आहे. रामलीला मैदान व जंतर मंतर येथे जमलेला गर्दीचा उच्चांक हेच दर्शवितो. सामान्य जनतेच्या दैनंदिन प्रश्नावर राजकारण करणा-या पक्षाना जनता स्वीकार करते व त्यांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेमध्ये बसवू शकते हे

Saturday, December 14, 2013

हिंदू - हिंदुस्थान व हिंदुवादाचे मूळस्थान

“हिंदू” या शब्दाच्या उत्पत्ती बाबत अनेक विद्वानांनी संशोधन करून हिंदू शब्द परकीय असल्याचे सिद्ध केले आहे. गतकाळातील अनेक भारतीय नेत्यांनी हे मान्यही केले. स्वामी दयानंद सरस्वतींनी (१८२४-१८८३) वेदाकडे परत चला असे म्हटले होते तर अरविंद घोष हे (१८७२-१९५०) वेदांना वैदिक धर्माचे मूळ स्थान मानतात. स्वामी विवेकानंद हिंदू या शब्दाला चुकीचा ठरवीत म्हणतात, the word Hindu is a misnomer; the correct word should be a Vedantins, a person who follows the Vedas. याउलट तथाकथित ब्राम्हण नेते वी. दा. सावरकर  यांनी 

Saturday, November 23, 2013

बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार


बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान सुपुत्र होते. भारतीय नेत्यांतील त्यांचे स्थान अव्वल दर्जाचे असून देशातील आज पर्यंतच्या कोणत्याही नेत्यामध्ये त्यांचीच अधिक चर्चा होते. समाजकारण, अर्थकारण, राजकारण व धर्मकारण ह्या क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय पुढे जाताच येत नाही. खरे तर बाबासाहेब कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नव्हते. आणि विशिष्ट जातीचा कोणताही निकष आंबेडकरांना लागू होत नाही. त्यांचे अखिल भारतीय नेतेपद हे वादातीत आहे. जर देशात संख्येने अल्पसंख्य असलेल्या जातीचे मोहनदास गांधी व जवाहरलाल नेहरू हे देशाचे नेते म्हणून प्रस्थापित होतात त्याच न्यायाने संख्येने बहुसंख्य असलेल्या समाजाचे

Sunday, September 29, 2013

मा. कांशीराम व आजची आंबेडकरी चळवळ

इतिहासात कोरलेला चाणक्य कसा होता?, कुटनितीज्ञ की संधीसाधू?, त्याचा शिष्य म्हणविल्या गेलेला चंद्रगुप्त मौर्य चाणक्याचा वैदिक धर्म न स्वीकारता वा त्याला राजाश्रय न देता जैन धर्माचा पोशिंदा बनतो, सम्राट अशोक बौध्द धम्माचा स्वीकार करीत त्याला जागतिक महत्व प्राप्त करून देतो तर वज्जींच्या एकजुटते मध्ये अविश्वास निर्माण होताच त्यांचे राज्य लयास जाते. पुष्यमित्र शुंग सत्तेवर येताच वैदिक धर्म भरारी मारतो, चातुरवर्ण्य व्यवस्था लागू होत बहुजन गुलाम होतो, तो आजतागायत गुलामी अवस्थेतच जगतो आहे. गतकालीन इतिहास हा मागच्या चुका पुढे न करण्यासाठी

Tuesday, September 24, 2013

नवसाचे गणपती पावले कुणाला?(लेखक:संजय पवार)

((लेखक:संजय पवार, मासिक:कलमनामा)
नव्वदच्या दशकात हिंदुत्वाचा जो उन्माद संघ आणि संघप्रणित सर्व संघटना (यात भाजपही आला) देशभर पसरवला, त्याला महाराष्ट्रात शिवसेनेने खतपाणी घातलं. ‘मराठी’चा मुद्दा बाजूला सारून बाळासाहेबांनी भगवी वस्त्रं चढवली ती अखेरच्या श्वासानंतरही उतरवली नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतभर त्यांची ओळख ‘हिंदुहृदयसम्राट’ अशीच राहिली. हिंदुच्या बाजूने जेव्हा संघासकट भाजप आणि त्यांची चिल्लीपिल्ली अडचणीच्या काळात ‘गोलमाल’ बोलत तेव्हा ‘हिंदुहृदयसम्राट’ कुठल्याही थराला जाऊन, कुठल्याही शब्दात परिणामांची पर्वा न करता बोलत आणि त्या बोलण्यावर ठाम राहत. तरीही त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, त्यांना अटक झाली नाही, त्यांच्यावर खटले भरले गेले पण निर्णयाप्रत आले नाही, काही खटले माघारीही घेतले गेले. यामागचं राजकीय इंगित, इतरांचे ‘लकवे’ शोधणार्या तंदुरुस्त लोकांनाच माहीत!

Monday, September 16, 2013

महानायक बिरसा मुंडा

बिरसा मुंडा केवल आदिवासियोके महानायक नहीं थे, वे तो महानायक थे मानवता के. उन्होंने आदिवासीयोमें पनपे अंधविश्वासो से मुक्ति दिलाई और उनमे आत्मविश्वास और स्वाभिमान कि ज्योत जलाई थी. आदिवासी आंदोलन के सूत्रधार बिरसा मुंडा को आदिवासी लोग भगवान मानते है.
बिरसा मुंडा ने देखा, इस देश के जमीनदार और साहुकारो ने अदिवासियोपर जुल्म किये. जमीनदार तो अदिवासियोसे उनके खेतों में काम करवा लेते और उसके बदले में बहुत कम अनाज देते थे जिसमे

Tuesday, September 3, 2013

हेमंत करकरे ते डॉ. दाभोलकर दहशतवाद्यांची ‘नेम’बाजी! (लेखक: संजय पवार { कलामनामा)



हेमंत करकरे महाराष्ट्र एटीएस प्रमुख.
२६/११च्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात ‘शहीद’.
डॉ. नरेंद्र दाभोलकर अज्ञात (हा लेख लिहिपर्यंत) मारेकर्यांकडून पुण्यात सकाळी ७ वाजता गोळ्या घालून खून.
करकरे आणि डॉ. दाभोलकर यांच्यात एक साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे सनातन्यांकडून जिवंतपणी धमक्या, अवहेलना आणि धर्मद्रोही (हिंदू) राष्ट्रद्रोही आणि यापेक्षा शेलक्या विशेषणांनी निर्भत्सना आरती. आणि त्यांच्या मृत्युपश्चात जाहीर शोक आणि मतलबी उरबडवेपणा करण्यात आला.

Sunday, September 1, 2013

तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानच्या (काबुल) वास्तुसंग्रहालयात


तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानची राजधानी असलेल्या काबुल शहरातील वास्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहे. राजदचे सांसद श्री रघुवंशसिंग यांनी संसदेमध्ये शून्यकाल मधील प्रश्नोत्तरात तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानच्या (काबुल) वास्तुसंग्रहालयात असून ते भारतात परत आणण्याची मागणी केली आहे.

Thursday, August 22, 2013

दाभोळकर साहेब तुमचे हे बलिदान व्यर्थ न जावो !


 एखाद्या चळवळीचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. चळवळीच्या संस्थापकाच्या मृत्युनंतरच त्या चळवळीच्या नेत्याचे महत्व समाजाला व शासनकर्त्यांना समजत असते. महात्मा ज्योतिबा फुलें, राजश्री शाहू महाराज, गाडगे महाराज, डाक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व वी.रा.शिंदे यासारख्या महापुरुषांच्या मृत्युनंतरच त्यांच्या उतुंग विचाराचे व कर्तुत्वाचे मोल समाजाला व शासनाला समजले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डाक्टर नरेंद्र

Friday, August 9, 2013

शरद जोशी: कसला योद्धा शेतकरी! हा तर शेतक-यांचा मारेकरी


शरद जोशी हे कावेबाज भटाच्या पिलावळीतील रंग बदलणा-या एका शामेलीयन सरड्याचे रूप. त्याने शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या भावनांचा व  त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा अक्षरश: बाजार मांडत आपले राजकीय बस्तान मांडण्याचा डाव रचत राज्यसभेची खासदारकी बळकावली होती. बामणी काव्यातल्या या जळूने आपल्या पोटात जपून ठेवलेले जातीयवादी फुत्कार अखेर बाहेर काढत लोकसत्ता या ब्राम्हणी वृत्तपत्रात लेख लिहीत “आंबेडकरांनी

Tuesday, August 6, 2013

उत्तर प्रदेश में अभिव्यक्ति की स्वतंत्रता पर हमला

लेखक एवं चिंतक कंवल भारती को उत्तर प्रदेश सरकार ने फेसबुक पर एस डी एम् दुर्गाशक्ति नागपाल के मामले पर टिपण्णी करने के कारण गिरफ्तार किया। लेकिन कोर्ट ने उन्हें जमानत पर छोड़ दिया। उत्तर परदेश सरकार की यह कारवाई  अभिव्यक्ति के मौलिक अधिकारों पर किया गया हमला है. उत्तर प्रदेश सरकार के इस कारवाई की बुध्दिजिवियोने  निंदा करनी चाहिए।
फेसबुक पर कंवल भारती ने प्रतिक्रिया देकर जनभावना की बात कही थी। उन्होंने गलत कुछ नहीं लिखा था 

कंवल भारती ने फेसबुक पर लिखा था, 'आरक्षण और दुर्गाशक्ति नागपाल मुद्दों पर अखिलेश यादव की समाजवादी सरकार पूरी तरह फेल हो गयी है। अखिलेश, शिवपाल यादव, आज़म खां और मुलायम सिंह इन मुद्दों पर अपनी या अपनी सरकार की पीठ कितनी ही ठोक लें, लेकिन जो हकीकत ये देख नहीं पा रहे हैं। अपराधियों के हौसले बुलंद हैं और बेलगाम मंत्री इंसान से हैवान बन गये हैं। ये अपने पतन की पट कथा खुद लिख रहे हैं। सत्ता के मद में अंधे हो गये इन लोगों को समझाने का मतलब है भैस के आगे बीन बजाना।'

Saturday, July 27, 2013

वारकरी संप्रदायात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चंचुप्रवेश

दरवर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या वारीला वारकरी संप्रदायाचे लोक जात असतात. या वारकरी संप्रदायात  बहुजन समाजाच्या लोकांचा अधिक भरणा आहे. गरीब बहुजन समाज अनवाणी पायाने व जुनाट मळकट कपड्याने वारीच्या पाठीमागे चालत असतो. तो वारीत बेफामपणे नाचत असतो. त्यांच्या अंगात अध्यात्माचे भूत संचारलेले असते. वारीत नाचणारा हा वारकरी अडाणी, निष्पाप, भाबडा व अर्धशिक्षित असतो. सनातनवाद्याचा सांस्कृतिक कावा समजण्याची अक्कलदाढ वारक-यात जाणूनबुजून निर्माण होवू देण्यात आली नाही. बहुजन वारकरी  दारिद्र्याने पिचलेला, गरिबीने

Friday, July 26, 2013

वारीतील सनातनी वाटमारे

पांडुरंगाच्या प्रती असलेल्या अपार उत्साहाची उधळण करत विविध रिंगणं, परिक्रमा आटोपून देशभरातल्या दिंड्या, पालख्या येत्या १९ तारखेला पंढरपुरात विसावतील. महिना-दीड महिन्याचा पायी प्रवास करणारी पावलं परतीच्या प्रवासाला लागतील. यावर्षी पंढरीच्या दिशेने जाणार्या पावलांमध्ये ३० टक्के वाढ होणार असल्याचा एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, दिवसेंदिवस वाढत जाणार्या या गर्दीत ज्यांचा जयघोष केला जातो त्या संतांना समजून घेणारा टक्का किती असेल याबद्दल शंका आहे.
शंका असल्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक आहे, बोगस वारकरी. आता तुम्ही म्हणाल! बोगस वारकरी हा काय प्रकार आहे. हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर घडतोय. बहुजन देव, यात्रा, उत्सव यांना प्रथम नाकारायचे, बदनामी करायची तरीही

Wednesday, July 17, 2013

रामासामी पेरियार:दक्षिणेतील महात्मा फुले

 देशाच्या स्वातंत्र्य पूर्व राजकारणावर उत्तर भारतीय ब्राम्हण समाज, हिंदू महासभा, रा.स्व.संघ या गटाचे  अधिपत्य होते. ब्राम्हीण व जमीनदारांच्या दाता पक्षाचे नाव होते भारतीय राष्ट्रीय कांग्रेस हे. एकूणच ब्राम्हणी व भांडवलवादी मानसिकतेच्या वृत्तीचा वावर या कांग्रेसी संघटनेत होता. अशा वातावरणात दक्षिण भारतात ( विशेषता: तामिळनाडू व केरळ) रामासामी पेरियार यांनी ब्राम्हणी मनोवृत्तीला आवाहन देण्याचे कार्य केले. आर्यप्रणित ब्राम्हणी वर्चस्व व ते टिकवून ठेवण्यासाठी धडपडणारे कांग्रेसमधील कट्टर हिंदुवादी यांना उत्क्रांत  होवू न देण्याचे सारे श्रेय रामासामी पेरियार यांना जाते. द्रविडी समाज हा गणप्रधान समाज होता परंतु आर्याच्या वर्णाश्रम संस्कृतीने गणसंस्कृतीवर मात केली होती. परंतु खोलवर रुजलेल्या द्रविडीयन संस्कृतीला ब्राम्हणी वर्चस्व कधीही मान्य झाले नव्हते. त्यामुळे उत्तरेकडून आलेल्या आर्य संस्कृती विरुध्द द्रविडांनी दंड थोपटले.

Monday, July 15, 2013

कट्टर धर्मवाद्यापुढे सरकारने टेकले घुटने

अंधश्रध्दा निर्मूलनाचा कायदा या महाराष्ट्रात आता होणे नाही हे एकंदरीत परिस्थितीवरून दिसते आहे. कांग्रेस – राष्ट्रवादी सरकार व त्यांची विचारधारा ही भाजपा –शिवसेना या पक्षापेक्षा वेगळी नाही हे यातून सिध्द होते. या सरकारने कट्टर धर्मवाद्यापुढे सपशेल लोटांगण घातले आहे. कांग्रेस व राष्ट्रवादीने केवळ पुरोगामीपणाचा बुरखा घातला आहे परंतु अंतस्थ तेही पक्के धार्मिक कट्टरवादी आहेत हे आता धर्मनिरपेक्ष जनतेने ओळखले पाहिजे. कांग्रेस व राष्ट्रवादी सहीत भाजप-शिवसेना व राष्ट्रीय स्वंसेवक संघ यांना या देशातील गरीबांना अंधश्रद्धेच्या गर्तेत वर्षानुवर्षे गाडून ठेवायचे आहे. सामान्य जनतेला अंधश्रद्धेच्या गर्तेत ठेवल्याशिवाय यांचे वर्चस्व या देशावर व जनतेवर ठेवता येणार नाही हे ते जाणून आहेत म्हणून अंधश्रद्धा विरोधी बिलाला त्यांचे हुलकावण्या देणे चालू आहे.

Sunday, July 7, 2013

विश्व शांतीदूतावर भ्याड हल्ला



जगाला शांती, प्रेम व अहिंसा या त्रयत्रीचा संदेश देना-या तथागत बुद्धाच्या मर्मस्थळावर हल्ला करना-या दूषित वृत्तीचा निषेध शांतीदूताच्या चाहत्यांनी शांतपणे केला पाहिजे. हा हल्ला मुस्लिम आतंकवादी वा भारतातील जातीयवावाद्यांनी केला हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरी यातून दोन बाबी सूचक वाटतात. म्यानमार मध्ये बुध्दिस्ट व रोहिंग्या मुस्लिम यांच्यात झालेला तनाव व दंगल. अजूनपर्यंत कोणत्याही मुस्लिम संघटनेने या बाम्बस्फोटाची जबाबदारी घेतली नसल्याचे दिसते. म्यानमार मधील घटनेचा भारतातिल बौध्द व विहारांशी सबंध जोडणे हे सुध्दा अनाकलणीय आहे.  तर दुसरी बाब म्हणजे भारतातील भगव्या दहशहतवाद्यांनी घडवून आणलेले स्फोट. संघाने नरेंद्र मोदीना बीजेपीचा निवडणूक प्रमुख व संभाव्य पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निश्चित केल्यानंतर देशात जातीयवादी वातावरण निर्माण करण्याचे मनसुबे जातीयवाद्यांनी आखले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार भाजपापासून दूर झालेल्या नितीश कुमारांना अद्दल घडविण्यासाठी बोधगये मध्ये स्फोट घडविण्याचे षडयंत्र आखले असावेत ही शक्यता नाकारता येत नाही. विनोद मिस्त्री या हिंदू संदिग्ध व्यक्तीस एन. आय. ए ने अटक केल्यामुळे भगव्या आंतकवादाची पुष्टी होत असून देशातील दलित मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचे कुटिल कारस्थान रचण्यात आल्याचे निष्पन्न होते. देशात 2014 साली होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत देशाची सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी आर. एस. एस. चातकासारखी वाट पाहत आहे. आर. एस. एस. च्या पिलावळीने आखलेल्या योजनेचा हा एक भाग असू शकतो. एन. आय. ए. च्या चौकशीअंती सत्य बाहेर येईल. मात्र आंबेडकरवादी तसेच तथागताना मानणा-यांनी बुध्दाचा संदेश समोर ठेऊनच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. हिंसेचा त्याग करीत सर्व बौध्दानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येणे फार गरजेचे आहे. एकतेमध्येच शक्ती असते (Unity is the strength) हे तत्व समजने गरजेचे असून गटातटात विखुरलेल्या आंबेडकरवाद्यांनी व बौध्द संघटनांनी यातून बोध घ्यावा.